ETV Bharat / state

उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक

author img

By

Published : Jan 14, 2020, 9:11 PM IST

उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर 'जाणता राजा' या शब्दावरून टीका केली होती. त्याला नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिले. मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पुस्तकात तुलना केल्याप्रकरणी उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली नाही. याला उदयनराजेंची लाचारी म्हणता येईल, असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक
नवाब मलिक

मुंबई - उदयनराजे भोसलेंना आता भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पुस्तकात तुलना केल्याप्रकरणी उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली नाही. यातून त्यांनी लाचारी काय आहे, हे दाखवून दिले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली.

उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही


उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर 'जाणता राजा' या शब्दावरून टीका केली होती. त्याला नवाब मलिकांनी प्रत्युउत्तर दिले. जाणता राजा हा शब्द पवारसाहेबांनी लिहिला नाही. 'जाणता राजा' याचा अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या अर्थाने या शब्दाचा कधी वापर केला नाही. याउलट आदित्यनाथ आणि जयभगवान गोयल यांनी मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी उघडपणे तुलना केली. त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत, याकडे नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा - शिवसेना नाव बदलून ठाकरेसेना करा'

गोयल नावाच्या माणसाकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह देशात विरोधाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी रात्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, त्या लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतले आहे. मात्र, आमची माहिती अशी आहे की, ते लेखक पुस्तक मागे घ्यायला तयार नाहीत, माफी मागायला तयार नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावडेकर आणि गोयल यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत आहे, असे जाहीर करावे अशी स्पष्ट मागणीही नवाब मलिक यांनी केली.

मुंबई - उदयनराजे भोसलेंना आता भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पुस्तकात तुलना केल्याप्रकरणी उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली नाही. यातून त्यांनी लाचारी काय आहे, हे दाखवून दिले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली.

उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही


उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर 'जाणता राजा' या शब्दावरून टीका केली होती. त्याला नवाब मलिकांनी प्रत्युउत्तर दिले. जाणता राजा हा शब्द पवारसाहेबांनी लिहिला नाही. 'जाणता राजा' याचा अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या अर्थाने या शब्दाचा कधी वापर केला नाही. याउलट आदित्यनाथ आणि जयभगवान गोयल यांनी मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी उघडपणे तुलना केली. त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत, याकडे नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा - शिवसेना नाव बदलून ठाकरेसेना करा'

गोयल नावाच्या माणसाकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह देशात विरोधाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी रात्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, त्या लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतले आहे. मात्र, आमची माहिती अशी आहे की, ते लेखक पुस्तक मागे घ्यायला तयार नाहीत, माफी मागायला तयार नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावडेकर आणि गोयल यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत आहे, असे जाहीर करावे अशी स्पष्ट मागणीही नवाब मलिक यांनी केली.

Intro:उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक

mh-mum-01-ncp-navab-milik-byte-7201153


मुंबई ता. १४ :
उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून देत आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नामदार नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांचा खरपूस समाचार घेतला.


उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.


उदयनराजे काही मिळते का म्हणून भाजपात गेले होते आणि आता पुढे काही मिळते का यासाठी ते लाचारीने बोलत आहेत असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.


जाणता राजा हा शब्द पवारसाहेबांनी स्वतः ला लिहिला नाही.जाणता राजाच्या अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. पक्षाने त्या शब्दाचा कधी वापर केला नाही. आदित्यनाथ आणि गोयल मोदींचे सरळ नाव घेवून सांगत आहेत त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत याकडेही नवाब मलिक यांनी माध्यमांचे लक्ष वेधले आहे.


शिवाय आम्ही शिवआघाडी असं नाव कधी ठेवलं नाही. आमचं महाराष्ट्र विकास आघाडी असं नाव आहे हे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.


नवाब मलिक यांनी गोयल नावाच्या माणसाकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. असे एक पुस्तक रिलीज करण्यात आले. त्यामुळे राज्यासह देशात विरोधाचे वातावरण निर्माण झाले. काल रात्री प्रकाश जावडेकर यांनी प्रेस घेवून सांगितले की, त्या लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतले आहे. परंतु आमची माहिती अशी आहे की, ते लेखक पुस्तक मागे घ्यायला तयार नाहीत, माफी मागायला तयार नाही त्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावडेकर आणि गोयल यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत आहे असे जाहीर करावे अशी स्पष्ट मागणीही नवाब मलिक यांनी केली.


दरम्यान जोपर्यंत पुस्तक मागे घेत नाही आणि जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत देशातील जनता गप्प बसणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.Body:उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक

mh-mum-01-ncp-navab-milik-byte-7201153


मुंबई ता. १४ :
उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून देत आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नामदार नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांचा खरपूस समाचार घेतला.


उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.


उदयनराजे काही मिळते का म्हणून भाजपात गेले होते आणि आता पुढे काही मिळते का यासाठी ते लाचारीने बोलत आहेत असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.


जाणता राजा हा शब्द पवारसाहेबांनी स्वतः ला लिहिला नाही.जाणता राजाच्या अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. पक्षाने त्या शब्दाचा कधी वापर केला नाही. आदित्यनाथ आणि गोयल मोदींचे सरळ नाव घेवून सांगत आहेत त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत याकडेही नवाब मलिक यांनी माध्यमांचे लक्ष वेधले आहे.


शिवाय आम्ही शिवआघाडी असं नाव कधी ठेवलं नाही. आमचं महाराष्ट्र विकास आघाडी असं नाव आहे हे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.


नवाब मलिक यांनी गोयल नावाच्या माणसाकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. असे एक पुस्तक रिलीज करण्यात आले. त्यामुळे राज्यासह देशात विरोधाचे वातावरण निर्माण झाले. काल रात्री प्रकाश जावडेकर यांनी प्रेस घेवून सांगितले की, त्या लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतले आहे. परंतु आमची माहिती अशी आहे की, ते लेखक पुस्तक मागे घ्यायला तयार नाहीत, माफी मागायला तयार नाही त्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावडेकर आणि गोयल यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत आहे असे जाहीर करावे अशी स्पष्ट मागणीही नवाब मलिक यांनी केली.


दरम्यान जोपर्यंत पुस्तक मागे घेत नाही आणि जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत देशातील जनता गप्प बसणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.