मुंबई - विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित करुन समाधान झाले आता प्रश्न मागे घ्या, अशी विनंती आता आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडे करता येणार नाही. यापुढे विधानसभेत मांडलेला तारांकीत प्रश्न मागे घेता येणार नाही. या संदर्भातील नियम 83 आजपासून (दि 11) बंद करु, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानसभेत केली.
हेही वाचा - मध्यप्रदेशसारखा आनंद महाराष्ट्र भाजपला शक्य नाही - धनंजय मुंडे
नाना पटोले म्हणाले की, काही आमदार प्रश्न उपस्थित करुन मागे घेण्यासाठी पत्र देतात. तर काही आमदार या नियमाचा दुरूपयोग करतात, असे शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले. प्रश्न मागे घेण्याचा नियम 83 मागे घेण्यासाठी नियमात बदल करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या चर्चेत सहभागी होत प्रश्न मागे घेण्याचा निर्णयाला स्थगीत करण्याची मागणी केली.