ETV Bharat / state

'मनसेच्या हिंदुत्वामागे शरद पवार, मनसे-भाजप एकत्र येणार नाही'

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मनसेने आयोजित केलेल्या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा नव्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे अनावरण केले. तसेच मनसेच्या पोस्टर्समध्ये महाराष्ट्र धर्माचा आणि हिंदवी स्वराज्याचा जयघोष करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jan 23, 2020, 5:16 PM IST

Vinod tawade
माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे

मुंबई - मनसेच्या हिंदुत्वामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येईल, अशी चर्चा जरी असली तरी यात तथ्य नाही, असेही तावडे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले.

विनोद तावडे, भाजप नेते

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मनसेने आयोजित केलेल्या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा नव्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे अनावरण केले. तसेच मनसेच्या पोस्टर्समध्ये महाराष्ट्र धर्माचा आणि हिंदवी स्वराज्याचा जयघोष करण्यात आला आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाकडे झुकत नव्याने राजकारण करण्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आहेत.

हेही वाचा - वांद्र्यात शिवसेनेच्या जल्लोषाची जोरदार तयारी

यावर प्रतिक्रिया देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी मतांचे राजकारण आहे. धर्मनिरपेक्ष मतांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समावेश होतो. तर हिंदुत्ववादी मतांमध्ये भाजप आणि शिवसेना आहे. आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून सत्ता मिळवली असल्याने हिंदुत्ववादी मतं सेनेपासून दूर गेली आहेत. ही हिंदुत्ववादी मतं थेट भाजपच्या पारड्यात जाऊ नयेत, याची काळजी चाणक्य शरद पवार घेत असल्याचे तावडे यांनी सांगितले.

सेनेपासून दुरावलेल्या हिंदुत्ववादी मतांना मनसेकडे वळवून भाजपला धक्का देण्याचा हा प्रकार असल्याचेही तावडे म्हणाले. मनसेने हिंदुत्ववादी राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी भाजप आणि मनसेच्या विचारधारेत मोठा फरक असल्याने हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - मनसेच्या हिंदुत्वामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येईल, अशी चर्चा जरी असली तरी यात तथ्य नाही, असेही तावडे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले.

विनोद तावडे, भाजप नेते

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मनसेने आयोजित केलेल्या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा नव्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे अनावरण केले. तसेच मनसेच्या पोस्टर्समध्ये महाराष्ट्र धर्माचा आणि हिंदवी स्वराज्याचा जयघोष करण्यात आला आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाकडे झुकत नव्याने राजकारण करण्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आहेत.

हेही वाचा - वांद्र्यात शिवसेनेच्या जल्लोषाची जोरदार तयारी

यावर प्रतिक्रिया देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी मतांचे राजकारण आहे. धर्मनिरपेक्ष मतांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समावेश होतो. तर हिंदुत्ववादी मतांमध्ये भाजप आणि शिवसेना आहे. आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून सत्ता मिळवली असल्याने हिंदुत्ववादी मतं सेनेपासून दूर गेली आहेत. ही हिंदुत्ववादी मतं थेट भाजपच्या पारड्यात जाऊ नयेत, याची काळजी चाणक्य शरद पवार घेत असल्याचे तावडे यांनी सांगितले.

सेनेपासून दुरावलेल्या हिंदुत्ववादी मतांना मनसेकडे वळवून भाजपला धक्का देण्याचा हा प्रकार असल्याचेही तावडे म्हणाले. मनसेने हिंदुत्ववादी राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी भाजप आणि मनसेच्या विचारधारेत मोठा फरक असल्याने हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:मनसेच्या हिंदुत्वा मागे शरद पवार, मनसे आणि भाजप एकत्र येणार नाही- विनोद तावडे

मुंबई 23

मनसेच्या हिंदुत्वामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येईल अशी चर्चा जरी असली तरी यात तथ्य नाही, असेही तावडे यांनी ईव्ही भारत सोबत बोलताना सांगितले.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मनसेने आयोजित केलेल्या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा नव्या भगव्या रंगाचा ध्वजाचे अनावरण केले. तसेच मनसेच्या पोस्टर्स मध्ये महाराष्ट्र धर्माचा आणि हिंदवी स्वराज्याचा जयघोष करण्यात आला आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाकडे झुकत नव्याने राजकारण करण्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी मतांचे राजकारण आहे. धर्मनिरपेक्ष मतांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समावेश होतो.तर हिंदुत्ववादी मतांमध्ये भाजप आणि शिवसेना आहे. आता शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून सत्ता मिळवली असल्याने हिंदुत्ववादी मतं सेने पासून दूर गेली आहेत. ही हिंदुत्ववादी मतं थेट भाजपच्या पारड्यात जाऊ नयेत याची काळजी चाणक्य शरद पवार घेत असल्याचे तावडे यांनी सांगितले.सेनेपासून दुरावलेल्या हिंदुत्ववादी मतांचा मनसे कडे वाळवून भाजपला धक्का देण्याचा हा प्रकार असल्याचे ही तावडे म्हणाले. मनसेने हिंदुत्ववादी राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी भाजप आणि मनसेच्या विचारधारेत मोठा फरक असल्याने हे दोन्ही पक्ष येतील असे वाटत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.