ETV Bharat / state

कामाच्या शोधात गेलेले नांदेडचे मजूर तेलंगणात अडकले; खाण्या-पिण्याची सोय करण्याची मागणी

author img

By

Published : Mar 31, 2020, 5:57 PM IST

तालुक्यातील दोन हजार मजूर तेलंगणात रोजगार शोधण्यासाठी गेले होते. तेथे मिरची तोडण्याचे काम देखील त्यांना मिळाले, मात्र दि. 24 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा फटका या मजुरांना बसला आहे. तालुक्यातील तब्बल दोन हजार मजूर तेलंगणातील कोठागूडूम जिल्ह्यात अडकले आहेत.

नांदेड
नांदेड

नांदेड - हाताला काम नसल्याने मुखेड तालुक्यातील दोन हजार मजूर तेलंगणात रोजगार शोधण्यासाठी गेले होते. तेथे मिरची तोडण्याचे काम देखील त्यांना मिळाले, मात्र दि. 24 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा फटका या मजुरांना बसला आहे. तालुक्यातील तब्बल दोन हजार मजूर तेलंगणातील कोठागूडूम जिल्ह्यात अडकले आहेत. यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत.

मुखेड तालुका हा डोंगराळ भाग आहे. या भागात वाडी-तांड्यांची संख्या जास्त आहे. येथील बंजारा बांधव शेतीची कामे उरकून रोजगारासाठी इतर ठिकाणी काम शोधतात. तेलंगणाच्या कोठागूडूम जिल्हयातील मिरची खूप प्रसिद्ध आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार मजूर मिरची तोडणीसाठी तिकडे गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे यांचा रोजगार बंद झाला आहे. या मिरची कामगारांना प्रतिकिलो 7 ते 8 रुपये मजुरी मिळते. एक कामगार रोज 500 ते 600 रुपये कमावतो. साधारणपणे तीन महिन्यांसाठी हे काम असते.

मजूर
मजूर

तालुक्यातील रत्ना तांडा, जिरगा तांडा, प्रकाशनगर, बाऱ्हाळी होनवडज, होनवडज तांडा, मन्नू तांडा, तारदरतांडा, देवला तांडा या गावातील हे मजूर असून त्यांना आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

नांदेड
मजूर

तेलंगणात अडकलेल्या कामगारांना जीवनाश्यक वस्तू, अन्नधान्य यांची सोय करावी व त्यांना घरी आणण्यासाठी खमंग व कोठागूडूम जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधावा, अशी मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

नांदेड - हाताला काम नसल्याने मुखेड तालुक्यातील दोन हजार मजूर तेलंगणात रोजगार शोधण्यासाठी गेले होते. तेथे मिरची तोडण्याचे काम देखील त्यांना मिळाले, मात्र दि. 24 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा फटका या मजुरांना बसला आहे. तालुक्यातील तब्बल दोन हजार मजूर तेलंगणातील कोठागूडूम जिल्ह्यात अडकले आहेत. यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत.

मुखेड तालुका हा डोंगराळ भाग आहे. या भागात वाडी-तांड्यांची संख्या जास्त आहे. येथील बंजारा बांधव शेतीची कामे उरकून रोजगारासाठी इतर ठिकाणी काम शोधतात. तेलंगणाच्या कोठागूडूम जिल्हयातील मिरची खूप प्रसिद्ध आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार मजूर मिरची तोडणीसाठी तिकडे गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे यांचा रोजगार बंद झाला आहे. या मिरची कामगारांना प्रतिकिलो 7 ते 8 रुपये मजुरी मिळते. एक कामगार रोज 500 ते 600 रुपये कमावतो. साधारणपणे तीन महिन्यांसाठी हे काम असते.

मजूर
मजूर

तालुक्यातील रत्ना तांडा, जिरगा तांडा, प्रकाशनगर, बाऱ्हाळी होनवडज, होनवडज तांडा, मन्नू तांडा, तारदरतांडा, देवला तांडा या गावातील हे मजूर असून त्यांना आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

नांदेड
मजूर

तेलंगणात अडकलेल्या कामगारांना जीवनाश्यक वस्तू, अन्नधान्य यांची सोय करावी व त्यांना घरी आणण्यासाठी खमंग व कोठागूडूम जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधावा, अशी मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.