ETV Bharat / state

दिलीप कुमार नाशिक न्यायालयात हजर झाले होते तेव्हा...

मीराताई व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करून तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून दिलीप कुमार आणि त्यांचे भाऊ यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. याबाबत त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.

author img

By

Published : Jul 7, 2021, 10:03 PM IST

Actor Dilip Kumar's warrant was issued by Nashik District Court
अभिनेते दिलीप कुमार यांचे नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने काढले होते वॉरंट

नाशिक - मीराताई बोराटे यांची त्र्यंबकेश्वर जवळील दुगाव येथे शेतजमीन होती. त्याबाबत बोराटे कुटुंबीय यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. मात्र, अभिनेते दिलीप कुमार व त्यांच्या भावांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या मदतीने सदरची जमीन न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही त्यांच्या नावावर करून घेतली होती. याप्रकरणी त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी दोनवेळा समन्स देण्यात आले होते. मात्र, ते हजर न झाल्यामुळे त्यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयाने वॉरंट काढले होते. नंतर ते याठिकाणी आले व संबंधित प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान, यावर चर्चा करून तोडगा काढल्याचा अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबतचा अनुभव हा अ‌ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी सांगितला आहे.

अभिनेते दिलीप कुमार यांचे नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने काढले होते वॉरंट
  • फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ -

मीराताई व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करून तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून दिलीप कुमार आणि त्यांचे भाऊ यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. हे प्रकरण दिवाणी होते. तरीही या प्रकरणात मीराताई बोराटे यांच्या बाजूने अ‌ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी नाशिक न्यायालयात भा. द. वि. कलम 420, 468, 471, 34 आदि कलमाप्रमाणे फौजदारी खटला दाखल केला. या खटल्यात दिलीप कुमार यांना जुहू येथील त्यांच्या घरी जाऊन समन्स बजावण्यात आला होता. तरीही ते नाशिक न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने अभिनेते दिलीप कुमार यांचे वॉरंट काढले होते. शेवटी न्यायालयाने वारंट काढल्यानंतर दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या जामीन अर्जास अ‌ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी विरोध केला होता. दिलीप कुमार यांची फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी अतिशय नम्रपणे निवेदन केले होते. न्यायालयाने त्यांना जामीन देऊन मुक्तता केली होती.

  • तडजोड करण्यात आली होती -

यावेळी दिलीप कुमार आणि त्यांच्या वकिलांशी या खटल्याबद्दल तडजोड करण्याबाबत आमची चर्चा झाली होती. त्यानंतर दिलीप कुमार यांना या खटल्यात पुढे न्याय मिळणे जवळजवळ अशक्य असल्याने त्यांनी आमची तडजोड मान्य केली होती. सदर जमीन प्रकरणांमध्ये समझोता झाल्याने सर्व खटले मागे घेण्यात आले होते. दिलीप कुमार यांनी अखेर मीराबाई याना रक्कम दिली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते.

  • न्यायालयाच्या आवारात चाहत्यांची मोठी गर्दी -

दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात आले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांची न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. तेव्हा चाहत्यांनी जल्लोष केला होता.

हेही वाचा - Tragedy King Dilip Kumar Died : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

नाशिक - मीराताई बोराटे यांची त्र्यंबकेश्वर जवळील दुगाव येथे शेतजमीन होती. त्याबाबत बोराटे कुटुंबीय यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. मात्र, अभिनेते दिलीप कुमार व त्यांच्या भावांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या मदतीने सदरची जमीन न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही त्यांच्या नावावर करून घेतली होती. याप्रकरणी त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी दोनवेळा समन्स देण्यात आले होते. मात्र, ते हजर न झाल्यामुळे त्यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयाने वॉरंट काढले होते. नंतर ते याठिकाणी आले व संबंधित प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान, यावर चर्चा करून तोडगा काढल्याचा अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबतचा अनुभव हा अ‌ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी सांगितला आहे.

अभिनेते दिलीप कुमार यांचे नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने काढले होते वॉरंट
  • फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ -

मीराताई व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करून तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून दिलीप कुमार आणि त्यांचे भाऊ यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. हे प्रकरण दिवाणी होते. तरीही या प्रकरणात मीराताई बोराटे यांच्या बाजूने अ‌ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी नाशिक न्यायालयात भा. द. वि. कलम 420, 468, 471, 34 आदि कलमाप्रमाणे फौजदारी खटला दाखल केला. या खटल्यात दिलीप कुमार यांना जुहू येथील त्यांच्या घरी जाऊन समन्स बजावण्यात आला होता. तरीही ते नाशिक न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने अभिनेते दिलीप कुमार यांचे वॉरंट काढले होते. शेवटी न्यायालयाने वारंट काढल्यानंतर दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या जामीन अर्जास अ‌ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी विरोध केला होता. दिलीप कुमार यांची फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी अतिशय नम्रपणे निवेदन केले होते. न्यायालयाने त्यांना जामीन देऊन मुक्तता केली होती.

  • तडजोड करण्यात आली होती -

यावेळी दिलीप कुमार आणि त्यांच्या वकिलांशी या खटल्याबद्दल तडजोड करण्याबाबत आमची चर्चा झाली होती. त्यानंतर दिलीप कुमार यांना या खटल्यात पुढे न्याय मिळणे जवळजवळ अशक्य असल्याने त्यांनी आमची तडजोड मान्य केली होती. सदर जमीन प्रकरणांमध्ये समझोता झाल्याने सर्व खटले मागे घेण्यात आले होते. दिलीप कुमार यांनी अखेर मीराबाई याना रक्कम दिली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते.

  • न्यायालयाच्या आवारात चाहत्यांची मोठी गर्दी -

दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात आले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांची न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. तेव्हा चाहत्यांनी जल्लोष केला होता.

हेही वाचा - Tragedy King Dilip Kumar Died : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.