नंदुरबार - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला असून, त्यामुळे शहरात सगळीकडे पाणी झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. तर, धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे.
![rainfall continues in nandurbar districts rivers are flooded](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-01-hevy-rain-vis-7203742_04082019092316_0408f_1564890796_515.jpg)
![rainfall continues in nandurbar districts rivers are flooded](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-01-hevy-rain-vis-7203742_04082019092316_0408f_1564890796_788.jpg)
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर, विरचक धरणातील पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ होत आहे. प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.