ETV Bharat / state

कायद्याच्या राज्यावर पोलिसांची मात.. लोकांना हवं तेच घडल्याने झिंदाबादच्या घोषणा - शिवसेना

author img

By

Published : Dec 8, 2019, 1:41 PM IST

कायद्याचे राज्य कोलमडले आणि पोलिसांचे राज्य सुरु झाले, असे म्हणत शिवसेनेने हैदराबाद एन्काऊंटर घटनेचे समर्थन केले आहे. लोकांना हवे तेच झाल्याने पोलीस झिंजाबादच्या घोषणा दिल्याचे सेनेचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे.

Hyderbad encounter
लोकांना हवं तेच झाल्याने पोलीस झिंदाबादच्या घोषणा - शिवसेना

मुंबई - कायद्याचे राज्य कोलमडले आणि पोलिसांचे राज्य सुरु झाले, असे म्हणत शिवसेनेने हैदराबाद एन्काऊंटर घटनेचे समर्थन केले आहे. लोकांना हवे तेच झाल्याने पोलीस झिंजाबादच्या घोषणा दिल्याचे सेनेचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे. तसेच पोलिसांच्या कमरेवर लटकणारी पिस्तुले ही शोभेची खेळणी नसल्याचे पोलिसांनी दाखवून दिल्याचे सेनेने म्हटले आहे.

प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करुन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर करत ठार केले. या घटनेचे सेनेने समर्थन केले आहे. आता पोलिसांचे राज्य सुरु झाले असून, कायद्याने जे काम होत नाही ते अनेकदा कायदेशीर शस्त्राने होत असल्याचे सेनेने म्हटले आहे.

कायद्याच्या राज्यावर पोलिसांची मात

कायद्याचे राज्य आणि पांलिसांचे राज्य यात फरक आहे. प्रियंका रेड्डी प्रकरणात कायद्याच्या राज्यावर पोलिसांच्या राज्याने मात केले आहे. त्यामुळे पोलिसांनी लोकांना जे हवे तेच केल्याचे सेनेने म्हटले आहे.

अत्याचार विरोधी कायदा करण्यास सरकार अपयशी

अत्याचार विरोधी कडक कायदा करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत सेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. निर्भया ते प्रियंका या दरम्यान अत्याचाराची शेकडो प्रकरणे घडली. मात्र, त्यातील मोजकीच प्रकरणे समोर आली. अशा घटनांमुळे देशातील समाजव्यवस्था बिघडत आहे. केंद्र सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज होती. मात्र, सरकार अपयशी ठरल्याचे सेनेने म्हटले आहे.

संघ विचारांच्या लोकांची कारणे हास्यास्पद

संघ विचारांचे लोक अत्याचाराची जी कारणे सांगतात ती हास्यास्पद असल्याचे सेनेने म्हटले आहे. मुली तोकडी कपडे घालतात हे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे कारण असल्याचे संघी लोक म्हणत आहे. हे चुकीचे असल्याचे सेनेने म्हटले आहे. तसेच मुली मुलांशी फारच मोकळेपणाने वागतात, देश हिंदुराष्ट्र झाल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत. अशी कारणे संघी लोक देत आहेत. अत्याचार आणि हिंदुराष्ट्र याचा काय संबंध असे सेनेने म्हटले आहे.

मुंबई - कायद्याचे राज्य कोलमडले आणि पोलिसांचे राज्य सुरु झाले, असे म्हणत शिवसेनेने हैदराबाद एन्काऊंटर घटनेचे समर्थन केले आहे. लोकांना हवे तेच झाल्याने पोलीस झिंजाबादच्या घोषणा दिल्याचे सेनेचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे. तसेच पोलिसांच्या कमरेवर लटकणारी पिस्तुले ही शोभेची खेळणी नसल्याचे पोलिसांनी दाखवून दिल्याचे सेनेने म्हटले आहे.

प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करुन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर करत ठार केले. या घटनेचे सेनेने समर्थन केले आहे. आता पोलिसांचे राज्य सुरु झाले असून, कायद्याने जे काम होत नाही ते अनेकदा कायदेशीर शस्त्राने होत असल्याचे सेनेने म्हटले आहे.

