ETV Bharat / state

नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त; लग्नसोहळे धार्मिक कार्यक्रमावर घातली होती बंदी - Nandgaon no corona

नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त झाले असुन, या गावात आज एकही रुग्ण नसल्याचे ग्रामसेवक व सरपंचानी सांगितले आहे. तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केल्याने गाव व लग्नसोहळे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातल्याने गाव कोरोनामुक्त झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त
नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त
author img

By

Published : May 19, 2021, 1:55 PM IST

नांदगांव - नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त झाले असुन, या गावात आज एकही रुग्ण नसल्याचे ग्रामसेवक व सरपंचानी सांगितले आहे. तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाल्याची गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नांदगांव तालुक्यातील कर्ही हे एकमेव गाव सध्या कोरोनामुक्त आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आम्हा काळजी घेऊ असेही गावकऱ्यांनी सांगितले.

नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त

शासनाने बांधुन दिलेल्या नियमानुसार केल्या उपाययोजना

एकीकडे कोरोना जगभरात धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे काही ठिकाणी कोरोनाच्या सकारात्मक बातम्या देखील बघावयास मिळत आहेत. नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव देखील यास अपवाद नाही. आज कर्ही गाव संपूर्ण कोरोनामुक्त झाले आहे. यासाठी गावातील ग्रामस्थांनीही साथ दिली, म्हणून हे शक्य झाल्याचे सरपंच सांगत आहेत. तर शासनाने बांधुन दिलेल्या नियमानुसार आम्ही उपाययोजना केल्या त्यामुळे गाव कोरोनामुक्त करू शकलो, असे ग्रामसेविका सांगत आहेत. कर्ही हे नांदगांव तालुक्यातील 1648 लोकसंख्या असलेले छोटेसे गाव असुन याठिकाणी सर्व समाजातील बांधव गुण्यागोविंदाने राहतात. 2 दिवसाआड गावात औषध फवारणी केली जाते. आशा सेविका व जिल्हा परिषद शिक्षक यांच्यामार्फत गावातील लोकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते, ऑक्सिमिटरने तपासणी केली जाते, तसेच लसीकरण या सर्व गोष्टीमुळे हे शक्य झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

लग्नसोहळे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी

शासनाने घालून दिलेले निर्देश आणि आम्ही दाखवलेला मोठेपणा यामुळे गावातील कोरोना पळून गेला असे गावातील लोक म्हणाले. लग्नसोहळे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली गेली आहे. शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करून लग्नसोहळे पुढे ढकलले व गावात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंदी घातली. यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यास मज्जाव झाला.

गावातील 80 टक्के नागरिक मळ्यात

गावात एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 3 जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा गावकऱ्यांनी ज्यांच्याकडे शेतात घरे आहेत, अशा सर्वांना विनंती केली व प्रत्येकाला आपल्या मळ्यात असलेल्या घरात राहण्यास सांगितले. यामुळे त्यांचा गावातील इतर नागरिकांशी संपर्क तुटला तसेच या सर्वांना अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू घरपोच देण्यात आल्या. यामुळे देखील बराच फरक पडला, असेही ते म्हणाले.

दोन दिवसाआड फवारणी व थर्मल स्कॅनिंग

गावातील प्रत्येक घरात दर दोन दिवसांनी सॅनिटायझर व औषधी फवारणी करण्यात आली होती. तर आशा वर्कर व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमार्फत प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करण्यात आली होती. यामुळे ज्यांना काही त्रास आहे, असे नागरिक लगेच लक्षात आले व त्यांना ताबडतोब उपचार करून होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले.

हेही वाचा - कोकोनट किंग; फक्त नारळ तो़डून ते दोघं कमवतात महिना ६० ते ८० हजार रुपये

नांदगांव - नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त झाले असुन, या गावात आज एकही रुग्ण नसल्याचे ग्रामसेवक व सरपंचानी सांगितले आहे. तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाल्याची गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नांदगांव तालुक्यातील कर्ही हे एकमेव गाव सध्या कोरोनामुक्त आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आम्हा काळजी घेऊ असेही गावकऱ्यांनी सांगितले.

नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त

शासनाने बांधुन दिलेल्या नियमानुसार केल्या उपाययोजना

एकीकडे कोरोना जगभरात धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे काही ठिकाणी कोरोनाच्या सकारात्मक बातम्या देखील बघावयास मिळत आहेत. नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव देखील यास अपवाद नाही. आज कर्ही गाव संपूर्ण कोरोनामुक्त झाले आहे. यासाठी गावातील ग्रामस्थांनीही साथ दिली, म्हणून हे शक्य झाल्याचे सरपंच सांगत आहेत. तर शासनाने बांधुन दिलेल्या नियमानुसार आम्ही उपाययोजना केल्या त्यामुळे गाव कोरोनामुक्त करू शकलो, असे ग्रामसेविका सांगत आहेत. कर्ही हे नांदगांव तालुक्यातील 1648 लोकसंख्या असलेले छोटेसे गाव असुन याठिकाणी सर्व समाजातील बांधव गुण्यागोविंदाने राहतात. 2 दिवसाआड गावात औषध फवारणी केली जाते. आशा सेविका व जिल्हा परिषद शिक्षक यांच्यामार्फत गावातील लोकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते, ऑक्सिमिटरने तपासणी केली जाते, तसेच लसीकरण या सर्व गोष्टीमुळे हे शक्य झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

लग्नसोहळे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी

शासनाने घालून दिलेले निर्देश आणि आम्ही दाखवलेला मोठेपणा यामुळे गावातील कोरोना पळून गेला असे गावातील लोक म्हणाले. लग्नसोहळे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली गेली आहे. शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करून लग्नसोहळे पुढे ढकलले व गावात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंदी घातली. यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यास मज्जाव झाला.

गावातील 80 टक्के नागरिक मळ्यात

गावात एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 3 जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा गावकऱ्यांनी ज्यांच्याकडे शेतात घरे आहेत, अशा सर्वांना विनंती केली व प्रत्येकाला आपल्या मळ्यात असलेल्या घरात राहण्यास सांगितले. यामुळे त्यांचा गावातील इतर नागरिकांशी संपर्क तुटला तसेच या सर्वांना अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू घरपोच देण्यात आल्या. यामुळे देखील बराच फरक पडला, असेही ते म्हणाले.

दोन दिवसाआड फवारणी व थर्मल स्कॅनिंग

गावातील प्रत्येक घरात दर दोन दिवसांनी सॅनिटायझर व औषधी फवारणी करण्यात आली होती. तर आशा वर्कर व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमार्फत प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करण्यात आली होती. यामुळे ज्यांना काही त्रास आहे, असे नागरिक लगेच लक्षात आले व त्यांना ताबडतोब उपचार करून होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले.

हेही वाचा - कोकोनट किंग; फक्त नारळ तो़डून ते दोघं कमवतात महिना ६० ते ८० हजार रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.