ETV Bharat / state

NCP Formation History : कशी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना? काय आहे सध्याची राजकीय स्थिती?

author img

By

Published : May 2, 2023, 5:43 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांनी निर्णय न बदलल्यास राष्ट्रवादीचा पुढचे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Formation of NCP
Formation of NCP

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. शरद पवार यांनी आपला राजकीय संन्यास जाहीर केल्याने पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना कशी केली? त्यांचे काँग्रेसमधील वाद आणि पुन्हा काँग्रेस सोबतच युती करण्यामागची कारण? हे चर्चेला आलं आहे. शरद पवार यांना देशातील अनेक येथे आपल्या गुरुस्थानी मानतात. अगदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर रित्या शरद पवार आपले गुरु असल्याचं म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपण शरद पवारांच बोट पकडूनच राजकारणात आलो असे एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

1999 साली राष्ट्रवादीची स्थापना : आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन जवळपास 20 वर्ष उलटले आहेत. या वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या. ज्याप्रमाणे देशातील राजकीय वातावरण बदलले त्याप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले. राष्ट्रवादीच्या सध्याच्या स्थितीवर येण्याआधी राष्ट्रवादीचा इतिहास जाणून घेणे सर्वात महत्त्वाचा आहे. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापना करण्यात आली. यामध्ये यामागे मोठ्या राजकीय घडामोडी होत्या.

पवार आणि काँग्रेस सोबत असलेले मतभेद : शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेस मधून सुरुवात झाली. पण, 1999 मध्ये, राजीव गांधी यांच्याशी असलेले मतभेद व राजकीय कोंडीमुळे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पासून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष बनले. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री तसेच लोकसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. 20 वर्षांपूर्वी काँग्रेसमधील नेतृत्वाच्या वादावरून शरद पवार यांनी मेघालयातील काँग्रेस नेते पीए संगमा आणि बिहारचे तारिक अन्वर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यापैकी पवार आणि संगमा 2004 मध्ये वेगळे झाले.

पक्षाची स्थापना आणि उद्दिष्टे : जाणकार सांगतात, 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यांना स्वतःकडून खूप आशा होत्या. त्यावेळी जवळपास 10 वर्ष काँग्रेसचा वाईट काळ सुरू होता. तेव्हा पवार, संगमा व तारिक अन्वर या तिघांना काँग्रेसमधील इतर अनेक लोक व नेते देखील साथ देतील अशी आशा होती. याशिवाय कोणत्याही पक्षाला जेव्हा स्पष्ट बहुमत मिळणार नाही, तेव्हा राष्ट्रवादी पक्ष अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा या तीन नेत्यांना विश्वास होता. पण, त्या काळात या नव्या पक्षाला ना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला ना राष्ट्रीय राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावण्याची संधी मिळाली. 1999 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले होते.

राजकीय विश्लेषक काय सांगतात? : शरद पवार यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहिलेले व राष्ट्रवादी काँग्रेसचे मागील 20 वर्षाची वाटचाल जवळून पाहणारे जेष्ठ पत्रकार संजय आवटे सांगतात की, "शरद पवारांनी १० जून १९९९ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा 'शरद पवार' या चेह-याशिवाय या नवजात पक्षाकडे काही नव्हते. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडणा-या पवारांचे तेव्हा आडाखे वेगळे होते. कॉंग्रेस तेव्हा सत्तेत नव्हती. आघाडी सरकारांचे पर्व सुरू होते. राजकारणात नवख्या असलेल्या सोनियांना फार काही जमेल, असे पवारांसह अनेकांना वाटत नव्हते. त्यामुळे प्रादेशिक पक्ष स्थापन करून स्वतःचे स्थान मजबूत करत न्यायचे, असा होरा पवारांचा होता. देशाने तोवर एच.डी. देवेगौडांसारखे पंतप्रधान पाहिले होते. पवारांचा दावा तर त्याहून नक्कीच मोठा होता. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले शरद पवार बाहेर पडले, तेव्हा असे चित्र होते."

