ETV Bharat / state

पवईतील बांगुर्डा तलावात बुडालेल्या दोन तरुणांचा मृत्यू

पवईतील बांगुर्डा तलावात बुधवारी दोन जण पोहण्यासठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. या तरुणांचा पोलीस व अग्निशमन दलाने शोध घेऊन बुधवारी एकाला व गुरुवारी दुसऱ्याला बाहेर काढले. या दोघांचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे

author img

By

Published : Jul 12, 2019, 7:58 AM IST

Updated : Jul 12, 2019, 9:17 AM IST

दोन तरूणांचा मृत्यू

मुंबई - पवई येथील बांगुर्डा तलावात बुधवारी दोन तरूण बुडाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा पोलीस व अग्निशमन दलाने शोध घेऊन बुधवारी एकाला व गुरुवारी दुसऱ्याला बाहेर काढले. दोघांचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. अजय बोट (१८), चैतन्य धिरंगे (३१) अशी मृतांची नावे आहेत.


बांगुर्डा तलावात बुधवारी दोन जण पोहायला उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचा शोध घेतला असता बुधावारी रात्री अजयचा शोध लागला. त्याला नजीकच्या होलिस्पिरीट रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले तर चैतन्य शोध सुरूच होता. चैतन्यला तलावातून गुरुवारी दुपारी बाहेर काढण्यात आले. त्याला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


पवईच्या मोरारजी नगरजवळच हा बांगुर्डा तलाव आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील जंगलात हा तलाव असून त्यात हे तरुण बुडाले. बुधवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली.

मुंबई - पवई येथील बांगुर्डा तलावात बुधवारी दोन तरूण बुडाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा पोलीस व अग्निशमन दलाने शोध घेऊन बुधवारी एकाला व गुरुवारी दुसऱ्याला बाहेर काढले. दोघांचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. अजय बोट (१८), चैतन्य धिरंगे (३१) अशी मृतांची नावे आहेत.


बांगुर्डा तलावात बुधवारी दोन जण पोहायला उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचा शोध घेतला असता बुधावारी रात्री अजयचा शोध लागला. त्याला नजीकच्या होलिस्पिरीट रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले तर चैतन्य शोध सुरूच होता. चैतन्यला तलावातून गुरुवारी दुपारी बाहेर काढण्यात आले. त्याला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


पवईच्या मोरारजी नगरजवळच हा बांगुर्डा तलाव आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील जंगलात हा तलाव असून त्यात हे तरुण बुडाले. बुधवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली.

Intro:मुंबई -- पवई येथील बांगुर्डा तलावांत बुधवारी दोन तरूण बुडाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा पोलीस व अग्निशमन दलाने शोध घेऊन बुधवारी एकाला व गुरुवारी दुस-याला बाहेर काढले ; मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले.
Body:बांगुर्डा तलावांत बुधवारी दोघेजण पोहायला उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेजण बुडाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन या दोघांचा शोध घेतला असता बुधावारी रात्री अजय बोट (१८) याचा शोध लागला मात्र त्याला नजीकच्या होलिस्पिरीट रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. तर दुसरी व्यक्ती चैतन्य धिरंगे (३१) याला तलावातून गुरुवारी दुपारी बाहेर काढून मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले असता त्यालाही डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. पवईच्या मोरारजी नगरजवळच हा बांगुर्डा तलाव आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात हा तलाव असून त्यात हे तरुण बुडाले. बुधवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. Conclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 9:17 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.