ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

author img

By

Published : Nov 6, 2019, 9:54 PM IST

पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी युवासैनिकांनी राज्यपालांकडे केली आहे.

राज्यपालांना पत्र देताना युवासैनिक

मुंबई - पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली.


महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ तसेच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी विनंती यावेळी युवासेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली. महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे कठीण झाले आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून युवासेनेच्या मागणीवर कार्यवाही करण्याची विनंती यावेळी राज्यपालांना केली.

मुंबई - पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली.


महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ तसेच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी विनंती यावेळी युवासेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली. महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे कठीण झाले आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून युवासेनेच्या मागणीवर कार्यवाही करण्याची विनंती यावेळी राज्यपालांना केली.

Intro:
मुंबई - पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली.
Body:महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठं तसेच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी विनंती यावेळी युवासेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली. महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून युवासेनेच्या मागणीवर कार्यवाही करण्याची विनंती यावेळी राज्यपालांना केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.