ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

शहादा तालुक्यातील रूपाली पदमसिंग चव्हाण या १४ वर्षीय मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. पहाटे नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी मोटार लावताना तिला विजेचा धक्का लागल्याने ती दूर फेकली जाऊन डोक्याला मार लागला व तिचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Sep 10, 2019, 9:57 PM IST

nandurbar

नंदुरबार- शहादा तालुक्यातील मंदाणा येथे आज(मंगळवार) रोजी पहाटे पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. वडीलांच्या निधनानंतर आई नेहमीच आजारी असताना आपल्या आईसह तीन बहिणी व एका भावाचा सांभाळ करणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुपाली पदमसिंग चव्हाण (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतकडून नळांना गावातील तांडावस्ती परिसरात पाणी सोडण्यात आले. नळांना पाणी आले असल्याने येथील रुपाली पदमसिंग चव्हाण ही मुलगी आपल्या आईसोबत पाणी भरण्यासाठी उठली. आई घरात इतर कामे करत असल्याचे पाहता रुपाली ही नळावरून पाणी भरण्यासाठी लावलेली मोटर सुरू करण्यासाठी गेली. परंतु डोळ्यांत अर्धवट झोप, बाहेर अंधार व सततचा पावसाचा ओलावा या कारणांमुळे मोटारीची पीन लावत असताना रुपालीला वीजेचा धक्का लागला. भांबावलेल्या अवस्थेत कसे तरी रुपालीच्या आईने मोटारीची कळ बंद केली. त्यानंतर रुपालीचा विजेपासून संपर्क तुटला व ती जमिनीवर येऊन पडली. शेजाऱ्यांना व परिसरात ही घटना समजताच तात्काळ रुपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रूपालीच्या डोक्याला मार लागल्याने येथील १०८ रुग्ण वाहिकेवरील डॉक्टरांनी रूपालीला मृत घोषित केले.

नंदुरबार- शहादा तालुक्यातील मंदाणा येथे आज(मंगळवार) रोजी पहाटे पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. वडीलांच्या निधनानंतर आई नेहमीच आजारी असताना आपल्या आईसह तीन बहिणी व एका भावाचा सांभाळ करणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुपाली पदमसिंग चव्हाण (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतकडून नळांना गावातील तांडावस्ती परिसरात पाणी सोडण्यात आले. नळांना पाणी आले असल्याने येथील रुपाली पदमसिंग चव्हाण ही मुलगी आपल्या आईसोबत पाणी भरण्यासाठी उठली. आई घरात इतर कामे करत असल्याचे पाहता रुपाली ही नळावरून पाणी भरण्यासाठी लावलेली मोटर सुरू करण्यासाठी गेली. परंतु डोळ्यांत अर्धवट झोप, बाहेर अंधार व सततचा पावसाचा ओलावा या कारणांमुळे मोटारीची पीन लावत असताना रुपालीला वीजेचा धक्का लागला. भांबावलेल्या अवस्थेत कसे तरी रुपालीच्या आईने मोटारीची कळ बंद केली. त्यानंतर रुपालीचा विजेपासून संपर्क तुटला व ती जमिनीवर येऊन पडली. शेजाऱ्यांना व परिसरात ही घटना समजताच तात्काळ रुपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रूपालीच्या डोक्याला मार लागल्याने येथील १०८ रुग्ण वाहिकेवरील डॉक्टरांनी रूपालीला मृत घोषित केले.

Intro:शहादा तालुक्यातील मंदाना येथे दि. १० सप्टेंबर रोजी पहाटे पाण्याची मोटर सुरू करत असतांना १४ वर्षीय मुलीला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. वडील वारल्यानंतर आई नेहमीच आजारी असतांना आपल्या आईसह तीन बहिणी व एक भावाचा सांभाळ करणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतकडून नळांना गावातील तांडावस्ती परिसरात पाणी सोडण्यात आले. नळांना पाणी आले असल्याने येथील रुपाली पदमसिंग चव्हाण (वय १४) ही मुलगी आपल्या आईसोबत पाणी भरण्यासाठी उठली. आई घरात इतर कामे करत असल्याचे पहाता रुपाली ही नळाला पाणी भरण्यासाठी लावलेली मोटर सुरू करण्यासाठी गेली. परंतु अर्धवट डोळ्यांत झोप, बाहेर अंधार व सततचा पावसाचा ओलावा या कारणांमुळे मोटारीची पीन लावत असतांना रुपालीला वीजेचा शॉक लागला व तिने जोराची किंचाळी मारली. आपल्या मुलीची किंचाळी ऐकू आल्याने रूपालीच्या आईने रूपालीला विजेचे करंट लागल्याचे लक्षात आले. आपल्या मुलीला वाचविण्यासाठी रुपालीच्या आईने रुपालीला सोडविण्याचा प्रयत्न केला असता तीही विजेच्या धक्क्याने फेकली गेली. भांबावलेल्या अवस्थेत कसे तरी रुपालीच्या आईने मोटारीचे बटन बंद केले. त्यानंतर रुपालीचा विजेपासून संपर्क तुटला व ती जमिनीवर डोक्यावर येऊन पडली. शेजाऱ्यांना व गल्लीत ही घटना समजली असता तात्काळ रुपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु रूपालीला डोक्याला जबर मार लागल्याने तेथील १०८ रुग्ण वाहिकेवरील डॉक्टरांनी रूपालीला मृत घोषित केले.

