ETV Bharat / state

NCP Vs Anjali Damania : अजित पवारांची भाजपशी जवळीक वाढली का? राष्ट्रवादीने अंजली दमानियांना लगावला टोला

सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर जर काही विपरीत निर्णय आला तर असा परिस्थिती भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांची मदत घेणार आणि सत्ता कायम ठेवणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. पवारांची भाजपची जवळीक वाढल्याची ही चर्चा आहे. मात्र ही केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दत्ताजीराव देसाई यांनी केला आहे.

author img

By

Published : Apr 13, 2023, 9:27 PM IST

Updated : Apr 13, 2023, 9:38 PM IST

राष्ट्रवादीचा अंजली दमानिया यांना टोला
NCP Vs Anjali Damania

मुंबई- राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलतापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पंधरा सहकारी लवकरच भाजपाच्या संपर्कात येतील, अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही आमदारांसोबत भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा पद्धतीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

अंजली दमानिया यांचे ट्विट ठरले कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच एक ट्विट केले होते. 15 आमदार अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या संपर्कात आहेत. राजकारण किती खालच्या पातळीला जातोय पाहूया असे ट्विट केले होते. या ट्विटमुळे राजाच्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नक्कीच काहीतरी होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी स्वतः या बातमीचे खंडन केले आहे. असे काहीही चित्र नाही. आपण काही कामानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटत असतो. यामध्ये जनतेच्या हिताचा अनेक प्रश्नांचा समावेश असतो. त्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये असे म्हटले आहे.



का झाली चर्चा सुरू? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसी व अदानी उद्योग समूहाबद्दल व्यक्त केलेली भूमिका या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपाशी जवळीक साधत आहे अशी चर्चा सुरू झाली. त्यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची राज्यातील काही प्रश्नांसाठी भेट घेतली होती. तसेच जरंडेश्वर साखर कारखाना चौकशीबाबत अजित पवार यांना अभय मिळावे यासाठी, भाजपची जवळीक साधली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दत्ताजीराव देसाई यांनी सांगितले की, अंजली दमानिया यांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. दमानिया यांनी त्यांचे कार्य करावे. मात्र जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल, अशा पद्धतीचे ट्विट करून समाजाची दिशाभूल करू नये. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्याच हेतूने जर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर काहीही गैर नाही. मात्र याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपची जवळीक आहे अशा पद्धतीची चर्चा करणे अयोग्य आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनीदेखील दिली होती प्रतिक्रिया संजय राऊत नुकतेच म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने भाजपसोबत जातील असे वाटत नाही. अजित पवार यांचे राजकीय भवितव्य राष्ट्रवादीसोबत उज्ज्वल आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे कारण नसून भाजपसोबत कधीच जाणार नाहीत. तसेच भाजपचे गुलामदेखील होणार नाहीत. अजित यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा-Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांचे भविष्य राष्ट्रवादीत उज्ज्वल, ते भाजपमध्ये जाणार नाहीत - संजय राऊत

मुंबई- राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलतापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पंधरा सहकारी लवकरच भाजपाच्या संपर्कात येतील, अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही आमदारांसोबत भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा पद्धतीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

अंजली दमानिया यांचे ट्विट ठरले कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच एक ट्विट केले होते. 15 आमदार अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या संपर्कात आहेत. राजकारण किती खालच्या पातळीला जातोय पाहूया असे ट्विट केले होते. या ट्विटमुळे राजाच्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नक्कीच काहीतरी होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी स्वतः या बातमीचे खंडन केले आहे. असे काहीही चित्र नाही. आपण काही कामानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटत असतो. यामध्ये जनतेच्या हिताचा अनेक प्रश्नांचा समावेश असतो. त्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये असे म्हटले आहे.



का झाली चर्चा सुरू? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसी व अदानी उद्योग समूहाबद्दल व्यक्त केलेली भूमिका या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपाशी जवळीक साधत आहे अशी चर्चा सुरू झाली. त्यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची राज्यातील काही प्रश्नांसाठी भेट घेतली होती. तसेच जरंडेश्वर साखर कारखाना चौकशीबाबत अजित पवार यांना अभय मिळावे यासाठी, भाजपची जवळीक साधली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दत्ताजीराव देसाई यांनी सांगितले की, अंजली दमानिया यांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. दमानिया यांनी त्यांचे कार्य करावे. मात्र जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल, अशा पद्धतीचे ट्विट करून समाजाची दिशाभूल करू नये. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्याच हेतूने जर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर काहीही गैर नाही. मात्र याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपची जवळीक आहे अशा पद्धतीची चर्चा करणे अयोग्य आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनीदेखील दिली होती प्रतिक्रिया संजय राऊत नुकतेच म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने भाजपसोबत जातील असे वाटत नाही. अजित पवार यांचे राजकीय भवितव्य राष्ट्रवादीसोबत उज्ज्वल आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे कारण नसून भाजपसोबत कधीच जाणार नाहीत. तसेच भाजपचे गुलामदेखील होणार नाहीत. अजित यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा-Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांचे भविष्य राष्ट्रवादीत उज्ज्वल, ते भाजपमध्ये जाणार नाहीत - संजय राऊत

Last Updated : Apr 13, 2023, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.