नांदेड - तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे दिनांक 28 जानेवारी रोजी 34 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली. भदन्त इन्दवन्श महाथेरो यांच्या हस्ते सकाळी धम्मपरिषद परिसरामध्ये पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्मदेसना देताना भदंत इन्दवन्श महाथेरो बोलत होते. महाकारुणिक तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पूजला ? आणि किती प्रचार-प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार -विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला.
शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म उपयुक्त
भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी तथागत भगवान बुद्धाने मानव कल्याणासाठी बुद्धधम्म दिला, असे सांगितले. पंचशील तत्वे, आर्यअष्टांगिक मार्ग अनुसरणामुळे जीवनातून दुःखाचा ऱ्हास होण्यास मोठी मदत मिळते. त्याचबरोबर शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म अतिशय उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.
तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा जीवनमार्ग आहे- पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो - पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो बातमी
महाकारूणिक तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पुजला ? आणि किती प्रचार-प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार -विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला.

नांदेड - तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे दिनांक 28 जानेवारी रोजी 34 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली. भदन्त इन्दवन्श महाथेरो यांच्या हस्ते सकाळी धम्मपरिषद परिसरामध्ये पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्मदेसना देताना भदंत इन्दवन्श महाथेरो बोलत होते. महाकारुणिक तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पूजला ? आणि किती प्रचार-प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार -विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला.
शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म उपयुक्त
भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी तथागत भगवान बुद्धाने मानव कल्याणासाठी बुद्धधम्म दिला, असे सांगितले. पंचशील तत्वे, आर्यअष्टांगिक मार्ग अनुसरणामुळे जीवनातून दुःखाचा ऱ्हास होण्यास मोठी मदत मिळते. त्याचबरोबर शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म अतिशय उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.