ETV Bharat / state

जे काम आम्ही हाती घेतले आहे, त्याचे उद्घाटनसुद्धा आम्हीच करतो - अमित शाह

author img

By

Published : Jan 2, 2020, 11:15 PM IST

अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन्ही विभाग एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र, आजपर्यंत या विभागांना सक्षम करण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले.

nagpur
अमित शहा

नागपूर- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन क्षेत्र सदैव दुर्लक्षित राहिल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिली आहे. गृहमंत्री शहा आज नागपुरात नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या दोन्ही क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, अग्निशमन विभाग हा राज्य सरकारांचा विषय असल्याने त्याच्या विकासात अनेक मर्यादा येत असल्याचे अमित शाह म्हणाले. अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन्ही विभाग एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र, आजपर्यंत या विभागांना सक्षम करण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले.

शाहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या राष्ट्रीय प्रकल्पांसाठी पाहिले सरकार योजना आखत असायची. तर, दुसरे सरकार त्याला निधी उपलब्ध करवून द्यायचे आणि तिसरेच सरकार त्या प्रकल्पाचे उद्घाटन करत असे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये तसे होत नाही. आम्ही सुरू केलेले काम निर्धारित वेळेत पूर्ण करून त्याचे लोकार्पण देखील आम्हीच करत असल्याचा दावा करत अमित शाह यांनी काँग्रेस सरकारच्या कामावर प्रहार केला.

२०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही विषयाला गती देण्याचे काम केले आहे. ज्यामुळे आज ४ वर्षातच आपल्या देशाने जगातील सर्वात उत्कृष्ट नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणारे पथके तयार केल्याचा दावा केला आहे. या करिता त्यांनी नेपाळ येथील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताच्या एनडीआरएफने केलेल्या कामाचा दाखला दिला.

हेही वाचा- 'मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर अन् ४० टक्के घेणारे तिघे वर्गात'

नागपूर- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन क्षेत्र सदैव दुर्लक्षित राहिल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिली आहे. गृहमंत्री शहा आज नागपुरात नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या दोन्ही क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, अग्निशमन विभाग हा राज्य सरकारांचा विषय असल्याने त्याच्या विकासात अनेक मर्यादा येत असल्याचे अमित शाह म्हणाले. अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन्ही विभाग एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र, आजपर्यंत या विभागांना सक्षम करण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले.

शाहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या राष्ट्रीय प्रकल्पांसाठी पाहिले सरकार योजना आखत असायची. तर, दुसरे सरकार त्याला निधी उपलब्ध करवून द्यायचे आणि तिसरेच सरकार त्या प्रकल्पाचे उद्घाटन करत असे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये तसे होत नाही. आम्ही सुरू केलेले काम निर्धारित वेळेत पूर्ण करून त्याचे लोकार्पण देखील आम्हीच करत असल्याचा दावा करत अमित शाह यांनी काँग्रेस सरकारच्या कामावर प्रहार केला.

२०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही विषयाला गती देण्याचे काम केले आहे. ज्यामुळे आज ४ वर्षातच आपल्या देशाने जगातील सर्वात उत्कृष्ट नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणारे पथके तयार केल्याचा दावा केला आहे. या करिता त्यांनी नेपाळ येथील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताच्या एनडीआरएफने केलेल्या कामाचा दाखला दिला.

हेही वाचा- 'मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर अन् ४० टक्के घेणारे तिघे वर्गात'

Intro:भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन क्षेत्र सदैव दुर्लक्षित राहिल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे,ते आज नागपुरात नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते...केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यापासून या दोन्ही क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्रयत्न जात असले तरी अग्निशमन विभाग हा राज्य सरकारांच्या विषय असल्याने अनेक मर्यादा येत असल्याचं अमित शहा म्हणाले आहेत Body:अग्निशमन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे दोन्ही विभाग एकमेकांशी संबंधित आहेत....मात्र आज पर्यंत या विभागांना सक्षम करण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत असा दावा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले..ते म्हणाले की काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या राष्ट्रीय प्रकल्पांसाठी पाहिले सरकार योजना आखत असायची तर दुसरे सरकार त्याला निधी उपलब्ध करवून द्यायचे आणि तिसरेच सरकार त्या प्रकल्पाचे उदघाटन करत असे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मध्ये तसे होत नाही,आम्ही सुरू केलेले काम निर्धारित वेळेत पूर्ण करून त्याचे लोकार्पण देखील आम्हीच करत असल्याचा दावा करत अमित शहा यांनी काँग्रेस सरकारांच्या कामावर प्रहार केला...2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही विषयाला गती देण्याचे काम केले आहे,ज्यामुळे आज 4 वर्षातच आपल्या देशाने जगातील सर्वात उत्कृष्ट नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणारे पथके तयार केल्याचा दावा केला आहे,या करिता त्यांनी नेपाळ येथील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताच्या NDRF ने केलेल्या कामाचा दखला देखील दिला

बाईट- अमित शहा- केंद्रीय गृहमंत्री


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.