ETV Bharat / state

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणारे वैद्यकीय उपचार आवश्यक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 10:39 PM IST

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणारे वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. कोविड सारख्या साथीच्या रोगांनी मजबूत आरोग्य व्यवस्थेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्‍वभूमीवर देशाला वैद्यकीय संशोधन, आरोग्य सेवेच्या क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन मुर्मू यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या नागपुरात बोलत होत्या.

Droupadi Murmu
Droupadi Murmu

नागपूर : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणारे वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. कोविड सारख्या साथीच्या रोगांनी मजबूत आरोग्य व्यवस्थेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागपूरला वैद्यकीय संशोधन, आरोग्य सेवेच्या क्षेत्रात देश अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं अवाहन केलं आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार : यावेळी महाविद्यालयांशी संबंधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी तसंच महाविद्यालयासाठी जमीन दान करणारे डॉ. बी.जे. सुभेदार, कर्नल डॉ. दिनकर कुकडे, रवी लिमये, डॉ.प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाचे डिजिटल पद्धतीनं उद्घाटनही करण्यात आलं. विशेष टपाल तिकिटाचं अनावरण देखील यावेळी करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्मरणिका, कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं.



आरोग्य सेवा परवडणाऱ्या असाव्यात : नवीन आधुनिक तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं वैद्यकीय क्षेत्रात नवं परिवर्तन घडवून आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी बोलताना केलं. डॉक्टरांची अपुरी संख्या आहे. त्यामुळं सर्वांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचं ध्येय गाठणं महत्त्वाचं आहे. जागतिक स्तरावर वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यात असमानता निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार जिल्हा रुग्णालयाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी मदत करत आहे. यामुळं प्रादेशिक असमतोल, शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास मदत होईल. विकासासोबतच परवडण्याजोगी आरोग्य सुविधा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य दस्तऐवज डिजीटल करण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असं मुर्मू म्हणाल्या.


अवयवदानाबाबत समाजात जागरुकता कमी : अवयवदानाबाबत समाजात पुरेशी जागरुकता नसल्यानं गरजू रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र त्यासोबतच अवैधरित्या अवयव विक्रीचे प्रकारही घडत असल्याबाबत खंत राष्ट्रपतींनी व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रानं अवयवदानासाठी जनजागृती करावी, तसंच मानसिक आरोग्याच्या समस्येचाही सहानूभूतीने विचार करावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलंय.

वैद्यकांची मोठी फळी : मध्य भारतात गेल्या 75 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा प्रदान करण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्पित भावनेनं काम करणाऱ्या वैद्यकांची मोठी फळी निर्माण केल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

मेडिकलचे कार्य प्रशंसनीय : वैद्यकीय महाविद्यालयाच्या नुतनीकरणासाठी शासनानं भरीव निधी दिल्याबद्दल समाधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नव्या सुविधांनी सुसज्ज होणारे रुग्णालय वाढती गरज भागवणार आहे. या महाविद्यालयानं नागपुरसह लगतच्या राज्यातही उल्लेखनीय वैद्यकीय सेवा दिली आहे. विशेषत: कोविडकाळातील योगदान प्रशंसनीय आहे. पूर्व विदर्भात सिकलसेल, थॅलेसेमियाचे रुग्ण लक्षणीय संख्येनं आढळून येतात. अमृत महोत्सवाचं औचित्य साधत लवकरच बोन मॅरो विषयक उपचार सुविधेची सुरुवात होणार आहे.

सेवाभाव जपत असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार : स्थापनेच्या वेळी आशियातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही देशातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असून या संस्थेनं अनेक नामवंत तज्ज्ञ उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाला नवं रूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सरकारनं 550 कोटींचा निधी दिला असून लवकरच त्याचा कायापालट होणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय म्हणून याला नवं रूप मिळणार आहे. त्याअंतर्गत शस्त्रक्रिया कक्ष, अद्ययावत उपकरणे, वसतिगृह, नवीन इमारती, क्रीडांगण, कॅन्सर इन्स्टिट्यूट आदी सुविधा उपलब्ध आहे. पुढील 50 वर्षांच्या गरजा या निमित्तानं पूर्ण होतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सर्वसामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे, असं फडणवीस म्हणाले.

