ETV Bharat / state

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मायबाप सरकार वाटाघाटीत व्यस्त...

author img

By

Published : Oct 30, 2019, 11:56 AM IST

Updated : Oct 30, 2019, 12:07 PM IST

विदर्भात सर्वत्र परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कापूस, धान, तूर सोबतच इतर पिकांचीसुद्धा नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या संकटाचा सामना करतच जगायचं का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नागपूर - राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि कापूस, सोयाबीन सारखे हाती आलेले पीक खराब झाले. हे पीक कापणी करून बाजारात विकायला नेण्याआधीच पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी अंधारातच गेली असली तरी राजकारणी मात्र सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी पाऊस उशिरा झाल्याने पेरणीला उशीरा सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर परिस्थिती चांगली झाली आणि पिके दिसायला लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. कापसाचे पीक चांगले येईल, दिवाळी साजरी होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.

विदर्भात सर्वत्र परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याचे चित्र आहे. कुठे सोयाबीन लोळायला लागला तर कुठे कापसाची बोंड काळवंडली, काही फुटली आणि कापूस खराब झाला. धान ओले होऊन त्याला कोंब आले तर, तूर सोबतच इतर पिकांचीसुद्धा नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या संकटाचा सामना करतच जगायचं का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरची संपत्ती जप्त

कधी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, आस्मानी संकट तर कधी अवकाळी पाऊस असे सगळे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. तर, पिकांच्या नुकसानभरपाईसाठी शेतकरी आस लावून बसला असताना राजकारणी मात्र सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या बळीराजाची व्यथा कोणी ऐकणार का हा प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा - चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करा, आशिष देशमुख यांची भाजपकडे मागणी

नागपूर - राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि कापूस, सोयाबीन सारखे हाती आलेले पीक खराब झाले. हे पीक कापणी करून बाजारात विकायला नेण्याआधीच पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी अंधारातच गेली असली तरी राजकारणी मात्र सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी पाऊस उशिरा झाल्याने पेरणीला उशीरा सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर परिस्थिती चांगली झाली आणि पिके दिसायला लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. कापसाचे पीक चांगले येईल, दिवाळी साजरी होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.

विदर्भात सर्वत्र परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याचे चित्र आहे. कुठे सोयाबीन लोळायला लागला तर कुठे कापसाची बोंड काळवंडली, काही फुटली आणि कापूस खराब झाला. धान ओले होऊन त्याला कोंब आले तर, तूर सोबतच इतर पिकांचीसुद्धा नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या संकटाचा सामना करतच जगायचं का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरची संपत्ती जप्त

कधी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, आस्मानी संकट तर कधी अवकाळी पाऊस असे सगळे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. तर, पिकांच्या नुकसानभरपाईसाठी शेतकरी आस लावून बसला असताना राजकारणी मात्र सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या बळीराजाची व्यथा कोणी ऐकणार का हा प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा - चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करा, आशिष देशमुख यांची भाजपकडे मागणी

Intro:परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा केलाय...दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि कापूस सोयाबीन सारख हाती आलेलं पीक खराब झालं....कापणी करून बाजारात विकायला नेण्याआधी घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली...
Body:हे शेतकरी आहे गणेश खोवे यांनी आपल्या शेतात कपाशीचे पीक लावलं आधीच पाऊस उशिरा आल्याने पेरणीला उशीर झाला मात्र नंतरच्या काळात परिस्थिती चांगली झाली आणि पीक दिसायला लागला अपेक्षा वाढल्या कापूस हातात येईल दिवाळी साजरी होईल अशी अपेक्षा होती मात्र अवकाळी पाऊस आला आणि सगळं होत्याच नव्हतं केलं कापसाची बोंड तर लागली मात्र ती पावसामुळे काळवंडली , काही फुटली मात्र कापूस खराब झाला , पावसामुळे कापसाची बोंड गळली त्यामुळे आता फक्त झाड उभी राहिली...ही परिस्थिती फक्त याच शेतकऱ्याची नाही तर सर्वत्र तीच परिस्थिती आहे सोयाबीन काढणी ची वेळी आली मात्र पाऊस आला आणि सगळं नुकसान झालं , सोयाबीन पीक जमिनीशी लोळायला लागला , कापूस , तूर सोबतच इतर पिकांची सुद्धा नासाडी झाली त्यामुळे या शेतकऱ्यांना जी लागत लावली ती सुद्धा निघण्याची शक्यता कमी असल्याचं शेतकरी सांगतात...शेतकऱ्यांनी संकटांचा सामना करतच जगायचं का असा प्रश्न आता बळीराजा समोर आहे,कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ,कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट,अवकाळी पावसाने हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभे केले मात्र बळीराजा सरकार कडे अपेक्षेने पाहत आहे मात्र राजकारणी सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहे त्यामुळे या बळीराजा ची व्यथा कोणी ऐकणार का हा प्रश्न आहे

बाईट -मदन घुमनखेडे - शेतकरी
बाईट - चिंतामण प्रतीके

Conclusion:
Last Updated : Oct 30, 2019, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.