ETV Bharat / state

नागपुरात कोरोनाचे थैमान सुरु असताना ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस

author img

By

Published : Mar 18, 2021, 10:09 AM IST

Updated : Mar 18, 2021, 3:11 PM IST

अरबी समुद्र आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे एकत्र आल्याने विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार नागपूर शहरात आज सकाळी पाऊस झाला.

Nagpur Rain Update
नागपूर पाऊस अपडेट

नागपूर - नागपुरात सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवार रात्रीपासून शहरातील वातावरण ढगाळ होते. काही ठिकाणी जोराचा वाराही होता. आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नागपुरात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस झाला
हवामान खात्याने 18 ते 21 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्र आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे एकत्र येणार असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार नागपुरात पावसाला सुरुवात झाली. नागपुरात सकाळी पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असून काही भागात मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. मात्र, रब्बी हंगामातील काही पीके शेतात काढून टाकलेली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

नागपूर - नागपुरात सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवार रात्रीपासून शहरातील वातावरण ढगाळ होते. काही ठिकाणी जोराचा वाराही होता. आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नागपुरात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस झाला
हवामान खात्याने 18 ते 21 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्र आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे एकत्र येणार असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार नागपुरात पावसाला सुरुवात झाली. नागपुरात सकाळी पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असून काही भागात मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. मात्र, रब्बी हंगामातील काही पीके शेतात काढून टाकलेली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Last Updated : Mar 18, 2021, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.