ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; दोन गावे 'संसर्ग क्षेत्र' जाहीर - नांदेड बर्ड फ्लू न्यूज

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिजेच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे.

पोल्ट्री फार्म
पोल्ट्री फार्म
author img

By

Published : Jan 17, 2021, 12:06 AM IST

Updated : Jan 17, 2021, 1:42 AM IST

नांदेड - राज्यातील काही जिल्ह्यासह नांदेडमधील काही गावांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच बर्ड फ्लूचा अधिक प्रादुर्भाव इतर भागात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.


बिलोली तालुक्यातील मौजे हूनगुंदा येथे 8 जानेवारीला 2 कावळे व 9 जानेवारीला 3 कावळे व 1 बगळा मृत आढळून आले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता घेत पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष उपाययोजना व पथके स्थापन केली होती. 11 जानेवारीला माहूर तालुक्यातील मौजे पापलवाडी येथे 4 कुक्कुट व 3 कावळे व कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथे 8 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. तर किनवट तालुक्यात 12 जानेवारी रोजी मौजे तल्हारी येथे 9 कुक्कुट व 13 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथे 5 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. हे मृत पक्षी पशुसंवर्धन विभागातर्फे पुणे येथील रोग अन्वेषण विभाग व भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था येथे रोग निदानासाठी पाठविण्यात आले होते.

नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरका
दोन गावे संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित बर्ड फ्लूच्या तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगण्याविषयी सूचित केले आहे. पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून नमुने तपासणीचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. कावळे एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 8 ) व कुक्कुट पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 1 ) या स्ट्रेनकरिता पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नावंद्याचीवाडी (ता.कंधार) व पापलवाडी (ता. माहुर) येथे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार 'संसर्गग्रस्त क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत. पक्षी नष्ट करण्याची कार्यवाहीबर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिजेच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत विभाग व जलसंपदा विभाग यांना लेखी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावात, जलाशय याठिकाणी कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी अन्य स्थलांतरित पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक आढळल्यास तात्काळ निदर्शनास आणण्याबाबत आवाहन केले आहे.मृत पक्ष्यांना हात लावू नयेमर्तूकीबाबत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी. मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये. तसेच परस्पर विल्हेवाट लावू नये. पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्यावतीने जिल्हास्तरीय एक व तालुकस्तरीय 32 जलद प्रतिसाद पथक (आरआरटी ) कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातून कुठेही नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक आढळून आल्यास तात्काळ भेट देऊन रोग निदानासाठी नमुने गोळा करण्यात येत आहेत.अफवा पसरवू नयेबर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय महितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले. अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व कुक्कुट मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे.जिल्ह्यातील सर्व स्तरावर 'रॅपिड रिस्पॉन्स टीम'जिल्हाधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्वस्तरावर 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' नेमणूक करण्यात आली आहे. भोकर तालुक्यात तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी हे तालुक्यातील प्रत्येक पोल्ट्री फार्मवर भेट देत पाहणी देत आहेत. पक्षी मृत आढळल्यास तत्काळ पशुसंवर्ध विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन भोकर तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दीपक बचेंती यांनी केले आहे.

नांदेड - राज्यातील काही जिल्ह्यासह नांदेडमधील काही गावांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच बर्ड फ्लूचा अधिक प्रादुर्भाव इतर भागात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.


बिलोली तालुक्यातील मौजे हूनगुंदा येथे 8 जानेवारीला 2 कावळे व 9 जानेवारीला 3 कावळे व 1 बगळा मृत आढळून आले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता घेत पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष उपाययोजना व पथके स्थापन केली होती. 11 जानेवारीला माहूर तालुक्यातील मौजे पापलवाडी येथे 4 कुक्कुट व 3 कावळे व कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथे 8 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. तर किनवट तालुक्यात 12 जानेवारी रोजी मौजे तल्हारी येथे 9 कुक्कुट व 13 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथे 5 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. हे मृत पक्षी पशुसंवर्धन विभागातर्फे पुणे येथील रोग अन्वेषण विभाग व भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था येथे रोग निदानासाठी पाठविण्यात आले होते.

नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरका
दोन गावे संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित बर्ड फ्लूच्या तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगण्याविषयी सूचित केले आहे. पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून नमुने तपासणीचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. कावळे एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 8 ) व कुक्कुट पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 1 ) या स्ट्रेनकरिता पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नावंद्याचीवाडी (ता.कंधार) व पापलवाडी (ता. माहुर) येथे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार 'संसर्गग्रस्त क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत. पक्षी नष्ट करण्याची कार्यवाहीबर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिजेच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत विभाग व जलसंपदा विभाग यांना लेखी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावात, जलाशय याठिकाणी कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी अन्य स्थलांतरित पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक आढळल्यास तात्काळ निदर्शनास आणण्याबाबत आवाहन केले आहे.मृत पक्ष्यांना हात लावू नयेमर्तूकीबाबत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी. मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये. तसेच परस्पर विल्हेवाट लावू नये. पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्यावतीने जिल्हास्तरीय एक व तालुकस्तरीय 32 जलद प्रतिसाद पथक (आरआरटी ) कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातून कुठेही नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक आढळून आल्यास तात्काळ भेट देऊन रोग निदानासाठी नमुने गोळा करण्यात येत आहेत.अफवा पसरवू नयेबर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय महितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले. अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व कुक्कुट मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे.जिल्ह्यातील सर्व स्तरावर 'रॅपिड रिस्पॉन्स टीम'जिल्हाधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्वस्तरावर 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' नेमणूक करण्यात आली आहे. भोकर तालुक्यात तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी हे तालुक्यातील प्रत्येक पोल्ट्री फार्मवर भेट देत पाहणी देत आहेत. पक्षी मृत आढळल्यास तत्काळ पशुसंवर्ध विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन भोकर तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दीपक बचेंती यांनी केले आहे.
Last Updated : Jan 17, 2021, 1:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.