'व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेशिवाय पवारांची तेव्हा काही भूमिका नव्हती. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर भलेभले त्यांना 'जॉइन' झाले. कॉंग्रेसने सत्ता गमावलेली होती. पुन्हा येण्याची शक्यता नव्हती. सोनियांच्या नेतृत्वाविषयी शंका होती. शिवाय, सोनियांशी 'ॲक्सेस' नव्हता. 'शरद पवार' या नावाचा दबदबा राज्यात तरी त्याहून मोठा होता. स्थानिक हितसंबंध आणि अस्तित्वाचे प्रश्न असल्याने ठिकठिकाणचे सरदार एकवटले. त्यातून हा पक्ष उभा राहिला. अनेकांचे अंदाज खोटे ठरले आणि २००४मध्ये सोनियांनी कॉंग्रेसला जिंकून दिले. केंद्रात कॉंग्रेसची आघाडी सत्तेत आली. त्यामुळे सोनियांच्या नेतृत्वाखालीच पुढे पवारांना केंद्रात दहा वर्षे काम करावे लागले. अर्थात, त्यापूर्वी १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात एकत्र आले. जन्मापासून सत्तेत असणारा हा पक्ष वाढत गेला. राज्यातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष झाला. २००४च्या निवडणुकीत तर तो राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला.'

'हे कर्तृत्व शरद पवारांचे आपल्या प्रतिमेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर त्यांनी राज्यभरात हा पक्ष पोहोचवला. शरद पवार नावाची जादू उत्तरोत्तर वाढत गेली. तरूणांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने या पक्षासोबत आल्या. केडर तयार झाले. २०१४पर्यंत असे सगळे ठीक चालले होते.'

ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सांगतात, '२०१४च्या लोकसभा निवडणुकीने सगळे संदर्भच बदलून टाकले. जन्मापासून सत्तेचा चमचा तोंडात असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेतून बाहेर गेली. देशात कॉंग्रेसची वाताहत झाली. राज्यातही स्थिती बिकट झाली. तरीही नव्या राजकारणात 'रिलिव्हंट' राहण्याचा प्रयत्न पवार करत राहिले. त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दुर्दैवी कालखंडाने पवारांना बरेच काही शिकवले आहे. ज्या इंदिरा गांधींना यशवंतरावांनी विरोध केला, त्या इंदिरा पुन्हा सत्तेत आल्या आणि यशवंतरावांचे राजकीय करीअरच संपुष्टात आले. सोनियांना विरोध करणा-या पवारांचे असे झाले नाही, यात सोनियांकडे असलेले कमी राजकीय भांडवल आणि सोनियांचा चांगुलपणा ही कारणे आहेतच. पण, पवारांचे सावधपणही आहे. संदर्भ कितीही बदलोत, आपण 'रिलिव्हंट' राहायचे हे पवारांना नीट कळलेले आहे.'

कॉंग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजाराने गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन अजिबातच सामान्य नाही. तरीही, २०१९च्या लोकसभा निवडणुकीने चित्र बदलले. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आले. पवारांना सोडून लोक भाजपमध्ये जाऊ लागले. त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. 'इडी'वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते पवारांनी करून दाखवले.

भाजपला दूर सारून सरकार बनवले. शरद पवार हे महाराष्ट्राचेच काय, देशातले शक्तिमान नेते ठरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा बळ मिळाले. तरूण मोठ्या संख्येने पक्षात आले. देशातले वातावरण तोवर पार बदलले होते. राजकारणाची परिभाषा बदलली होती. नामोहरम झालेल्या कॉंग्रेसकडे नेता नव्हता. संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, अशी सर्वांची खात्री होती. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शरद पवारांचे तेज विलक्षण वाढलेले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी शरद पवारच सरकारचे पालक झाले.

हळूहळू चित्र बदलत गेले. उद्धव ठाकरे यांची आपली अशी प्रतिमा तयार होत गेली. ते स्वतःच सरकार चालवत राहिले. महाविकास आघाडी सरकार पुढे अपेक्षेप्रमाणे कोसळले. पवारांनी सरकार बनवले, पण ठाक-यांना वाचवता आले नाही, अशी प्रतिमा व्हायला हवी होती. झाले उलटेच. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीची प्रचंड लाट तयार झाली. उद्धव ठाकरे यांना असा सर्वस्तरीय जनाधार मिळू लागला, जो बाळासाहेबांनाही कधी मिळाला नव्हता. वज्रमूठ सभांचाही चेहरा उद्धव हाच झाला. बाकी सगळे नेते मागे पडले आणि उद्धव ठाकरे नायक झाले. एकटे उद्धवच नाही, आदित्यसुद्धा. त्या तुलनेचा कोणीही नेता आज राज्यात विरोधकांकडे नाही. महाविकास आघाडी सरकार पडले खरे, पण नवे सरकार लोकांनी ना स्वीकारले, ना ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती ओसरली!

