ETV Bharat / state

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आपली ताकत दाखवेल - जयंत पाटील

author img

By

Published : Sep 11, 2019, 5:22 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा बुधवारी नागपुरात पोहचली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पक्षातील काही नेते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते व जनता ही शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन काम करत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी आपली शक्ती दाखवेल असे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील

नागपूर - पक्षातील काही नेते जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते व जनता ही शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन काम करत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी शक्ती दाखवेल असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

शिव स्वराज्य यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा बुधवारी नागपुरात पोहचली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेत्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांच्याशी भेट झाली आहे. तसेच याच विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी नेते रमेश बंग यांच्याशी देखील चर्चा झाली असून या मतदार संघातील उमेदवारीबाबत येत्या २-३ दिवसात तोडगा निघेल असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - आघाडीतही 'इनकमिंग'...भाजपचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?


तसेच भाजप व सेने मधील जुने कार्यकर्ते व नेते आमच्या संपर्कात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. परंतु मुख्यमंत्री फडणवीस साम-दाम-दंडाचा वापर करीत असल्याने संपर्कात असलेल्या इतर पक्षातील नेत्यांची नावे सांगणार नाही असेही पाटील यावेळी म्हणाले. तर, आघाडीत जागावाटप बाबत चर्चा सुरू असून ज्या उमेदवारांत निवडणून येण्याची क्षमता आहे अशांना उमेदवारी देण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.

नागपूर - पक्षातील काही नेते जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते व जनता ही शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन काम करत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी शक्ती दाखवेल असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

शिव स्वराज्य यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा बुधवारी नागपुरात पोहचली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेत्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांच्याशी भेट झाली आहे. तसेच याच विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी नेते रमेश बंग यांच्याशी देखील चर्चा झाली असून या मतदार संघातील उमेदवारीबाबत येत्या २-३ दिवसात तोडगा निघेल असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - आघाडीतही 'इनकमिंग'...भाजपचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?


तसेच भाजप व सेने मधील जुने कार्यकर्ते व नेते आमच्या संपर्कात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. परंतु मुख्यमंत्री फडणवीस साम-दाम-दंडाचा वापर करीत असल्याने संपर्कात असलेल्या इतर पक्षातील नेत्यांची नावे सांगणार नाही असेही पाटील यावेळी म्हणाले. तर, आघाडीत जागावाटप बाबत चर्चा सुरू असून ज्या उमेदवारांत निवडणून येण्याची क्षमता आहे अशांना उमेदवारी देण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.

Intro:पक्षातील काही नेते भलेही पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते व जनता शरद पवार व राष्ट्रवादीच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन काम करीत असल्याने येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी शक्ती दाखवेल असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.Body:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा आज नागपुरात पोहचली... नागपुरात आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार अमोल कोल्हे आदी नेत्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले... यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते... नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांचेशी भेट झाली आहे... तसेच याच विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी नेते रमेश बंग यांचेशी देखील चर्चा झाली आहे... या मतदार संघातील उमेदवारीबाबत येत्या दोन-तीन दिवसात तोडगा निघेल असेही जयंत पाटील यांनी सांगितले... तसेच भाजप व सेने मधील जुने कार्यकर्ते व नेते आमच्या संपर्कात असल्याची माहिती पाटील यांनी दिली... परंतु मुख्यमंत्री फडणवीस साम,दाम,दंडाचा वापर करीत असल्याने संपर्कात असलेल्या इतर पक्षातील नेत्यांची नावे सांगणार नाही असेही पाटील यावेळी बोलले... आघाडीत जागावाटप बाबत चर्चा सुरु असून ज्या उमेदवारांत निवडणून येण्याची क्षमता आहे अशांना उमेदवारी देण्यात येईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

बाईट -- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.