ETV Bharat / state

धरणाची दुरुस्ती न केल्यास निवडणुकांवर टाकणार बहिष्कार!

author img

By

Published : Jul 25, 2019, 10:05 AM IST

Updated : Jul 25, 2019, 1:56 PM IST

शहादा तालुक्यातील कोंढावळ खापरखेडा गावाजवळील रंगुमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले होते. या धरणाला आता जवळपास ५० वर्षे होत आली असूनही, धरणाची आतापर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणामधील गाळ देखील काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

villagers in nandurbar warns to boycott elections if the dam is not repaired

नंदुरबार - शहादा तालुक्यातील कोंढावळ खापरखेडा गावाजवळील रंगुमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले होते. या धरणाला आता जवळपास ५० वर्षे होत आली असूनही, धरणाची आतापर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याचा अपेक्षित प्रमाणात साठा होत नाही. याचा परिणाम तालुक्यातील शेतकऱ्यांवर तसेच नागरिकांवर होत आहे.

गेल्या 8 ते 10 वर्षांपासून पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष श्री लालचंद माळी आणि शेतकरी वर्ग या धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत. मात्र, संबंधित विभाग त्याकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

धरणाची दुरुस्ती न केल्यास निवडणुकांवर टाकणार बहिष्कार!

या धरणामुळे कोंढावळ, वडाळी, जयनगर, बोराळे, धंद्रे, बामखेडा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून धरणामधील गाळ देखील काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.


धरणातील गाळ काढावा, धरणाची दुरुस्ती करण्यात यावी आणि धरणाची उंची वाढवावी या गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास, येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नंदुरबार - शहादा तालुक्यातील कोंढावळ खापरखेडा गावाजवळील रंगुमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले होते. या धरणाला आता जवळपास ५० वर्षे होत आली असूनही, धरणाची आतापर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याचा अपेक्षित प्रमाणात साठा होत नाही. याचा परिणाम तालुक्यातील शेतकऱ्यांवर तसेच नागरिकांवर होत आहे.

गेल्या 8 ते 10 वर्षांपासून पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष श्री लालचंद माळी आणि शेतकरी वर्ग या धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत. मात्र, संबंधित विभाग त्याकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

धरणाची दुरुस्ती न केल्यास निवडणुकांवर टाकणार बहिष्कार!

या धरणामुळे कोंढावळ, वडाळी, जयनगर, बोराळे, धंद्रे, बामखेडा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून धरणामधील गाळ देखील काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.


धरणातील गाळ काढावा, धरणाची दुरुस्ती करण्यात यावी आणि धरणाची उंची वाढवावी या गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास, येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:Anchor:-शहादा तालुक्यातील कोंढावळ खापरखेडा गावाजवळील डोंगराळ भागात रंगुमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे, या धरणाला ५० वर्षे होत आली असून, धरणाची आतापर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही, त्यामुळे पाण्याचा अपेक्षित साठा होत नाही आहे,

Body:
गेल्या 8 ते 10 वर्षांपासून पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष श्री लालचंद माळी आणि शेतकरी वर्ग धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत मात्र त्या कडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या धरणाकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीवर बहिष्कार टाकन्याचा ईशारा देण्यात आला आहे...Conclusion:या धरणामुळे कोंढावळ, वडाळी, जयनगर, बोराळे, धंद्रे, बामखेडा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती मात्र गेल्या बऱ्याच वर्षा पासून धरनातून गाळ देखील काढण्यात आला नाही. त्यामुळे धरणातील पाणी क्षमतेत कमालीची घट दिसून येत आहे.

Byte शेतकरी
Last Updated : Jul 25, 2019, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.