तिकडे, 'पप्पू' ठरवले गेलेले राहुल गांधी चालत राहिले आणि 'चालू लागले'! खासदारकी गेल्यावर तर राहुल आणखी मोठे झाले. त्याचा परिणाम राज्यात झाला आणि देशातही. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. त्यांचा पक्ष गेला, चिन्ह गेले. राहुल यांनी खासदारकी सोडली. त्यांचा बंगला गेला. महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांचे तेज वाढले.

उलट शरद पवारांविषयी संशयाचे धुके तयार झाले. 'एनडीटीव्ही'ला दिलेली मुलाखत, तिकडे नागालॅंडात भाजपला पाठिंबा, गौतम अदानींसोबत भेटीगाठी, विरोधकांच्या बैठकीला गैरहजेरी, अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी वावडी. त्याहीपूर्वी क्रिकेटच्या राजकारणासाठी विरोधकांसोबत फुगडी. उद्धव आणि राहुल सगळ्यांना अंगावर घेत असताना, पवार मात्र फक्त 'राजकारण' करताहेत, अशी चर्चा मोठ्या आवाजात होऊ लागली.

याला प्रतिवाद करणे भाग होते. आपल्या प्रतिमेचे वलय वाढवायचे कसे, हे शरद पवारांना समजते. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. राहुल यांनी खासदारकी सोडली. शरद पवारांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. शरद पवारांनी स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. पवारांविषयीच्या प्रेमाची लाट पुन्हा उसळली. या पक्षावर हुकुमत माझीच आहे, यासाठीही खुंटी हलवून बघता आली. उद्या भलता-सलता निर्णय घेण्याची अपरिहार्यता आलीच (ती येऊ शकते!) तर त्या पापातून मुक्तीची वाट मिळाली. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना सुप्रियांचे मौन जेवढे बोलके होते, तेवढाच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा पुढाकार सूचक होता. त्यामुळे, हे वाटते तेवढे सहज नाही.

नक्की कारणं काय आहेत, ते पुढे येईलच. पण, हे 'शरद पवार' आहेत. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा कधी सुरू झाल्या, ते आठवा! शरद पवारांनी संजय राऊतांच्या मार्फत तो प्लान 'लीक' केला. चर्चाच एवढी झाली की पुढे करणार तरी काय? एकदम शांतता पसरली. कित्येक डाव उधळले गेले. (काही अद्यापही बाकी आहेत!) महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाही पवारांनी अनेकांना कात्रजचे घाट दाखवले. जे जे शक्य ते पवार प्राणपणाने करत राहिले.

पवार मूल्यांशी तडजोड करतात, असे वाटत असले आणि त्यांच्या राजकारणाचा बाज 'करीअर'चा असला, तरीही निर्णायक क्षणी शरद पवार विरोधकांच्या नाकात पाणी घालतात. म्हणून शरद पवार हे 'शरद पवार' आहेत. थेटपणे ते बाह्या सरसावून हुतात्मा होत नाहीत. अनेकदा काठावर असतात. अधिक सावध असतात. पण, 'रिलिव्हंट' राहून शांतपणे अखेर तेच करतात, जे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

म्हणूनच, ८२ वर्षांचा हा नेता पक्षाचे अध्यक्षपद सोडतो म्हटल्यावर महाराष्ट्रभर असा हलकल्लोळ होतो. पक्ष आता 'राष्ट्रीय' नसला, तरी देशभर बातमी होते. भारतीय राजकारणाच्या पटलावरचा हा 'लास्ट मुघल' आहे! आणि, कोणी कितीही प्रयत्न करू द्या, हा मुघल अद्यापही 'अभ्यासक्रमा'त आहे. तो अभ्यासक्रमात आहे, तोवर पेपर एवढा सोपा नाही, याचे भान हुकुमशहांनाही आहे! पवारांकडून अद्यापही खूप अपेक्षा आहेत."


