ETV Bharat / state

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची कामगिरी फेल; 1521 तक्रारींपैकी तब्बल 933 तक्रारी चौकशी न करताच रद्द - mumbai

1 जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 पर्यंत आलेल्या एकूण 1521 तक्रारींपैकी तब्बल 933 तक्रारींची फाईल पोलीस तक्रार प्राधिकरणकाकडून कुठलीही चौकशी न करता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने येणाऱ्या तक्रारी रद्द करण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची कामगिरी फेल
author img

By

Published : Jun 6, 2019, 4:55 PM IST

मुंबई - राज्यातील पोलिसांच्या विरुद्ध होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र 1 जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 पर्यंत आलेल्या एकूण 1521 तक्रारींपैकी तब्बल 933 तक्रारींची फाईल पोलीस तक्रार प्राधिकरणकाकडून कुठलीही चौकशी न करता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


राज्यात कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रारदारांचे जर समाधान होत नसेल तर यासाठी योग्य कारवाई व्हावी म्हणून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने येणाऱ्या तक्रारी रद्द करण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे.


2017 मध्ये पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे एकूण 649 तक्रारी दाखल झाल्या असून यात 196 तक्रारी प्राधिकरणाने निकालात काढलेल्या आहेत. मात्र 2018 या वर्षात प्राधिकरणाची कामगिरी उंचावलेली नसल्याचे माहिती अधिकाराखाली दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारला या संदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस तक्रार प्राधिकरणाने सांगितले आहे.


पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे काही तक्रारी क्षुल्लक कारणावरून केल्यामुळे, तर काही प्राधिकरणाच्या कक्षेत येत नसल्याने रद्द केल्या आहेत, असे प्राधिकरणाचे माजी आयपीएस अधिकारी पी. के. जैन यांनी सांगितले.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची कामगिरी फेल


पोलीस तक्रार प्राधिकरण
पोलीस तक्रार प्राधिकरणाचे मुंबईत 2 जानेवारी 2017 ला कामकाज सुरू झाले. पोलीस तक्रार प्राधिकरणाची सहा विभागात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक विभागाकडे 5-6 जिल्हे देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे प्राधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरले आहे.


नेमकं काय काम करतं राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण?
पोलीस महासंचालकांपर्यंत कोणत्याही दर्जाच्या अधिकाऱयाविरोधात प्राधिकरणाकडे तक्रार करता येते. पोलीस कोठडीतील मृत्यू, मारहाणीत दुखापत, बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न, बेकायदा ताब्यात घेणे, भ्रष्टाचार, खंडणी उकळणे, जमीन अथवा घर बळकावणे यासंदर्भातील तक्रार या प्राधिकरणाकडे करता येते. तक्रार गंभीर असेल आणि यात पोलीस दोषी आढळत असल्यास शिक्षेबाबत राज्य शासनाला कळविले जाते. शासनाच्या गृह विभागामार्फत संबंधित पोलीस अधिकाऱयावर पुढील कारवाई केली जाते. एखाद्या प्रकरणात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाला रिकव्हरी करण्याचेही सरकारला आदेश देता येतात. याचबरोबर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण ने केलेली शिफारस सरकारला बंधनकारक आहेत.

मुंबई - राज्यातील पोलिसांच्या विरुद्ध होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र 1 जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 पर्यंत आलेल्या एकूण 1521 तक्रारींपैकी तब्बल 933 तक्रारींची फाईल पोलीस तक्रार प्राधिकरणकाकडून कुठलीही चौकशी न करता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


राज्यात कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रारदारांचे जर समाधान होत नसेल तर यासाठी योग्य कारवाई व्हावी म्हणून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने येणाऱ्या तक्रारी रद्द करण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे.


2017 मध्ये पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे एकूण 649 तक्रारी दाखल झाल्या असून यात 196 तक्रारी प्राधिकरणाने निकालात काढलेल्या आहेत. मात्र 2018 या वर्षात प्राधिकरणाची कामगिरी उंचावलेली नसल्याचे माहिती अधिकाराखाली दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारला या संदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस तक्रार प्राधिकरणाने सांगितले आहे.


पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे काही तक्रारी क्षुल्लक कारणावरून केल्यामुळे, तर काही प्राधिकरणाच्या कक्षेत येत नसल्याने रद्द केल्या आहेत, असे प्राधिकरणाचे माजी आयपीएस अधिकारी पी. के. जैन यांनी सांगितले.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची कामगिरी फेल


पोलीस तक्रार प्राधिकरण
पोलीस तक्रार प्राधिकरणाचे मुंबईत 2 जानेवारी 2017 ला कामकाज सुरू झाले. पोलीस तक्रार प्राधिकरणाची सहा विभागात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक विभागाकडे 5-6 जिल्हे देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे प्राधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरले आहे.


