ETV Bharat / state

Salman Khan News: न्यायालयाने समन्स बजाविल्यानंतर सलमान खानची उच्च न्यायालयात धाव, ३० मार्चला होणार सुनावणी

author img

By

Published : Mar 24, 2023, 10:11 AM IST

एका पत्रकाराला धमकी दिल्या प्रकरणात अंधेरी न्यायालयाने सलमान खानला समन्स बजावले आहे. त्या विरोधात सलनान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर मुंबई उच्च न्यायालय 30 मार्च रोजी निर्णय घेणार आहे.

Salman Khan News
सलमान खानने घेतली उच्च न्यायालयात धाव

मुंबई : पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी हे प्रकरण 2019 मधील आहे. सलमान खान जेव्हा रस्त्यावर दिसला, तेव्हा काही पत्रकारांनी सलमान खानचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. सेलिब्रिटी असल्याने स्वाभाविक पत्रकारांनी कॅमेरा काढून काही फोटो काढले. तेव्हा सायकल चालवत असलेल्या सलमान खानने पत्रकाराकडील कॅमेरा हिसकवला. तसेच पत्रकारांसोबत गैरवर्तन देखील केले, असा आरोप ठेवत पत्रकाराने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात केवळ सलमान नव्हे तर त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख याचेही नाव घेतले गेले होते. त्यामुळे दोघेही कायदेशीर अडचणीत सापडले आहेत.


गैरवर्तन केले, असभ्य भाषेमध्ये बोलणे : अंधेरी न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या याचिकेनुसार समन्स बजावले होते. त्याबाबत सलमान खानने उच्च न्यायालयामध्ये त्या समन्स विरोधात धाव घेतली आहे. त्यामुळे आता 30 मार्च रोजी या प्रकरणात काय निर्णय होतो ते पहावे लागेल. सलमान खानने त्या पत्रकाराला धमकी देखील दिली होती, असभ्य भाषेत बोलला होता, असा देखील आरोप करीत पत्रकाराने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. सलमान खानसारख्या सेलिब्रिटीकडून ही अपेक्षा नव्हती. त्याचे कारण सेलिब्रिटींना जनता आणि मीडिया जेव्हा भेटते, त्यावेळेला त्याच्यासोबत संवाद करत असते. मात्र सलमान खानने याबाबत फोटो काढला असता कॅमेरा काढून घेतला. गैरवर्तन केले, असभ्य भाषेमध्ये बोलणे केले, असे याचिककर्ताने म्हटले आहे.



मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान : याबाबत सलमान खानच्या विरोधात तक्रार नोंदल्यानंतर खालच्या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ही केस गेली. त्यावेळेला खालच्या न्यायालयामध्ये याचिका गेल्यानंतर सलमान खानला त्याबाबत दिलासा मिळाला होता. मात्र अंधेरी न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या याचिकेनुसार समन्स बजावले होते. सलमान खानने अंधेरी न्यायालयामध्ये ही याचिका रद्द करावी, असा देखील अर्ज केला होता. मात्र तो स्वीकारला गेला नव्हता. अंधेरी न्यायालयाने बजावलेला समन्सला अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची भूमिका सलमान खानने घेतली आहे. त्यामुळे येत्या 30 मार्च रोजी याबाबत काय निर्णय होतो? याकडे सलमानच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा : Court Excuses Salman Khan : पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात सलमान खानला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट

मुंबई : पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी हे प्रकरण 2019 मधील आहे. सलमान खान जेव्हा रस्त्यावर दिसला, तेव्हा काही पत्रकारांनी सलमान खानचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. सेलिब्रिटी असल्याने स्वाभाविक पत्रकारांनी कॅमेरा काढून काही फोटो काढले. तेव्हा सायकल चालवत असलेल्या सलमान खानने पत्रकाराकडील कॅमेरा हिसकवला. तसेच पत्रकारांसोबत गैरवर्तन देखील केले, असा आरोप ठेवत पत्रकाराने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात केवळ सलमान नव्हे तर त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख याचेही नाव घेतले गेले होते. त्यामुळे दोघेही कायदेशीर अडचणीत सापडले आहेत.


गैरवर्तन केले, असभ्य भाषेमध्ये बोलणे : अंधेरी न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या याचिकेनुसार समन्स बजावले होते. त्याबाबत सलमान खानने उच्च न्यायालयामध्ये त्या समन्स विरोधात धाव घेतली आहे. त्यामुळे आता 30 मार्च रोजी या प्रकरणात काय निर्णय होतो ते पहावे लागेल. सलमान खानने त्या पत्रकाराला धमकी देखील दिली होती, असभ्य भाषेत बोलला होता, असा देखील आरोप करीत पत्रकाराने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. सलमान खानसारख्या सेलिब्रिटीकडून ही अपेक्षा नव्हती. त्याचे कारण सेलिब्रिटींना जनता आणि मीडिया जेव्हा भेटते, त्यावेळेला त्याच्यासोबत संवाद करत असते. मात्र सलमान खानने याबाबत फोटो काढला असता कॅमेरा काढून घेतला. गैरवर्तन केले, असभ्य भाषेमध्ये बोलणे केले, असे याचिककर्ताने म्हटले आहे.



मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान : याबाबत सलमान खानच्या विरोधात तक्रार नोंदल्यानंतर खालच्या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ही केस गेली. त्यावेळेला खालच्या न्यायालयामध्ये याचिका गेल्यानंतर सलमान खानला त्याबाबत दिलासा मिळाला होता. मात्र अंधेरी न्यायालयाने सलमान खानला या प्रकरणांमध्ये तक्रारदाराच्या याचिकेनुसार समन्स बजावले होते. सलमान खानने अंधेरी न्यायालयामध्ये ही याचिका रद्द करावी, असा देखील अर्ज केला होता. मात्र तो स्वीकारला गेला नव्हता. अंधेरी न्यायालयाने बजावलेला समन्सला अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची भूमिका सलमान खानने घेतली आहे. त्यामुळे येत्या 30 मार्च रोजी याबाबत काय निर्णय होतो? याकडे सलमानच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा : Court Excuses Salman Khan : पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात सलमान खानला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.