मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री 18 आणि 19 तारखेला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी मुंबईतील मिरा रोड येथे येणार आहेत. मुंबईत त्यांचा दोन दिवस दरबार लागणार असून, बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला लाखो लोक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबाराचा कार्यक्रम भाजपच्या आमदार गीता जैन यांनी आयोजित केला आहे. काही दिवसांपूर्वीच धीरेंद्र शास्त्री नागपूर येथे आले असता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर धीरेंद्र शास्त्री हे राष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकले. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमानंतर वीरेंद्र शास्त्री पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत.
![Pandit Dhirendra Shastri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-dhirendra-shastri-bageshwar-7210855_17032023194022_1703f_1679062222_491.jpg)
संत तुकाराम महाराजांचा अपमान : श्याम मानव यांनी धिरेंद्र शास्त्री यांच्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जादू टोना विरोधी कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. यानंतर धीरेंद्र शास्त्री हे राष्ट्रीय माध्यमांमध्ये सातत्याने झळकू लागले. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या दैवी शक्ती असल्याचा दावा करत असतात. यानंतर धिरेंद्र शास्त्री चर्चेत आले ते त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. धीरेंद्र शास्त्रींनी 'तुकाराम महाराजांची पत्नी त्यांचा छळ करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तुकाराम महाराज हे घरी न राहता ध्यानधारणा नामस्मरणात रमले.' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता.