ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष : शेतकऱ्याला लॉकडाऊनमध्ये टोमॅटोंनी दिला आधार; शिवारातूनच होतेय विक्री!

author img

By

Published : Sep 29, 2020, 8:30 PM IST

Updated : Sep 29, 2020, 8:42 PM IST

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याला टोमॅटो पिकाने आधार दिला आहे. त्याच्या शेत शिवारातूनच टोमॅटोची विक्री होत आहे. नांदेड जिल्ह्यातील सुनील कदम असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी सुनील कदम
शेतकरी सुनील कदम

नांदेड - लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याला कवडीमोल दर लागल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाला शेतात नासाडी झाला तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यातच जिल्ह्यातील पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्याला मात्र लॉकडाऊन मध्येही टमाट्याच्या शेतीने आधार दिला आहे. थेट शेतातूनच विक्री होत आहे.

'ईटीव्ही भारत' विशेष : शेतकऱ्याला लॉकडाऊनमध्ये टोमॅटोंनी दिला आधार; शिवारातूनच होतेय विक्री!

अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म.) येथील तरुण शेतकरी सुनील कदम यांचे नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर शेत असून जून महिन्यात दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. आता ती काढणीस सुरुवात झाली आहे. तर टोमॅटोला चांगला दर मिळू लागल्याने दोन एकरात सात ते आठ लाखाचे उत्पादन अपेक्षित आहेत. टमाट्यातून भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याला आधार दिला आहे.

अर्धापूर तालुक्यात बहुतांशी शेतकरी केळी, ऊस, कापूस आणि सोयाबीन यासारखे पारंपरिक पिके घेतात. ईसापूर धरणाच्या पाण्यावर संपूर्ण तालुका ओलीताखाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करतात. तर अनेक शेतकरी भाजीपाला पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. उन्हाळ्यात लग्न समारंभ व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.पण सदरील कार्यक्रम बंद असल्याने भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळाल्याने अनेक शेतकरी भाजीपाला पिकांकडे पाठ फिरवली होती.

नुकसान होऊनही नाउमेद न होता टमाट्याची केली लागवड

पार्डी (म.) येथील तरुण शेतकरी सुनील कदम यांच्याकडे वीस एकर जमीन आहे. तीन एकर क्षेत्रात अद्रक पाच एकरमध्ये पपई होती. लॉकडाऊनमध्येच पपई काढणीस आली होती. मात्र, पपई खरेदीदार मिळाला नसल्याने पपई झाडावरच नासाडी झाली होती. त्यावेळी त्यांना पाच ते सात लाखाचे नुकसान झाले होते. तरी नाउमेद होता जून महिन्यात दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. आता टमाटेला ४० ते ५० रुपये दर मिळत असल्याने तीन लाखाचे उत्पन्न मिळविले आहे

थेट शेतातूनच टमाट्याची होतेय विक्री....!

नांदेड-नागपूर रस्त्यालगत शेती असल्याने त्यांनी रस्त्यावर टोमॅटो विक्री सुरू केले आहे. रोज 20 ते 25 कॅरेट माल निघत आहे. नांदेड व परिसरात 10 ते 15 कॅरेट विक्रीसाठी पाठवले जाते. तर दहा कॅरेट स्वत: रस्त्यावर विक्री सुरू आहे. तसेच रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासाना ताजे टमाटे मिळत असल्याने प्रवाशी दोन ते तीन किलो खरेदी करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात जाग्यावरच विक्री होत असून ग्राहकांना कमी भावात मिळत आहे. त्यासोबतच मलाही मार्केटचा भाव मिळत असल्याचे तरुण शेतकरी सुनिल संभाजीराव कदम यांनी सांगितले.

नांदेड - लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याला कवडीमोल दर लागल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाला शेतात नासाडी झाला तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यातच जिल्ह्यातील पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्याला मात्र लॉकडाऊन मध्येही टमाट्याच्या शेतीने आधार दिला आहे. थेट शेतातूनच विक्री होत आहे.

'ईटीव्ही भारत' विशेष : शेतकऱ्याला लॉकडाऊनमध्ये टोमॅटोंनी दिला आधार; शिवारातूनच होतेय विक्री!

अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म.) येथील तरुण शेतकरी सुनील कदम यांचे नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर शेत असून जून महिन्यात दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. आता ती काढणीस सुरुवात झाली आहे. तर टोमॅटोला चांगला दर मिळू लागल्याने दोन एकरात सात ते आठ लाखाचे उत्पादन अपेक्षित आहेत. टमाट्यातून भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याला आधार दिला आहे.

अर्धापूर तालुक्यात बहुतांशी शेतकरी केळी, ऊस, कापूस आणि सोयाबीन यासारखे पारंपरिक पिके घेतात. ईसापूर धरणाच्या पाण्यावर संपूर्ण तालुका ओलीताखाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करतात. तर अनेक शेतकरी भाजीपाला पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. उन्हाळ्यात लग्न समारंभ व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.पण सदरील कार्यक्रम बंद असल्याने भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळाल्याने अनेक शेतकरी भाजीपाला पिकांकडे पाठ फिरवली होती.

नुकसान होऊनही नाउमेद न होता टमाट्याची केली लागवड

पार्डी (म.) येथील तरुण शेतकरी सुनील कदम यांच्याकडे वीस एकर जमीन आहे. तीन एकर क्षेत्रात अद्रक पाच एकरमध्ये पपई होती. लॉकडाऊनमध्येच पपई काढणीस आली होती. मात्र, पपई खरेदीदार मिळाला नसल्याने पपई झाडावरच नासाडी झाली होती. त्यावेळी त्यांना पाच ते सात लाखाचे नुकसान झाले होते. तरी नाउमेद होता जून महिन्यात दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. आता टमाटेला ४० ते ५० रुपये दर मिळत असल्याने तीन लाखाचे उत्पन्न मिळविले आहे

थेट शेतातूनच टमाट्याची होतेय विक्री....!

नांदेड-नागपूर रस्त्यालगत शेती असल्याने त्यांनी रस्त्यावर टोमॅटो विक्री सुरू केले आहे. रोज 20 ते 25 कॅरेट माल निघत आहे. नांदेड व परिसरात 10 ते 15 कॅरेट विक्रीसाठी पाठवले जाते. तर दहा कॅरेट स्वत: रस्त्यावर विक्री सुरू आहे. तसेच रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासाना ताजे टमाटे मिळत असल्याने प्रवाशी दोन ते तीन किलो खरेदी करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात जाग्यावरच विक्री होत असून ग्राहकांना कमी भावात मिळत आहे. त्यासोबतच मलाही मार्केटचा भाव मिळत असल्याचे तरुण शेतकरी सुनिल संभाजीराव कदम यांनी सांगितले.

Last Updated : Sep 29, 2020, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.