ETV Bharat / state

Gujarat riots case : गुजरात दंगलीचा खटला ट्रायल कोर्टातून दुसऱ्या कोर्टात स्थलांतर करण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका

author img

By

Published : Jul 23, 2022, 6:36 PM IST

गुजरात येथील वडोदरा येथे 2002 मध्ये झालेल्या दंगलीशी संबंधित (Gujarat riots case ) बेस्ट बेकरी प्रकरणातील दोन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणातील (Petition in High Court) ट्रायल कोर्टा मधील खटला दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी (transfer of Gujarat riots case from trial court to another court) केली आहे. ट्रायल कोर्टावरील विश्वास डळमळीत झाला आहे. तसेच खटल्यातील साक्षीदारांना शिकवल्याबद्दल कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांची चौकशी करण्यात यावी अशी विनंतीही आरोपींकडून करण्यात आली आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई: आरोपी हर्षद सोलंकी आणि मफत गोईल यांनी आरोप केला की ट्रायल कोर्टात साक्षीदारांना शिकवले जात असल्याची भीतीची आहे त्याची दखल घेतली नाही. वकील योगेश देशपांडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, आरोपी तीस्ता सेटलवाड आणि तिच्या साथीदारांनी निरपराधांना अडकवण्यासाठी रचलेल्या कटाचा बळी आहे. 1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडी येथील बेस्ट बेकरीवर हल्ला करून 14 जणांना ठार करणार्‍या जमावाचा ते एक भाग असल्याचा आरोप केल्याप्रकरणी आरोपींवर खटला चालवला जात आहे. सहआरोपींसाठीचा खटला 2006 मध्ये पूर्ण झाला होता आणि 2012 मध्ये त्यांच्या अपीलवरही मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता.


आरोपींनी अर्जात म्हटले आहे की त्यांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की तीस्ता सेटलवाडच्या कृत्यांचा तपास झाकिया एहसान जाफरी यांनी संदर्भित केलेल्या घटनेपुरता मर्यादित ठेवू नये तीस्ताच्या गुन्हेगारी सिंडिकेटच्या सदस्यांनी कायद्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला आणि बनावट पुरावे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच या खटल्या गेल्या अनेक वर्षांपासून विलंब होत आहे या प्रकरणातील दोन आरोपींची तुरुंगात मृत्यू देखील झाली आहे. असे देखील याचिका करते यांनी म्हटले आहे.

मुंबई: आरोपी हर्षद सोलंकी आणि मफत गोईल यांनी आरोप केला की ट्रायल कोर्टात साक्षीदारांना शिकवले जात असल्याची भीतीची आहे त्याची दखल घेतली नाही. वकील योगेश देशपांडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, आरोपी तीस्ता सेटलवाड आणि तिच्या साथीदारांनी निरपराधांना अडकवण्यासाठी रचलेल्या कटाचा बळी आहे. 1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडी येथील बेस्ट बेकरीवर हल्ला करून 14 जणांना ठार करणार्‍या जमावाचा ते एक भाग असल्याचा आरोप केल्याप्रकरणी आरोपींवर खटला चालवला जात आहे. सहआरोपींसाठीचा खटला 2006 मध्ये पूर्ण झाला होता आणि 2012 मध्ये त्यांच्या अपीलवरही मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता.


आरोपींनी अर्जात म्हटले आहे की त्यांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की तीस्ता सेटलवाडच्या कृत्यांचा तपास झाकिया एहसान जाफरी यांनी संदर्भित केलेल्या घटनेपुरता मर्यादित ठेवू नये तीस्ताच्या गुन्हेगारी सिंडिकेटच्या सदस्यांनी कायद्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला आणि बनावट पुरावे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच या खटल्या गेल्या अनेक वर्षांपासून विलंब होत आहे या प्रकरणातील दोन आरोपींची तुरुंगात मृत्यू देखील झाली आहे. असे देखील याचिका करते यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Kolhapur: कोल्हापूर खंडपीठाचा मार्ग सुटण्याची शक्यता; खंडपीठ कृती समितीला मुख्य प्रधान सचिवांचे पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.