ETV Bharat / state

Navatpa Day 2 : नवतपाच्या दुसऱ्या दिवशी 'हा' शहर ठरला सर्वाधिक उष्ण!

author img

By

Published : May 26, 2022, 6:42 PM IST

'नवतपा'ला ( Navatpa started in Nagpur Vidarbha and Central India ) सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण नऊ दिवस, या नऊ दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावर पारा जरी कमी दाखवत असला तरी उत्तरेकडील अनेक राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो. नवतपाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान मालेगावमध्ये नोंदवण्यात आले आहे.

Navatpa Day 2
Navatpa Day 2

नागपूर - एकीकडे मान्सूनसाठी ( Monsoon in India ) भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे नागपूरसह विदर्भ आणि मध्यभारतात 'नवतपा'ला ( Navatpa started in Nagpur Vidarbha and Central India ) सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण नऊ दिवस, या नऊ दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावर पारा जरी कमी दाखवत असला तरी उत्तरेकडील अनेक राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो. नवतपाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान मालेगावमध्ये नोंदवण्यात आले आहे.

असा राहिला दुसरा दिवस :

मुंबई - 34.2

पुणे - 35.6

औरंगाबाद - 34.11

नाशिक - 34.6

महाबळेश्वर - 27.2

जळगाव - 29.4

चंद्रपूर - 41.2

अमरावती - 40.8

रत्नागिरी - 32.8

बुलडाणा - 33.71

मालेगाव - 39.11

सोलापूर - 36

वर्धा - 40.8

नवतपा म्हणजे नेमके काय ? : दरवर्षी 24 ते 25 मे दरम्यान नवतपाला सुरुवात होते. नवतपाच्या काळात पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतो. सूर्य ज्यावेळी 15 दिवसांकरिता रोहिणी नक्षत्रात येतो, त्यातील सुरुवातीच्या नऊ दिवसाला नवतपा, असे म्हटले जाते.

नवतपा संदर्भात 'या' आहेत मान्यता : पावसाळ्याची दशा आणि दिशा कशी राहील हे ठरवण्यासाठी नवतपाच्या नऊ दिवसांना फार महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये पाऊस किंवा थंड वारे नसल्यास मानसूनचा पाऊस चांगला होईल आणि या दिवसात पाऊस आला तर मान्सूनचा प्रवास अडथळ्यांचा असेल अशी मान्यता आहे.

हेही वाचा - Navatpa 2022 : सर्वाधिक उष्ण 'नवतपा'ला प्रारंभ; काय आहे नवतपा? वाचा, सविस्तर...

नागपूर - एकीकडे मान्सूनसाठी ( Monsoon in India ) भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे नागपूरसह विदर्भ आणि मध्यभारतात 'नवतपा'ला ( Navatpa started in Nagpur Vidarbha and Central India ) सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण नऊ दिवस, या नऊ दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावर पारा जरी कमी दाखवत असला तरी उत्तरेकडील अनेक राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो. नवतपाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान मालेगावमध्ये नोंदवण्यात आले आहे.

असा राहिला दुसरा दिवस :

मुंबई - 34.2

पुणे - 35.6

औरंगाबाद - 34.11

नाशिक - 34.6

महाबळेश्वर - 27.2

जळगाव - 29.4

चंद्रपूर - 41.2

अमरावती - 40.8

रत्नागिरी - 32.8

बुलडाणा - 33.71

मालेगाव - 39.11

सोलापूर - 36

वर्धा - 40.8

नवतपा म्हणजे नेमके काय ? : दरवर्षी 24 ते 25 मे दरम्यान नवतपाला सुरुवात होते. नवतपाच्या काळात पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतो. सूर्य ज्यावेळी 15 दिवसांकरिता रोहिणी नक्षत्रात येतो, त्यातील सुरुवातीच्या नऊ दिवसाला नवतपा, असे म्हटले जाते.

नवतपा संदर्भात 'या' आहेत मान्यता : पावसाळ्याची दशा आणि दिशा कशी राहील हे ठरवण्यासाठी नवतपाच्या नऊ दिवसांना फार महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये पाऊस किंवा थंड वारे नसल्यास मानसूनचा पाऊस चांगला होईल आणि या दिवसात पाऊस आला तर मान्सूनचा प्रवास अडथळ्यांचा असेल अशी मान्यता आहे.

हेही वाचा - Navatpa 2022 : सर्वाधिक उष्ण 'नवतपा'ला प्रारंभ; काय आहे नवतपा? वाचा, सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.