ETV Bharat / state

'आरसीईपी' करार शेतकरी विरोधी - राजू शेट्टी

author img

By

Published : Nov 4, 2019, 5:55 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 देशांसोबत मिळून आरसीईपी करारावर सह्या करणार आहेत. या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार आहे. त्यामुळे हा करार त्वरित थांबवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजू शेट्टी

मुंबई - प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजनेचा (आरसीईपी) करार करून सरकार शेतकऱ्यांना पायदळी तुडवत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले, यावेळी ते बोलत होते.

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

काय आहे नेमकं प्रकरण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 देशांसोबत मिळून आरसीईपी करारावर सह्या करणार आहेत. या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार आहे. त्यामुळे हा करार त्वरित थांबवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी दूध फेकत सरकारचा निषेधही करण्यात आला.

हेही वाचा - संजय राऊत राज्यापालांच्या भेटीसाठी, काय होणार चर्चा?

आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे आरसीईपी या व्यापार विषयक करारावर सोमवारी सह्या करण्यात येणार आहेत. भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या करारातील तरतुदी या भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहेत. कारण दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार असून त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत.

हेही वाचा - हेरगिरीप्रकरणी सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करावी - जयंत पाटील

त्यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणून सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

मुंबई - प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजनेचा (आरसीईपी) करार करून सरकार शेतकऱ्यांना पायदळी तुडवत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले, यावेळी ते बोलत होते.

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

काय आहे नेमकं प्रकरण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 देशांसोबत मिळून आरसीईपी करारावर सह्या करणार आहेत. या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार आहे. त्यामुळे हा करार त्वरित थांबवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी दूध फेकत सरकारचा निषेधही करण्यात आला.

हेही वाचा - संजय राऊत राज्यापालांच्या भेटीसाठी, काय होणार चर्चा?

आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे आरसीईपी या व्यापार विषयक करारावर सोमवारी सह्या करण्यात येणार आहेत. भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या करारातील तरतुदी या भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहेत. कारण दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार असून त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत.

हेही वाचा - हेरगिरीप्रकरणी सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करावी - जयंत पाटील

त्यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणून सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Intro:mh_mum_rajushetty_rcep_121_ mumbai7204684


Body:आरसेप करार शेतकरीविरोधी माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप
मुंबई:रिजिनल कम्प्रेहेंसिव इकॉनोमिक पार्टनरशिप करार करून शेतकरीही पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला. आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागीदार असलेले भारत चीन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जपान दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे रिजनल कम्प्रेहेंसिवे इकॉनोमिक पर्टनेरशिप व्यापारविषयक करारावर सोमवारी सह्या करण्यात येणार आहेत .भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहे .त्या काळातील तरतुदी या भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर राहणारे आहेत शिवाय अनेक गोष्टींची आयात शुल्क त्यामुळे कमी करावे लागणार असून त्यामुळेच चीन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या देशातील शेतमाल आणि भारतीय बाजारपेठा भरून जातील. त्यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती त्याच साठी आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अति दूध आणि दुग्धजन्य पदार्थ फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केले. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतमाल हा मातीमोल दराने विकला जाणार आहे त्यामुळे प्रतीकात्मक आंदोलन करून आम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मंत्रालयाच्या दारावर फेकली आहे. स्वामीनाथन समितीसह दुप्पट उत्पन्नाच्या लालसेने शेतकऱ्यांनी भाजप प्रणित सरकारला निवडून दिले. सर्वच पातळीवर शेतकऱ्यांची अवहेलना होत असून या कराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण होईल आणि शेतकरी संपूर्णतः संपून जाईल अशी भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. राज्यासह देशातील आणि भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये तर सत्तेचा सारीपाट सुरू असून सत्ताधाऱ्यांचे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे .त्यामुळेच आंदोलन करून सरकारवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.