नेमकं काय काम करतं राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण?
पोलीस महासंचालकांपर्यंत कोणत्याही दर्जाच्या अधिकाऱयाविरोधात प्राधिकरणाकडे तक्रार करता येते. पोलीस कोठडीतील मृत्यू, मारहाणीत दुखापत, बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न, बेकायदा ताब्यात घेणे, भ्रष्टाचार, खंडणी उकळणे, जमीन अथवा घर बळकावणे यासंदर्भातील तक्रार या प्राधिकरणाकडे करता येते. तक्रार गंभीर असेल आणि यात पोलीस दोषी आढळत असल्यास शिक्षेबाबत राज्य शासनाला कळविले जाते. शासनाच्या गृह विभागामार्फत संबंधित पोलीस अधिकाऱयावर पुढील कारवाई केली जाते. एखाद्या प्रकरणात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाला रिकव्हरी करण्याचेही सरकारला आदेश देता येतात. याचबरोबर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण ने केलेली शिफारस सरकारला बंधनकारक आहेत.

Intro:राज्यात कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रारदारांच जर समाधान होत नसेल तर या साठी योग्य कारवाई व्हावी म्हणून राज्यातील पोलिसांच्या विरुद्ध होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने येणाऱ्या तक्रारी रद्द करण्याचा जणू काही सपाटाच लावलाय आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या आकडेवारीनुअसर 1 जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 पर्यंत आलेल्या एकूण 1521 तक्रारींपैकी तब्बल 933 तक्रारींची फाईल पोलीस तक्रार प्राधिकरणकाकडून कुठलीही चौकशी न करता रद्द करण्यात आले आहेत. आता पर्यंत केवळ 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारला या संदर्भात कारवाई कारणासाठी पोलीस तक्रार प्राधिकरणाने सांगितले आहे.
Body:हायकोर्टावरचा ताण कमी व्हावा म्हणून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. भारतात नावाजलेली पोलीस म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडे पाहिलं जात . पण याच महाराष्ट्र पोलीस खात्यात महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा विषय 2008 पासून 2015 पर्यंत लालफितीत अडकला होता . २००८ साली सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही 2016 पर्यंत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली नव्हती. या वर लक्ष देत फडणवीस सरकारने उशिरा का होईना या समितीवर सदस्यांची नेमणुक केली .

सध्या या प्राधिकरणाची सहा विभागांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक विभागाकडे 5-6 जिल्हे देण्यात आले आहेत. या प्राधिकरणाच मुंबईत 2 जानेवारी 2017 ला कामकाज सुरु झाले असून अशा प्रकारचे प्राधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरले आहे. असे असले तरीही सध्या प्राधिकरणाकडून रद्द केलेल्या फाईल संख्या वाढतच जात आहे. या संदर्भात बोलताना प्राधिकरणाचे माजी आयपीएस अधिकारी पी के जैन यांनी म्हटले आहे की पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे काही तक्रारी क्षुल्लक कारणावरून केल्यामुळे, काही प्राधिकरणाच्या कक्षेत येत नसल्याने रद्द केले जात आहेत.

2017 च्या वर्षभरात पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे 649 तक्रारी दाखल झाल्या असून यात 196 तक्रारी प्राधिकरणाने निकालात काढलेल्या आहेत. मात्र 2018 च्या वर्षात प्राधिकरणाची कामगिरी उंचावलेली नसल्याचे माहिती अधिकाराखाली दिसून येत आहे. Conclusion:नेमकं कस काम करतय राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण-----

मानवअधिकार किंवा कोर्टात सुरु असलेली प्रकरणांची दखल घेतली जात नाही.

बाकिची प्राधिकरणं फक्त शिफारस करतं पण राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण ने केलेली शिफारस सरकारला बंधनकारक आहेत.

एखाद्या प्रकरणात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाला रिकव्हरी करण्याचेही सरकारला आदेश देता येतात.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण संस्थेचा कुणीही गैरवापर करता कामा नये, यासाठी तक्रारदाराकडून अॅफिडेव्हीट करुन घेतलं जातं.

प्राधिकरणाला सुमोटो दखल घेण्याचे अधिकार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.