*प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत संताप

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या कित्येक वर्षांपासून फक्त नावालाच उरले असून येथील व परिसरातील जनतेला नेहमीच मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजही रूपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे नेहमीप्रमाणे वैद्यकीय अधिकारी नव्हते. जे डॉक्टर रुजू झाले तेही आपल्या खाजगी कामानिमित्त रजेवर आहेत. त्यामुळे रूपालीवर प्राथमिक उपचारही झाला नाही. तेथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी तीची तपासणी केली असता तीला मृत घोषित करण्यात आले. अशीच परिस्थिती बऱ्याचदा येथे उदभवत असते व रुग्णांना आरोग्य सेवेअभावी जीव गमवावा लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना संपूर्ण कल्पना असूनदेखील या गंभीर व जनतेच्या जीवावर उठणाऱ्या प्रश्नाकडे ग्रामीण रुग्णालयाच्या नावाखाली दुर्लक्ष का केले जात आहे? याबाबत जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

* घरातील कर्ती मुलगी गेल्याने हळहळ

रुपाली हीचे वडील तीन-चार वर्षांपूर्वी मरण पावले. आपला पती अचानक आपल्याला व आपल्या मुलं बाळांना सोडून गेल्याने रुपालीच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर रुपालीची आईची मनस्थिती खराब झाली. रुपालीची आई सतत आजारी राहू लागली. रूपलीला तीन बहिणी व एक सहा ,सात वर्षाचा भाऊ असल्याने गेल्या दोन तीन वर्षांपासून वडिलांच्या मृत्यूनंतर व आईच्या आजारपणानंतर संपुर्ण जबाबदारी रुपाली व तीच्या मोठ्या बहिणीवर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी शाळाही सोडली व आईसह बहीण, भावासाठी काम करून कुटुंब सांभाळू लागली. अत्यन्त कमी वयात आपल्या आजारी आईसह बहीण, भावांना सांभाळणाऱ्या रुपालीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बंजारा समाजात व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.Body:शहादा तालुक्यातील मंदाना येथे दि. १० सप्टेंबर रोजी पहाटे पाण्याची मोटर सुरू करत असतांना १४ वर्षीय मुलीला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. वडील वारल्यानंतर आई नेहमीच आजारी असतांना आपल्या आईसह तीन बहिणी व एक भावाचा सांभाळ करणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतकडून नळांना गावातील तांडावस्ती परिसरात पाणी सोडण्यात आले. नळांना पाणी आले असल्याने येथील रुपाली पदमसिंग चव्हाण (वय १४) ही मुलगी आपल्या आईसोबत पाणी भरण्यासाठी उठली. आई घरात इतर कामे करत असल्याचे पहाता रुपाली ही नळाला पाणी भरण्यासाठी लावलेली मोटर सुरू करण्यासाठी गेली. परंतु अर्धवट डोळ्यांत झोप, बाहेर अंधार व सततचा पावसाचा ओलावा या कारणांमुळे मोटारीची पीन लावत असतांना रुपालीला वीजेचा शॉक लागला व तिने जोराची किंचाळी मारली. आपल्या मुलीची किंचाळी ऐकू आल्याने रूपालीच्या आईने रूपालीला विजेचे करंट लागल्याचे लक्षात आले. आपल्या मुलीला वाचविण्यासाठी रुपालीच्या आईने रुपालीला सोडविण्याचा प्रयत्न केला असता तीही विजेच्या धक्क्याने फेकली गेली. भांबावलेल्या अवस्थेत कसे तरी रुपालीच्या आईने मोटारीचे बटन बंद केले. त्यानंतर रुपालीचा विजेपासून संपर्क तुटला व ती जमिनीवर डोक्यावर येऊन पडली. शेजाऱ्यांना व गल्लीत ही घटना समजली असता तात्काळ रुपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु रूपालीला डोक्याला जबर मार लागल्याने तेथील १०८ रुग्ण वाहिकेवरील डॉक्टरांनी रूपालीला मृत घोषित केले.

*प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत संताप

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या कित्येक वर्षांपासून फक्त नावालाच उरले असून येथील व परिसरातील जनतेला नेहमीच मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजही रूपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे नेहमीप्रमाणे वैद्यकीय अधिकारी नव्हते. जे डॉक्टर रुजू झाले तेही आपल्या खाजगी कामानिमित्त रजेवर आहेत. त्यामुळे रूपालीवर प्राथमिक उपचारही झाला नाही. तेथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी तीची तपासणी केली असता तीला मृत घोषित करण्यात आले. अशीच परिस्थिती बऱ्याचदा येथे उदभवत असते व रुग्णांना आरोग्य सेवेअभावी जीव गमवावा लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना संपूर्ण कल्पना असूनदेखील या गंभीर व जनतेच्या जीवावर उठणाऱ्या प्रश्नाकडे ग्रामीण रुग्णालयाच्या नावाखाली दुर्लक्ष का केले जात आहे? याबाबत जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

