ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; त्या गुन्ह्यातील याचिका फेटाळली

author img

By

Published : Mar 3, 2020, 1:12 PM IST

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन गुन्हे नागपूरमध्ये दाखल आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

supreme-court-rejected-petition-of-devendra-fadanavis
supreme-court-rejected-petition-of-devendra-fadanavis

मुंबई- माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. याविरोधात फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे.

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन गुन्हे नागपूरमध्ये दाखल आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

याप्रकरणी फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली आहे.

मुंबई- माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. याविरोधात फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे.

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन गुन्हे नागपूरमध्ये दाखल आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

याप्रकरणी फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.