ETV Bharat / state

पावसाने दडी मारल्यामुळे नंदुरबारमधील शेतकरी चिंताग्रस्त

author img

By

Published : Jul 20, 2019, 4:57 PM IST

उगवून आलेल्या पिकांवर कमी पावसामुळे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनस्तरावरून योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी नवापूर तहसील कार्यालयात नागरिकांनी निवेदन देऊन आंदोलन केले.

नवापूर तहसील कार्यालयात शेतकऱयांनी निवेदन दिले

नंदुरबार - पावसाची नाराजी शेतकऱ्याच्या जीवावर उठली आहे. सुरुवातीला आलेल्या पावसाने आता मात्र, दगा दिल्याचे चित्र खानदेशात दिसत आहे. खरिपाची पेरणी झाल्यानंतर अजूनही पाऊस येण्याची चिन्ह दिसत नसल्याने पीक वाया जाणार आहे. या दिवसेंदिवस होत चाललेल्या गंभीर परिस्थितीमुळे तात्काळ उपाययोजना करावी यासाठी नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

नवापूर तहसील कार्यालयात शेतकऱयांनी निवेदन दिले

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तसेच पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांनी मका, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुर, भात आणि मुग अशा खरीप पिकांची लागवड केली आहे. मात्र, उगवून आलेल्या पिकांवर कमी पावसामुळे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शासनस्तरावरून योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी नवापूर तहसील कार्यालयात नागरिकांनी निवेदन देऊन आंदोलन केले.

नंदुरबार - पावसाची नाराजी शेतकऱ्याच्या जीवावर उठली आहे. सुरुवातीला आलेल्या पावसाने आता मात्र, दगा दिल्याचे चित्र खानदेशात दिसत आहे. खरिपाची पेरणी झाल्यानंतर अजूनही पाऊस येण्याची चिन्ह दिसत नसल्याने पीक वाया जाणार आहे. या दिवसेंदिवस होत चाललेल्या गंभीर परिस्थितीमुळे तात्काळ उपाययोजना करावी यासाठी नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

नवापूर तहसील कार्यालयात शेतकऱयांनी निवेदन दिले

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तसेच पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांनी मका, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुर, भात आणि मुग अशा खरीप पिकांची लागवड केली आहे. मात्र, उगवून आलेल्या पिकांवर कमी पावसामुळे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शासनस्तरावरून योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी नवापूर तहसील कार्यालयात नागरिकांनी निवेदन देऊन आंदोलन केले.

Intro:नंदुरबार, नवापूर तालुक्यात कमी पावसामुळे पीक धोक्यात आली आहे तसेच लिसन दिवस पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे यावर शासनाने तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आंदोलन करण्यात आले

Anchor :- नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि पावसाचा जून आणि जुलै चा अर्धा महिना उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे ज्या शेतकऱ्यांनी मका उडीद सोयाबीन कापूस ज्वारी तुर भात मुग पिकांची लागवड केली आहे आहे परंतु कमी पावसामुळे पिकांवर रोग कारक अळींचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे तसेच शहर आणि ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे त्यामुळे शासनस्तरावरून योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी आदी मागण्यांसाठी नवापूर तहसील कार्यालयात निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.Body:VConclusion:V
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.