नागपूर : यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी (pollution free Diwali) व्हावी. म्हणून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आगळा वेगळा यशस्वी प्रयत्न केला जातो आहे. बारुद (दारुगोळा) भरलेल्या फटाक्यांची आतिषबाजी करण्याऐवजी बीज रूपातील फटाके तयार करून त्यांचा निशुल्क वाटप करण्यास सुरुवात झाली( seed crackers instead of gunpowder crackers) आहे. आगळे- वेगळे असलेले हे फटाके आपल्या पर्यावरण संवर्धनासाठी फार महत्वाचे सिद्ध होणार आहेत.
प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण. दीपोत्सवाचा हा ऐतिहासिक पर्व अविस्मरणीय ठरवण्यासाठी प्रत्येकजण मनसोक्त फटाके फोडून आनंद साजरा करीत असतात. मात्र, फटाके फोडतांना ध्वनी आणि वायू प्रदूषणही फार मोठ्या प्रमाणात होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्राम आर्ट्स प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून अभिनव प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
फटाक्यांमध्ये बीज : दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्यामुळे ग्राम आर्ट्स प्रकल्पाने चक्क फटाक्याच्या रुपात विविध भाजी-पाल्याचे बीज तयार केले आहे. सुतळी बॉम्ब,अनार, रस्सी, चक्कर, लाल फटाके, रॉकेटसह विविध 10 फटाक्यांमध्ये गवार, मिरची, भेंडी, टमाटर, पपई, गोबी, कांदे , आलू, लसूण सह अनेक भजीपाल्यांचे बीज टाकल्या टाकण्यात आले आहेत. नागरिकांनी फटाके फोडण्यापेक्षा पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करून आपल्या घरी फटक्याच्या रुपात विविध बीज लावावे, यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
हुबेहूब दिसणारे बीज फटाके : अतिशय आकर्षक, हुबेहूब फटाक्यांसारखेच सारखे दिसणारे हे बीजरुपी फटाके (Seed Crackers) सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. बीजरूपी फटाक्यांना संपूर्ण देशातून मागणी होत असून ग्राम आर्ट्स प्रकल्पाने यासाठी विशिष्ट बॉक्स तयार केले आहे. तब्बल 1 लाख बीजरूपी फटाके यंदा तयार करण्यात आले (innovative experiments Use seed crackers) आहे.
तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर यश : महाराष्ट्रच्या सीमेवरील नागपूर जिल्ह्यातील पारडसिंग, केळवद, सातौनासह काही गावात ग्राम आर्ट्स संस्थेच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या पर्यावरण पूरक प्रकल्पाला महाराष्ट्रातील अनेक गावातील शेकडो हात पर्यावरण पूरक दिवाळीकरिता पुढे आले आहे. पर्यावरणाचा संवर्धनासाठी, त्याचा रक्षणासाठी गेल्या तीन वर्षांपासून ग्राम आर्ट्स प्रकल्पाला आता काही प्रमाणात का होईना, यश येत असल्याचे दिसत आहे.
200 लोकांना रोजगार : या प्रकल्पामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश येथील 8 गावातील तब्बल 200 लोकांना रोजगार मिळाला असून विद्यार्थीनी, युवती या पर्यावरण पूरक विचारांकडे आकर्षित होत आहे. नागरिकांनी फटख्याचा रुपात आपल्या घरी विविध भाजीपाले, फळांची बीज लावावे आणि पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले जात (innovative experiments) आहे.