ETV Bharat / state

ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राजभवनावर 'प्रहार', बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Nov 14, 2019, 1:20 PM IST

Updated : Nov 14, 2019, 1:44 PM IST

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला आहे. या राजभवनाकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे

बच्चू कडू

मुंबई - शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू पुन्हा एखदा आक्रमक झाले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला आहे. या राजभवनाकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हा मोर्चा काढण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी बच्चू कडूंना नोटीस पाठवली होती.

बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात

परतीच्या पावसाने राज्यभरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरु आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन छेडले होते.

हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने या परिसराला पोलीस छावणीचे रुप आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबई - शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू पुन्हा एखदा आक्रमक झाले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला आहे. या राजभवनाकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हा मोर्चा काढण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी बच्चू कडूंना नोटीस पाठवली होती.

बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात

परतीच्या पावसाने राज्यभरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरु आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन छेडले होते.

हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने या परिसराला पोलीस छावणीचे रुप आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Intro:Body:

[11/14, 12:53 PM] Vijay Gayakawad1: मुंबई- बच्चू कडू यांच तीव्र आंदोलन बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे आंदोलन तीव्र शेतकऱ्यांनी फेकले रस्त्यावरती धान्य प्रहार संघटना आक्रमक संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर ती झोपली

[11/14, 12:53 PM] Vijay Gayakawad1: बच्चू कडू यांचं तीव्र आंदोलन सुरू

[11/14, 12:54 PM] Vijay Gayakawad1: बच्चू कडू यांना ताब्यात घेतलेली पोलीस व्हॅन आंदोलकांनी अडवली


Conclusion:
Last Updated : Nov 14, 2019, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.