बी.एसस्सी नर्सिग अ्भ्यासक्रम सुरू करण्यात येईल : दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्यात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची 1 हजार 432 पदं भरण्यात येणार आहेत. याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुरंसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. नवीन प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आशियाई विकास बँकेमार्फत 4000 कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये B.Sc नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. नर्सिंग, तंत्रनिकेतन, तांत्रिक संवर्गातील 5 हजार 182 पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच नियुक्ती पत्र दिलं जाईल, असं मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा -

  1. आमच्याशी दगाफटका करु नका नाहीतर जड जाईल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  2. अजित पवारांकडून लोकसभा मतदारसंघांची घोषणा; मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया
  3. निधीचा अपहार केल्याप्रकरणी हिरे बंधूंवर गुन्हा दाखल; अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

नागपूर : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणारे वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. कोविड सारख्या साथीच्या रोगांनी मजबूत आरोग्य व्यवस्थेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागपूरला वैद्यकीय संशोधन, आरोग्य सेवेच्या क्षेत्रात देश अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं अवाहन केलं आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार : यावेळी महाविद्यालयांशी संबंधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी तसंच महाविद्यालयासाठी जमीन दान करणारे डॉ. बी.जे. सुभेदार, कर्नल डॉ. दिनकर कुकडे, रवी लिमये, डॉ.प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाचे डिजिटल पद्धतीनं उद्घाटनही करण्यात आलं. विशेष टपाल तिकिटाचं अनावरण देखील यावेळी करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्मरणिका, कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं.



आरोग्य सेवा परवडणाऱ्या असाव्यात : नवीन आधुनिक तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं वैद्यकीय क्षेत्रात नवं परिवर्तन घडवून आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी बोलताना केलं. डॉक्टरांची अपुरी संख्या आहे. त्यामुळं सर्वांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचं ध्येय गाठणं महत्त्वाचं आहे. जागतिक स्तरावर वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यात असमानता निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार जिल्हा रुग्णालयाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी मदत करत आहे. यामुळं प्रादेशिक असमतोल, शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास मदत होईल. विकासासोबतच परवडण्याजोगी आरोग्य सुविधा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य दस्तऐवज डिजीटल करण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असं मुर्मू म्हणाल्या.


अवयवदानाबाबत समाजात जागरुकता कमी : अवयवदानाबाबत समाजात पुरेशी जागरुकता नसल्यानं गरजू रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र त्यासोबतच अवैधरित्या अवयव विक्रीचे प्रकारही घडत असल्याबाबत खंत राष्ट्रपतींनी व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रानं अवयवदानासाठी जनजागृती करावी, तसंच मानसिक आरोग्याच्या समस्येचाही सहानूभूतीने विचार करावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलंय.

वैद्यकांची मोठी फळी : मध्य भारतात गेल्या 75 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा प्रदान करण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्पित भावनेनं काम करणाऱ्या वैद्यकांची मोठी फळी निर्माण केल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

मेडिकलचे कार्य प्रशंसनीय : वैद्यकीय महाविद्यालयाच्या नुतनीकरणासाठी शासनानं भरीव निधी दिल्याबद्दल समाधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नव्या सुविधांनी सुसज्ज होणारे रुग्णालय वाढती गरज भागवणार आहे. या महाविद्यालयानं नागपुरसह लगतच्या राज्यातही उल्लेखनीय वैद्यकीय सेवा दिली आहे. विशेषत: कोविडकाळातील योगदान प्रशंसनीय आहे. पूर्व विदर्भात सिकलसेल, थॅलेसेमियाचे रुग्ण लक्षणीय संख्येनं आढळून येतात. अमृत महोत्सवाचं औचित्य साधत लवकरच बोन मॅरो विषयक उपचार सुविधेची सुरुवात होणार आहे.

सेवाभाव जपत असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार : स्थापनेच्या वेळी आशियातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही देशातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असून या संस्थेनं अनेक नामवंत तज्ज्ञ उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाला नवं रूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सरकारनं 550 कोटींचा निधी दिला असून लवकरच त्याचा कायापालट होणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय म्हणून याला नवं रूप मिळणार आहे. त्याअंतर्गत शस्त्रक्रिया कक्ष, अद्ययावत उपकरणे, वसतिगृह, नवीन इमारती, क्रीडांगण, कॅन्सर इन्स्टिट्यूट आदी सुविधा उपलब्ध आहे. पुढील 50 वर्षांच्या गरजा या निमित्तानं पूर्ण होतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सर्वसामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे, असं फडणवीस म्हणाले.

बी.एसस्सी नर्सिग अ्भ्यासक्रम सुरू करण्यात येईल : दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्यात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची 1 हजार 432 पदं भरण्यात येणार आहेत. याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुरंसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. नवीन प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आशियाई विकास बँकेमार्फत 4000 कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये B.Sc नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. नर्सिंग, तंत्रनिकेतन, तांत्रिक संवर्गातील 5 हजार 182 पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच नियुक्ती पत्र दिलं जाईल, असं मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा -

  1. आमच्याशी दगाफटका करु नका नाहीतर जड जाईल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  2. अजित पवारांकडून लोकसभा मतदारसंघांची घोषणा; मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया
  3. निधीचा अपहार केल्याप्रकरणी हिरे बंधूंवर गुन्हा दाखल; अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.