ETV Bharat / state

'सुशांतसिंहच्या आत्महत्येवर चौकशी होत असताना, 'सामना'तून पोलिसांवर दबाव आणण्याचे कारण काय?'

author img

By

Published : Jun 28, 2020, 12:53 PM IST

राऊत यांच्या लेखावरून आमदार कदम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी, मुख्यमंत्री यांचे घरचे वृत्तपत्र असलेल्या सामनातून पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे आरोप केला. सामनातून आज जे राऊत यांनी लिहले आहे ते मुंबई पोलीस इतके दिवस चौकशी का करत आहेत असा प्रश्न उपस्थित करतं. हे प्रकरण मिटवण्यासाठी सामना पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा कदम यांचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचे कारण काय? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

sushant singh rajput suicide case :  bjp mla ram kadam criticized to sanjay raut
मुंबई पोलिसांवर 'सामना' दबाव निर्माण करत आहे का?, भाजपाचा राऊतांना सवाल

मुंबई - 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या 'रोखठोक सामना'तून सुशांतच्या आत्महत्येचे मार्केटिंग सुरू असल्याचा आरोप करत, आजच्या लेखात सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावर ताशेरे ओढले. यासोबत त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्यावर भाजपा आमदार राम कदम यांनी मुंबई पोलिसांवर 'सामना' दबाव निर्माण करत आहे का? असा सवाल विचारला आहे.

राम कदम बोलताना...
सामनातून संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्येचं मार्केटिंग सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'एखाद्याच्या मृत्यूचा किंवा आत्महत्येचा ‘उत्सव’ कसा साजरा होतो, एखाद्या आत्महत्येचेही ‘मार्केटिंग’ कसे केले जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणून सुशांत सिंह प्रकरणाकडे पाहता येईल.'

सुशांतच्या आत्महत्येचा केला जाणारा उत्सव आणि या प्रकरणाचे सुरु असणारे मार्केटिंग यावर राऊतांनी नाराजीचा सूर आळवत, हा सर्व प्रकार किमान आता तरी थांबवावा, असे म्हणत राज्यात होणाऱ्या इतर आत्महत्यांकडेही त्याच नजरेने पाहावे, असा आग्रह केला. काही प्रकरणांचे दाखले देत राऊतांनी मांडलेले हे मुद्दे पाहता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असून, हा खून नसल्याचे त्यांनी आपल्या लेखात नमूद केले आणि विविध विषय मांडत त्यांनी आज लेख लिहिला आहे.

राऊत यांच्या लेखावरून आमदार कदम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी, मुख्यमंत्री यांचे घरचे वृत्तपत्र असलेल्या सामनातून पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे आरोप केला. सामनातून आज जे राऊत यांनी लिहिले आहे, ते मुंबई पोलीस इतके दिवस चौकशी का करत आहेत असा प्रश्न उपस्थित करतं. हे प्रकरण मिटवण्यासाठी सामना पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा कदम यांचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचे कारण काय? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूवर शंका उपस्थित होत असून पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांचे जबाब नोंदवले आहे. सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मुंबई पोलिसांना मिळाला आहे. या अहवालावर पाच डॉक्टरांच्या टीमच्या स्वाक्षऱ्या असून सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - व्हिडिओ : राज्यात रविवारपासून सलून सुरू.. पाहा दुकानचालकांची तयारी

हेही वाचा - मेट्रो प्रकल्पातील मजूर पुन्हा मुंबईच्या वाटेवर; एमएमआरडीएचा जीव भांड्यात

मुंबई - 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या 'रोखठोक सामना'तून सुशांतच्या आत्महत्येचे मार्केटिंग सुरू असल्याचा आरोप करत, आजच्या लेखात सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावर ताशेरे ओढले. यासोबत त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्यावर भाजपा आमदार राम कदम यांनी मुंबई पोलिसांवर 'सामना' दबाव निर्माण करत आहे का? असा सवाल विचारला आहे.

राम कदम बोलताना...
सामनातून संजय राऊत काय म्हणाले?संजय राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्येचं मार्केटिंग सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'एखाद्याच्या मृत्यूचा किंवा आत्महत्येचा ‘उत्सव’ कसा साजरा होतो, एखाद्या आत्महत्येचेही ‘मार्केटिंग’ कसे केले जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणून सुशांत सिंह प्रकरणाकडे पाहता येईल.'

सुशांतच्या आत्महत्येचा केला जाणारा उत्सव आणि या प्रकरणाचे सुरु असणारे मार्केटिंग यावर राऊतांनी नाराजीचा सूर आळवत, हा सर्व प्रकार किमान आता तरी थांबवावा, असे म्हणत राज्यात होणाऱ्या इतर आत्महत्यांकडेही त्याच नजरेने पाहावे, असा आग्रह केला. काही प्रकरणांचे दाखले देत राऊतांनी मांडलेले हे मुद्दे पाहता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असून, हा खून नसल्याचे त्यांनी आपल्या लेखात नमूद केले आणि विविध विषय मांडत त्यांनी आज लेख लिहिला आहे.

राऊत यांच्या लेखावरून आमदार कदम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी, मुख्यमंत्री यांचे घरचे वृत्तपत्र असलेल्या सामनातून पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे आरोप केला. सामनातून आज जे राऊत यांनी लिहिले आहे, ते मुंबई पोलीस इतके दिवस चौकशी का करत आहेत असा प्रश्न उपस्थित करतं. हे प्रकरण मिटवण्यासाठी सामना पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा कदम यांचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचे कारण काय? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूवर शंका उपस्थित होत असून पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांचे जबाब नोंदवले आहे. सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मुंबई पोलिसांना मिळाला आहे. या अहवालावर पाच डॉक्टरांच्या टीमच्या स्वाक्षऱ्या असून सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - व्हिडिओ : राज्यात रविवारपासून सलून सुरू.. पाहा दुकानचालकांची तयारी

हेही वाचा - मेट्रो प्रकल्पातील मजूर पुन्हा मुंबईच्या वाटेवर; एमएमआरडीएचा जीव भांड्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.