ETV Bharat / state

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी; उद्धव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

author img

By

Published : Nov 5, 2019, 5:03 PM IST

परतीच्या पावसाने नुसकान झालेल्या शेतीची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. लोहा तालुक्यात जानापुरी, आंबेसांगवी तर कंधार तालुक्यात किरोडा, घोडज, या गावातील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी भेटी दिल्या.

उद्धव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

नांदेड - शेतकऱ्यांनी धीर सोडू नये शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असा दिलासा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

हेही वाचा - शेतकरी दुहेरी संकटात: ओल्या कापसाला २५ रुपये किलो भाव, कापूस वेचण्यास मजूर मिळेनात

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. लोहा तालुक्यात जानापुरी, आंबेसांगवी तर कंधार तालुक्यात कीरोडा, घोडज, या गावातील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी भेटी दिल्या. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची करणार पाहणी

यावेळी ठाकरे यांनी तत्काळ मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. पीक विमा, बँकांशी संबंधित अडचणी आणि प्रशासकीय अडचणी मदत केंद्राच्या माध्यमातून सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नांदेड - शेतकऱ्यांनी धीर सोडू नये शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असा दिलासा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

हेही वाचा - शेतकरी दुहेरी संकटात: ओल्या कापसाला २५ रुपये किलो भाव, कापूस वेचण्यास मजूर मिळेनात

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. लोहा तालुक्यात जानापुरी, आंबेसांगवी तर कंधार तालुक्यात कीरोडा, घोडज, या गावातील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी भेटी दिल्या. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची करणार पाहणी

यावेळी ठाकरे यांनी तत्काळ मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. पीक विमा, बँकांशी संबंधित अडचणी आणि प्रशासकीय अडचणी मदत केंद्राच्या माध्यमातून सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Intro:कंधार- शेतकऱ्यांनी धीर सोडूनये शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असा दिलासा देत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. आस्मानी संकटात झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी ओल्या दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या वृद्ध शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्या समोर टाहो फोडलाBody:कीरोडा येथील पीडित शेतकऱ्यांनी फोडला हंबर्डा...
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी; उद्धव ठाकरे यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा
------------
कंधार- शेतकऱ्यांनी धीर सोडूनये शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असा दिलासा देत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. आस्मानी संकटात झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी ओल्या दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या वृद्ध शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्या समोर टाहो फोडला.
परतीच्या पावसाने नुसकान झालेल्या शेतीची पहाणी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि लोहा आले होते. लोहा तालुक्यात जानापुरी, आंबेसांगवी तर कंधार तालुक्यात कीरोडा, घोडज, या गावातील शेतकऱ्यांना भेटी दिल्या. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतीच्या पाहणीसाठी आलेल्या आलेल्या सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर कंधार तालुक्यातील कीरोडा येथील शेतकऱ्यांने हंबर्डा फोडला. यावेळी शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांनी काळजी करूनये. आता रडायचं नाही तर लढायचं अश्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. ठाकरे यांनी तात्काळ मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांना दिले. पीकविमा, बँकांशी संबंधित अडचणी आणि प्रशासकीय अडचणी मदत केंद्राच्या माध्यमातून सोडवाव्यात अश्या सूचना येवेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, माजी खा. चंद्रकांत खैरे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.