ETV Bharat / state

मुंबईतल्या सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करून श्वेत पत्रिका काढा - शरद पवार

author img

By

Published : Mar 15, 2019, 11:40 PM IST

Updated : Mar 15, 2019, 11:57 PM IST

मध्य रेल्वेने २०१५ साली राज्य सरकारला पत्र लिहले होते. यामध्ये मुंबईतल्या फूटओव्हर ब्रिजची माहिती देण्यात आली होती. याकडे सरकारने दुर्लक्ष केले का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता रेल्वेवरील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करून राज्य सरकराने श्वेत पत्रिका काढावी, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई - शहरात वारंवार होणारे रेल्वेचे अपघात, पूल कोसळण्याच्या दुर्घटना अतिशय चिंताजनक आहेत. मुंबई परिसरातल्या सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे . छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या पादचारी पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

अपघातग्रस्त पुलाचे ऑडिट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मग अपघात कसा झाला? खरंच या पुलाचे ऑडिट झाले आहे का? असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. मध्य रेल्वेने २०१५ साली राज्य सरकारला पत्र लिहले होते. यामध्ये मुंबईतल्या फूटओव्हर ब्रिजची माहिती देण्यात आली होती. याकडे सरकारने दुर्लक्ष केले का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता रेल्वेवरील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करून राज्य सरकराने श्वेत पत्रिका काढावी, असे ते म्हणाले.

मुंबई समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे. वातावरणाचा धातूच्या बांधकामावर विपरीत परिणाम होत असतो. परदेशात लोखंडावर काही विशिष्ट सोल्युशन लावण्यात येते. मात्र, आपल्याकडे तशी उपाययोजना होता नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नाशिक ते अहमदाबाद मार्गावरील कोपरी जवळील पूल धोकादायक असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोपरी पुलाच्या खालील गांजलेले लोखंडाचे गर्डरचे फोटोही दाखवले.

मुंबई - शहरात वारंवार होणारे रेल्वेचे अपघात, पूल कोसळण्याच्या दुर्घटना अतिशय चिंताजनक आहेत. मुंबई परिसरातल्या सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे . छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या पादचारी पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

अपघातग्रस्त पुलाचे ऑडिट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मग अपघात कसा झाला? खरंच या पुलाचे ऑडिट झाले आहे का? असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. मध्य रेल्वेने २०१५ साली राज्य सरकारला पत्र लिहले होते. यामध्ये मुंबईतल्या फूटओव्हर ब्रिजची माहिती देण्यात आली होती. याकडे सरकारने दुर्लक्ष केले का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता रेल्वेवरील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करून राज्य सरकराने श्वेत पत्रिका काढावी, असे ते म्हणाले.

मुंबई समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे. वातावरणाचा धातूच्या बांधकामावर विपरीत परिणाम होत असतो. परदेशात लोखंडावर काही विशिष्ट सोल्युशन लावण्यात येते. मात्र, आपल्याकडे तशी उपाययोजना होता नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नाशिक ते अहमदाबाद मार्गावरील कोपरी जवळील पूल धोकादायक असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोपरी पुलाच्या खालील गांजलेले लोखंडाचे गर्डरचे फोटोही दाखवले.

Intro:
मुंबईतल्या सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करून श्वेत पत्रिका काढा , शरद पवार यांची मागणी

मुंबई १५

मुंबईत वारंवार होणारे रेल्वेचे अपघात पूल कोसळण्याच्या दुर्घटना अतिशय चिंताजनक असून मुंबई परिसरातल्या सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे . छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही मागणी केली आहे .
अपघातग्रस्त पुलाचे आधी ऑडिट झाल्याचे सांगण्यात येत आहे . मग अपघात कसा झाला खरंच या पुलाचे खरंच ऑडिट झाले आहे का ? मध्य रेल्वेने २०१५ साली राज्य सरकारला पात्र लिहले होते ,यात मुंबईतल्या फूटओव्हर ब्रिजची माहिती देण्यात आली होती . याकडे सरकारने दुर्लक्ष केले का हा प्रश्न उपस्तिथ होत आहे . त्यामुळे आता रेल्वे वरील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करून राज्य सरकराने श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी पवार यांनी केली आहे .

याच बरोबर पवार यांनी नाशिक ते अहमदाबाद मार्गावरील कोपरी जवळील पुल धोकादायक असल्याची माहिती दिली . तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोपरी पुलाच्या खालील गांजलेले लोखंडाचे गर्डरचे फोटो दाखवले . मुंबई समुद्र किनार्यावरील शहर आहे . वातावरणाचा धातूच्या बांधकामावर विपरीत परिणाम होत असतो . परदेशात लोखंडावर काही विशिष्ट सोलुशन लावण्यात येते ,मात्र आपल्याकडे तशी उपाययोजना होता नाही . आता मुंबईतल्या पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याची वेळ आल्याचे पवार यांनी सांगितले .
त्याचबरोबर बुलेट ट्रेनवर पैसे खर्च करण्या ऐवजी मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकता, कोलकता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे त्यांनी म्हटले आहेBody:......Conclusion:
Last Updated : Mar 15, 2019, 11:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.