* घरातील कर्ती मुलगी गेल्याने हळहळ

रुपाली हीचे वडील तीन-चार वर्षांपूर्वी मरण पावले. आपला पती अचानक आपल्याला व आपल्या मुलं बाळांना सोडून गेल्याने रुपालीच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर रुपालीची आईची मनस्थिती खराब झाली. रुपालीची आई सतत आजारी राहू लागली. रूपलीला तीन बहिणी व एक सहा ,सात वर्षाचा भाऊ असल्याने गेल्या दोन तीन वर्षांपासून वडिलांच्या मृत्यूनंतर व आईच्या आजारपणानंतर संपुर्ण जबाबदारी रुपाली व तीच्या मोठ्या बहिणीवर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी शाळाही सोडली व आईसह बहीण, भावासाठी काम करून कुटुंब सांभाळू लागली. अत्यन्त कमी वयात आपल्या आजारी आईसह बहीण, भावांना सांभाळणाऱ्या रुपालीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बंजारा समाजात व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.Conclusion:शहादा तालुक्यातील मंदाना येथे दि. १० सप्टेंबर रोजी पहाटे पाण्याची मोटर सुरू करत असतांना १४ वर्षीय मुलीला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. वडील वारल्यानंतर आई नेहमीच आजारी असतांना आपल्या आईसह तीन बहिणी व एक भावाचा सांभाळ करणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतकडून नळांना गावातील तांडावस्ती परिसरात पाणी सोडण्यात आले. नळांना पाणी आले असल्याने येथील रुपाली पदमसिंग चव्हाण (वय १४) ही मुलगी आपल्या आईसोबत पाणी भरण्यासाठी उठली. आई घरात इतर कामे करत असल्याचे पहाता रुपाली ही नळाला पाणी भरण्यासाठी लावलेली मोटर सुरू करण्यासाठी गेली. परंतु अर्धवट डोळ्यांत झोप, बाहेर अंधार व सततचा पावसाचा ओलावा या कारणांमुळे मोटारीची पीन लावत असतांना रुपालीला वीजेचा शॉक लागला व तिने जोराची किंचाळी मारली. आपल्या मुलीची किंचाळी ऐकू आल्याने रूपालीच्या आईने रूपालीला विजेचे करंट लागल्याचे लक्षात आले. आपल्या मुलीला वाचविण्यासाठी रुपालीच्या आईने रुपालीला सोडविण्याचा प्रयत्न केला असता तीही विजेच्या धक्क्याने फेकली गेली. भांबावलेल्या अवस्थेत कसे तरी रुपालीच्या आईने मोटारीचे बटन बंद केले. त्यानंतर रुपालीचा विजेपासून संपर्क तुटला व ती जमिनीवर डोक्यावर येऊन पडली. शेजाऱ्यांना व गल्लीत ही घटना समजली असता तात्काळ रुपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु रूपालीला डोक्याला जबर मार लागल्याने तेथील १०८ रुग्ण वाहिकेवरील डॉक्टरांनी रूपालीला मृत घोषित केले.

*प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत संताप

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या कित्येक वर्षांपासून फक्त नावालाच उरले असून येथील व परिसरातील जनतेला नेहमीच मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजही रूपालीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे नेहमीप्रमाणे वैद्यकीय अधिकारी नव्हते. जे डॉक्टर रुजू झाले तेही आपल्या खाजगी कामानिमित्त रजेवर आहेत. त्यामुळे रूपालीवर प्राथमिक उपचारही झाला नाही. तेथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी तीची तपासणी केली असता तीला मृत घोषित करण्यात आले. अशीच परिस्थिती बऱ्याचदा येथे उदभवत असते व रुग्णांना आरोग्य सेवेअभावी जीव गमवावा लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना संपूर्ण कल्पना असूनदेखील या गंभीर व जनतेच्या जीवावर उठणाऱ्या प्रश्नाकडे ग्रामीण रुग्णालयाच्या नावाखाली दुर्लक्ष का केले जात आहे? याबाबत जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

* घरातील कर्ती मुलगी गेल्याने हळहळ

रुपाली हीचे वडील तीन-चार वर्षांपूर्वी मरण पावले. आपला पती अचानक आपल्याला व आपल्या मुलं बाळांना सोडून गेल्याने रुपालीच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर रुपालीची आईची मनस्थिती खराब झाली. रुपालीची आई सतत आजारी राहू लागली. रूपलीला तीन बहिणी व एक सहा ,सात वर्षाचा भाऊ असल्याने गेल्या दोन तीन वर्षांपासून वडिलांच्या मृत्यूनंतर व आईच्या आजारपणानंतर संपुर्ण जबाबदारी रुपाली व तीच्या मोठ्या बहिणीवर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी शाळाही सोडली व आईसह बहीण, भावासाठी काम करून कुटुंब सांभाळू लागली. अत्यन्त कमी वयात आपल्या आजारी आईसह बहीण, भावांना सांभाळणाऱ्या रुपालीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बंजारा समाजात व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.