ETV Bharat / state

Maha Budget 2023 : राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; वाचा महत्वाचे मुद्दे

author img

By

Published : Mar 9, 2023, 6:03 PM IST

Updated : Mar 9, 2023, 8:09 PM IST

शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने अमृतकाल बजेट सादर केल्यानंतर अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकरी, महिला, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, इत्यादी घटकांसंबंधित राज्य सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Maha Budget Sessions 2023
अर्थसंकल्प

मुंबई : राज्य सरकारचा 2023-2024 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून हा अर्थसंकल्प साजरा केला. शिंदे-फडणवीस सरकार आणि फडणवीसांचा अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना विविध घटकांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील महत्वाच्या मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

Maha Budget 2023
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रूपये : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रूपये इतका वार्षिक निधी मिळणार असून सरकारतर्फे ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे.

महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट : शिंदे-फडणवीस सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत महिलांसाठी तिकिट दरात 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. महिलांसाठी चौथे सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना देखील करण्यात येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना अंतर्गत 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणार भरघोष शिष्यवृत्ती : राज्य सरकारतर्फे 5 ते 7 वी इयत्तेतील 1000 वरुन 5000 रुपये तर 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ : शिक्षणसेवकांना सरासरी 10 हजार रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांची 6000 वरून 16,000 तसेच माध्यमिक शिक्षण सेवकांची 8000 वरून 18,000 आणि उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांची 9,000 वरून 20,000 रूपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

मोदी आवास घरकुल योजना : राज्य सरकारतर्फे इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजनेचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मोदी आवास घरकुल आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 12,000 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार आहेत.

आरोग्य क्षेत्रातील भरीव तरतूदी : राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जनरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार येणार आहेत. राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने उभारले जाणार आहेत.

जलयुक्त शिवार पुन्हा सुरू : राज्यातील 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2.0 सुरु करण्यात येणार आहे. तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य सरकारची शक्तीसदन योजना : शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार येणार आहेत.

निराधार योजनेत वाढीव मदत : राज्य सरकारने संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये इतकी वाढ केली आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान केली जाणार आहे. राज्य सरकार या योजनेसाठी अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार असल्याचे अर्थमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मानधनात भरीव वाढ : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करण्यात आले आहे. तसेच गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये तसेच अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये इतके वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये तसेच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये इतके करण्यात आले आहे. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांची 20,000 पदे भरण्यात येणार आहेत.

लेकलाडकी योजना नव्या स्वरूपात : लेक लाडकी योजनेच्या नव्या स्वरूपात जन्मानंतर मुलीला 5000 रूपये, पहिलीत 4000 सहावीत 6000 रूपये अकरावीत 8000 तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रूपये इतके मिळणार आहेत. यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Maha Budget 2023 : खूशखबर! राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी लॉटरी; मिळणार 'इतके' रुपये

मुंबई : राज्य सरकारचा 2023-2024 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून हा अर्थसंकल्प साजरा केला. शिंदे-फडणवीस सरकार आणि फडणवीसांचा अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना विविध घटकांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील महत्वाच्या मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

Maha Budget 2023
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रूपये : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रूपये इतका वार्षिक निधी मिळणार असून सरकारतर्फे ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे.

महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट : शिंदे-फडणवीस सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत महिलांसाठी तिकिट दरात 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. महिलांसाठी चौथे सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना देखील करण्यात येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना अंतर्गत 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणार भरघोष शिष्यवृत्ती : राज्य सरकारतर्फे 5 ते 7 वी इयत्तेतील 1000 वरुन 5000 रुपये तर 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ : शिक्षणसेवकांना सरासरी 10 हजार रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांची 6000 वरून 16,000 तसेच माध्यमिक शिक्षण सेवकांची 8000 वरून 18,000 आणि उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांची 9,000 वरून 20,000 रूपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

मोदी आवास घरकुल योजना : राज्य सरकारतर्फे इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजनेचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मोदी आवास घरकुल आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 12,000 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार आहेत.

आरोग्य क्षेत्रातील भरीव तरतूदी : राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जनरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार येणार आहेत. राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने उभारले जाणार आहेत.

जलयुक्त शिवार पुन्हा सुरू : राज्यातील 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2.0 सुरु करण्यात येणार आहे. तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य सरकारची शक्तीसदन योजना : शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार येणार आहेत.

निराधार योजनेत वाढीव मदत : राज्य सरकारने संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये इतकी वाढ केली आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान केली जाणार आहे. राज्य सरकार या योजनेसाठी अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार असल्याचे अर्थमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मानधनात भरीव वाढ : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करण्यात आले आहे. तसेच गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये तसेच अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये इतके वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये तसेच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये इतके करण्यात आले आहे. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांची 20,000 पदे भरण्यात येणार आहेत.

लेकलाडकी योजना नव्या स्वरूपात : लेक लाडकी योजनेच्या नव्या स्वरूपात जन्मानंतर मुलीला 5000 रूपये, पहिलीत 4000 सहावीत 6000 रूपये अकरावीत 8000 तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रूपये इतके मिळणार आहेत. यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Maha Budget 2023 : खूशखबर! राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी लॉटरी; मिळणार 'इतके' रुपये

Last Updated : Mar 9, 2023, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.