कायद्याच्या राज्यावर पोलिसांची मात

कायद्याचे राज्य आणि पांलिसांचे राज्य यात फरक आहे. प्रियंका रेड्डी प्रकरणात कायद्याच्या राज्यावर पोलिसांच्या राज्याने मात केले आहे. त्यामुळे पोलिसांनी लोकांना जे हवे तेच केल्याचे सेनेने म्हटले आहे.

अत्याचार विरोधी कायदा करण्यास सरकार अपयशी

अत्याचार विरोधी कडक कायदा करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत सेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. निर्भया ते प्रियंका या दरम्यान अत्याचाराची शेकडो प्रकरणे घडली. मात्र, त्यातील मोजकीच प्रकरणे समोर आली. अशा घटनांमुळे देशातील समाजव्यवस्था बिघडत आहे. केंद्र सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज होती. मात्र, सरकार अपयशी ठरल्याचे सेनेने म्हटले आहे.

संघ विचारांच्या लोकांची कारणे हास्यास्पद

संघ विचारांचे लोक अत्याचाराची जी कारणे सांगतात ती हास्यास्पद असल्याचे सेनेने म्हटले आहे. मुली तोकडी कपडे घालतात हे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे कारण असल्याचे संघी लोक म्हणत आहे. हे चुकीचे असल्याचे सेनेने म्हटले आहे. तसेच मुली मुलांशी फारच मोकळेपणाने वागतात, देश हिंदुराष्ट्र झाल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत. अशी कारणे संघी लोक देत आहेत. अत्याचार आणि हिंदुराष्ट्र याचा काय संबंध असे सेनेने म्हटले आहे.

Intro:Body:

हैदराबाद एन्काऊंटर: लोकांना हवं तेच झाल्याने पोलीस झिंदाबादच्या घोषणा - शिवसेना



मुंबई -  कायद्याचे राज्य कोलमडले आणि पोलिसांचे राज्य सुरु झाले, असे म्हणत शिवसेनेने हैदराबाद एन्काऊंटर घटनेचे समर्थन केले आहे. लोकांना हवे तेच झाल्याने पोलीस झिंजाबादच्या घोषणा दिल्याचे सेनेचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे. तसेच पोलिसांच्या कमरेवर लटकणारी पिस्तुले ही शोभेची खेळणी नसल्याचे पोलिसांनी दाखवून दिल्याचे सेनेने म्हटले आहे.



प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करुन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर करत ठार केले. या घटनेचे सेनेने समर्थन केले आहे. आता पोलिसांचे राज्य सुरु झाले असून, कायद्याने जे काम होत नाही ते अनेकदा कायदेशीर शस्त्राने होत असल्याचे सेनेने म्हटले आहे. 



कायद्याच्या राज्यावर पोलिसांची मात

कायद्याचे राज्य आणि पांलिसांचे राज्य यात फरक आहे. प्रियंका रेड्डी प्रकरणात कायद्याच्या राज्यावर पोलिसांच्या राज्याने मात केले आहे. त्यामुळे पोलिसांनी लोकांना जे हवे तेच केल्याचे सेनेने म्हटले आहे.



अत्याचार विरोधी कायदा करण्यास सरकार अपयशी

अत्याचार विरोधी कडक कायदा करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत सेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. निर्भया ते प्रियंका या दरम्यान  अत्याचाराची शेकडो प्रकरणे घडली. मात्र, त्यातील मोजकीच प्रकरणे समोर आली. अशा घटनांमुळे देशातील समाजव्यवस्था बिघडत आहे. केंद्र सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज होती. मात्र, सरकार अपयशी ठरल्याचे सेनेने म्हटले आहे.



संघ विचारांच्या लोकांची कारणे हास्यास्पद

संघ विचारांचे लोक अत्याचाराची जी कारणे सांगतात ती हास्यास्पद असल्याचे सेनेने म्हटले आहे. मुले तोकडी कपडे घालतात हे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे कारण असल्याचे संघी लोक म्हणत आहे. हे चुकीचे असल्याचे सेनेने म्हटले आहे. तसेच मुली मुलांशी फारस मोकळेपणाने वागतात, देश हिंदुराष्ट्र झाल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत. अशी कारणे संघी लोक देत आहेत. अत्याचार आणि हिंदुराष्ट्र याचा काय संबंध असे सेनेने म्हटले आहे.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.