तर पत्रकार आनंद गायकवाड सांगतात की, "वंचित घटकांतील सामान्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांची जबाबदारी देण्याची किमया हाच मला वाटतं मागील २० वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला महत्त्वाचा बदल आहे. सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांना पक्षसंघटनेत महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात आल्या. याशिवाय अमोल मिटकरी यांना विधानपरिषद तर संजय बनसोडे यांना विधानसभेवर निवडून आणून थेट राज्यमंत्री करणं असो किंवा नरहरी झिरवळ यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवडणं असो की प्रादेशिक प्रतिनिधीत्व असो की जात-धर्म असा समतोल राखणं असो राष्ट्रवादीनं स्थापनेपासूनच समतोल राखलाय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस देशपातळीवर छाप पाडू शकेल असं शरद पवारांव्यतिरिक्त नेतृत्व तयार करू शकलेलं नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल."



हेही वाचा - Sharad Pawar Sports Leadership : क्रीडा विश्वातही शरद पवारांचा दबदबा; विविध संघटनांची पदे भूषवली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. शरद पवार यांनी आपला राजकीय संन्यास जाहीर केल्याने पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना कशी केली? त्यांचे काँग्रेसमधील वाद आणि पुन्हा काँग्रेस सोबतच युती करण्यामागची कारण? हे चर्चेला आलं आहे. शरद पवार यांना देशातील अनेक येथे आपल्या गुरुस्थानी मानतात. अगदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर रित्या शरद पवार आपले गुरु असल्याचं म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपण शरद पवारांच बोट पकडूनच राजकारणात आलो असे एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

1999 साली राष्ट्रवादीची स्थापना : आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन जवळपास 20 वर्ष उलटले आहेत. या वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या. ज्याप्रमाणे देशातील राजकीय वातावरण बदलले त्याप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले. राष्ट्रवादीच्या सध्याच्या स्थितीवर येण्याआधी राष्ट्रवादीचा इतिहास जाणून घेणे सर्वात महत्त्वाचा आहे. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापना करण्यात आली. यामध्ये यामागे मोठ्या राजकीय घडामोडी होत्या.

पवार आणि काँग्रेस सोबत असलेले मतभेद : शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेस मधून सुरुवात झाली. पण, 1999 मध्ये, राजीव गांधी यांच्याशी असलेले मतभेद व राजकीय कोंडीमुळे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पासून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष बनले. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री तसेच लोकसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. 20 वर्षांपूर्वी काँग्रेसमधील नेतृत्वाच्या वादावरून शरद पवार यांनी मेघालयातील काँग्रेस नेते पीए संगमा आणि बिहारचे तारिक अन्वर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यापैकी पवार आणि संगमा 2004 मध्ये वेगळे झाले.

पक्षाची स्थापना आणि उद्दिष्टे : जाणकार सांगतात, 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यांना स्वतःकडून खूप आशा होत्या. त्यावेळी जवळपास 10 वर्ष काँग्रेसचा वाईट काळ सुरू होता. तेव्हा पवार, संगमा व तारिक अन्वर या तिघांना काँग्रेसमधील इतर अनेक लोक व नेते देखील साथ देतील अशी आशा होती. याशिवाय कोणत्याही पक्षाला जेव्हा स्पष्ट बहुमत मिळणार नाही, तेव्हा राष्ट्रवादी पक्ष अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा या तीन नेत्यांना विश्वास होता. पण, त्या काळात या नव्या पक्षाला ना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला ना राष्ट्रीय राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावण्याची संधी मिळाली. 1999 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले होते.

राजकीय विश्लेषक काय सांगतात? : शरद पवार यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहिलेले व राष्ट्रवादी काँग्रेसचे मागील 20 वर्षाची वाटचाल जवळून पाहणारे जेष्ठ पत्रकार संजय आवटे सांगतात की, "शरद पवारांनी १० जून १९९९ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा 'शरद पवार' या चेह-याशिवाय या नवजात पक्षाकडे काही नव्हते. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडणा-या पवारांचे तेव्हा आडाखे वेगळे होते. कॉंग्रेस तेव्हा सत्तेत नव्हती. आघाडी सरकारांचे पर्व सुरू होते. राजकारणात नवख्या असलेल्या सोनियांना फार काही जमेल, असे पवारांसह अनेकांना वाटत नव्हते. त्यामुळे प्रादेशिक पक्ष स्थापन करून स्वतःचे स्थान मजबूत करत न्यायचे, असा होरा पवारांचा होता. देशाने तोवर एच.डी. देवेगौडांसारखे पंतप्रधान पाहिले होते. पवारांचा दावा तर त्याहून नक्कीच मोठा होता. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले शरद पवार बाहेर पडले, तेव्हा असे चित्र होते."

