ETV Bharat / state

शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना

author img

By

Published : Feb 11, 2020, 10:17 AM IST

हिंगणी येथील हबीब नवाब यांच्या शेतातील २५ क्विंटल तरीची गंज जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

pigeon pea crop were burnt
शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना

नांदेड - माहूर तालुक्यातील हिंगणी गावातील शेतात कापून ठेवलेल्या पंचवीस क्विंटल तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना घडली. यात हबीब नवाब या शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. तुरीच्या गंजी जाळण्याचे प्रकार वाढल्याने हिंगणी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी या बाबत तहसील, पोलीस ठाण्यात आज (सोमवारी) सामूहिक अर्ज देऊन नुकसान भरपाई देत तत्काळ आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.

शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना

हेही वाचा - नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

हिंगणी येथे हबीब नवाब यांची (सर्वे क्र 174) शेती आहे. ते दररोज फुलसावंगी येथून हिंगनी येथे येऊन शेती करतात. शेतात उभी तूर वाळल्याने त्यांनी कापून गंजी लावून शेतात ठेवली होती. काल (रविवारी) सायंकाळी हिंगणी येथून त्यांना गावकऱ्यांनी तुमच्या तुरीच्या गंजीला आग लागल्याचा दूरध्वनी केला त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने गावकरी ही हतबल झाले.

आगीमध्ये सर्व तुरीच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. उपस्थित गावकऱ्यांनी ही आग कुणीतरी जळाऊ वृत्तीने लावल्याचा निष्कर्ष काढून या आधीही अश्या घटना घडल्या असून, त्या आरोपींचा शोध न लागल्याने पुन्हा अश्या घटना घडू नये यासाठी सरपंच, उपसरपंच सह सर्व गावकऱ्यांनी नवाब यांना नुकसान भरपाई देत तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी तक्रारवजा निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक माहूर यांच्याकडे केली आहे. दिलेल्या तक्रारीत 60 ते 70 स्थानिक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

नांदेड - माहूर तालुक्यातील हिंगणी गावातील शेतात कापून ठेवलेल्या पंचवीस क्विंटल तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना घडली. यात हबीब नवाब या शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. तुरीच्या गंजी जाळण्याचे प्रकार वाढल्याने हिंगणी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी या बाबत तहसील, पोलीस ठाण्यात आज (सोमवारी) सामूहिक अर्ज देऊन नुकसान भरपाई देत तत्काळ आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.

शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना

हेही वाचा - नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

हिंगणी येथे हबीब नवाब यांची (सर्वे क्र 174) शेती आहे. ते दररोज फुलसावंगी येथून हिंगनी येथे येऊन शेती करतात. शेतात उभी तूर वाळल्याने त्यांनी कापून गंजी लावून शेतात ठेवली होती. काल (रविवारी) सायंकाळी हिंगणी येथून त्यांना गावकऱ्यांनी तुमच्या तुरीच्या गंजीला आग लागल्याचा दूरध्वनी केला त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने गावकरी ही हतबल झाले.

आगीमध्ये सर्व तुरीच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. उपस्थित गावकऱ्यांनी ही आग कुणीतरी जळाऊ वृत्तीने लावल्याचा निष्कर्ष काढून या आधीही अश्या घटना घडल्या असून, त्या आरोपींचा शोध न लागल्याने पुन्हा अश्या घटना घडू नये यासाठी सरपंच, उपसरपंच सह सर्व गावकऱ्यांनी नवाब यांना नुकसान भरपाई देत तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी तक्रारवजा निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक माहूर यांच्याकडे केली आहे. दिलेल्या तक्रारीत 60 ते 70 स्थानिक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

Intro:नांदेड : माहुरमध्ये २५ क्विंटल तुरीची राख !

- माहूर तालुक्यातील हिंगणी परिसरात तुरीच्या गंज्या जाळण्याचे प्रकार वाढले.
- पंचवीस कींटल तूर जाळली.
- गावकऱ्यांचा तहसील, पोलिस ठाण्यात सामूहिक अर्ज..

माहूर :- माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी येथे कापून शेतात ठेवलेल्या पंचवीस क्विंटल तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना घडली. यात
हबीब नवाब या शेतकऱ्या शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.माहूर तालुक्यातील हिंगणी परिसरात तुरीच्या गंज्या जाळण्याचे प्रकार वाढल्याने हिंगणी येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांनी या बाबत तहसील,पोलिस ठाण्यात आज दिनाक १० रोजी सामूहिक अर्ज देऊन नुकसान भरपाई देत तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.Body:मौजे हिंगणी येथे हबीब नवाब यांची सर्वे क्र 174 त्यांच्या नावाने शेती आहे. ते दररोज फुलसावंगी येथून हिंगनी येथे येऊन शेती करतात. शेतात उभी तूर वाळल्याने त्यांनी कापून गंजी लावून शेतात ठेवली होती.
काल सायंकाळी हिंगणी येथून त्यांना गावकऱ्यांनी तुमच्या तुरीच्या गंजीला आग लागल्याचा दूरध्वनी केला त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने गावकरी ही हतबल झाले.Conclusion:या आगीत सर्व तुरीच्या पेंढ्या जळून खाक झाल्या.उपस्थित गावकऱ्यांनी ही आग कुणीतरी जळाऊ वृत्तीने लावल्याचा निष्कर्ष काढून या आधीही अश्या घटना घडल्या असून त्या आरोपींचां शोध न लागल्याने पुन्हा अश्या घटना घडू नये यासाठी सरपंच, उपसरपंच सह सर्व गावकऱ्यांनी नवाब यांना नुकसान भरपाई देत तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी तक्रार वजा निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक माहूर यांचे कडे केली आहे.दिलेल्या तक्रारीत 60 ते 70 स्थानिक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.