ETV Bharat / state

कोरोनाच्या संकटात आता 'निसर्ग'चे महासंकट; आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज

author img

By

Published : Jun 1, 2020, 9:58 PM IST

आज(सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून 'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटात आता 'निसर्ग'चे महासंकट
कोरोनाच्या संकटात आता 'निसर्ग'चे महासंकट

मुंबई : कोरोनाच्या महासंकटाशी राज्य सरकार झुंज देत असतानाच आगामी मान्सून आणि निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून कुठलीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(सोमवारी) सांगितले.

आज(सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, ज्या व्यक्ती कच्च्या घरात राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाउडस्पीकर द्वारे सांगण्यात आले असल्याचे सांगितले. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाउस यामुळे हानी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

नॉन कोविड रुग्णालये उपलब्ध -

मदत व बचाव कार्य करताना कोविड प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नॉन कोव्हीड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोव्हीडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षीत स्थळी कसे हलविता येईल याबाबत सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात -

या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर, एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही. तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणुऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरू असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते.

मुंबई : कोरोनाच्या महासंकटाशी राज्य सरकार झुंज देत असतानाच आगामी मान्सून आणि निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून कुठलीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(सोमवारी) सांगितले.

आज(सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, ज्या व्यक्ती कच्च्या घरात राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाउडस्पीकर द्वारे सांगण्यात आले असल्याचे सांगितले. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाउस यामुळे हानी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

नॉन कोविड रुग्णालये उपलब्ध -

मदत व बचाव कार्य करताना कोविड प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नॉन कोव्हीड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोव्हीडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षीत स्थळी कसे हलविता येईल याबाबत सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात -

या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर, एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही. तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणुऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरू असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.