ETV Bharat / state

मुंबईत मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार - आशिष शेलार

पावसाने उघडीप दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. मतदारांचा उत्साह कायम राहिला, तर मुंबईत 50 ते 60 टक्क्यांपर्यंत मतदान होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला.

author img

By

Published : Oct 21, 2019, 11:10 AM IST

भाजप नेते आशिष शेलार

मुंबई - सगळीकडे पावसाने उघडीप दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. सकाळी मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदान केंद्रांचा आढावा घेतला.

मुंबईत मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार - आशिष शेलार

आशिष शेलार यांनी जवळपास 18-19 मतदान केंद्रांची पहाणी केली. या सगळ्याच मतदान केंद्रांवर 60 ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होत असल्याचे शेलारांनी सांगितले. मतदारांचा हा उत्साह कायम राहिला, तर मुंबईत 50 ते 60 टक्क्यांपर्यंत मतदान होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला. पावसाने उघडीप दिल्याने मतदानावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच सगळीच मतदान केंद्रे तळ मजल्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आपला निश्चित विजय होईल, असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला.


संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

मुंबई - सगळीकडे पावसाने उघडीप दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. सकाळी मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदान केंद्रांचा आढावा घेतला.

मुंबईत मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार - आशिष शेलार

आशिष शेलार यांनी जवळपास 18-19 मतदान केंद्रांची पहाणी केली. या सगळ्याच मतदान केंद्रांवर 60 ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होत असल्याचे शेलारांनी सांगितले. मतदारांचा हा उत्साह कायम राहिला, तर मुंबईत 50 ते 60 टक्क्यांपर्यंत मतदान होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला. पावसाने उघडीप दिल्याने मतदानावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच सगळीच मतदान केंद्रे तळ मजल्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आपला निश्चित विजय होईल, असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला.


संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

Intro:मुंबईत सगळीकडे पावसाने उघडीप दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा घेतला. यावेळी बोलताना लोकांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली असल्याचं सांगितलं.

आशिष शेलार यांनी जवळपास 18,19 मतदान केंद्रांची पहाणी केली. यात सगळ्याच मतदान केंद्रावर 60, 70, 80 टक्क्यांपर्यंत मतदान होत असल्याचं त्यांनी सांगितलं. हाच कल कायम राहिला तर मुंबईत 50 ते 60 टक्क्यांपर्यंत मतदान होऊ शकेल असा दावा त्यांनी केला आहे. पावसाने उघडीप दिल्याने त्याचा सकारात्मक परिणाम मतदानावर होईल असही ते म्हणाले. राज्यात इतर ठिकाणी पाऊस पडत असला तरीही राज्यातील मतदार पावसाची तमा न बाळगता नक्की बाहेर पडून मतदान करेल अस ते म्हणाले.

निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच सगळीच मतदान केंद्र तळ मजल्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होत असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर मतदारांचा अशाच प्रतिसाद कायम राहिला तर त्याचा फायला भाजपला होईल आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आपला मोठा विजय होईल असं त्यानी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.


Body:.


Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.