'व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेशिवाय पवारांची तेव्हा काही भूमिका नव्हती. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर भलेभले त्यांना 'जॉइन' झाले. कॉंग्रेसने सत्ता गमावलेली होती. पुन्हा येण्याची शक्यता नव्हती. सोनियांच्या नेतृत्वाविषयी शंका होती. शिवाय, सोनियांशी 'ॲक्सेस' नव्हता. 'शरद पवार' या नावाचा दबदबा राज्यात तरी त्याहून मोठा होता. स्थानिक हितसंबंध आणि अस्तित्वाचे प्रश्न असल्याने ठिकठिकाणचे सरदार एकवटले. त्यातून हा पक्ष उभा राहिला. अनेकांचे अंदाज खोटे ठरले आणि २००४मध्ये सोनियांनी कॉंग्रेसला जिंकून दिले. केंद्रात कॉंग्रेसची आघाडी सत्तेत आली. त्यामुळे सोनियांच्या नेतृत्वाखालीच पुढे पवारांना केंद्रात दहा वर्षे काम करावे लागले. अर्थात, त्यापूर्वी १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात एकत्र आले. जन्मापासून सत्तेत असणारा हा पक्ष वाढत गेला. राज्यातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष झाला. २००४च्या निवडणुकीत तर तो राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला.'

'हे कर्तृत्व शरद पवारांचे आपल्या प्रतिमेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर त्यांनी राज्यभरात हा पक्ष पोहोचवला. शरद पवार नावाची जादू उत्तरोत्तर वाढत गेली. तरूणांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने या पक्षासोबत आल्या. केडर तयार झाले. २०१४पर्यंत असे सगळे ठीक चालले होते.'

ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सांगतात, '२०१४च्या लोकसभा निवडणुकीने सगळे संदर्भच बदलून टाकले. जन्मापासून सत्तेचा चमचा तोंडात असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेतून बाहेर गेली. देशात कॉंग्रेसची वाताहत झाली. राज्यातही स्थिती बिकट झाली. तरीही नव्या राजकारणात 'रिलिव्हंट' राहण्याचा प्रयत्न पवार करत राहिले. त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दुर्दैवी कालखंडाने पवारांना बरेच काही शिकवले आहे. ज्या इंदिरा गांधींना यशवंतरावांनी विरोध केला, त्या इंदिरा पुन्हा सत्तेत आल्या आणि यशवंतरावांचे राजकीय करीअरच संपुष्टात आले. सोनियांना विरोध करणा-या पवारांचे असे झाले नाही, यात सोनियांकडे असलेले कमी राजकीय भांडवल आणि सोनियांचा चांगुलपणा ही कारणे आहेतच. पण, पवारांचे सावधपणही आहे. संदर्भ कितीही बदलोत, आपण 'रिलिव्हंट' राहायचे हे पवारांना नीट कळलेले आहे.'

कॉंग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजाराने गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन अजिबातच सामान्य नाही. तरीही, २०१९च्या लोकसभा निवडणुकीने चित्र बदलले. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आले. पवारांना सोडून लोक भाजपमध्ये जाऊ लागले. त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. 'इडी'वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते पवारांनी करून दाखवले.

भाजपला दूर सारून सरकार बनवले. शरद पवार हे महाराष्ट्राचेच काय, देशातले शक्तिमान नेते ठरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा बळ मिळाले. तरूण मोठ्या संख्येने पक्षात आले. देशातले वातावरण तोवर पार बदलले होते. राजकारणाची परिभाषा बदलली होती. नामोहरम झालेल्या कॉंग्रेसकडे नेता नव्हता. संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, अशी सर्वांची खात्री होती. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शरद पवारांचे तेज विलक्षण वाढलेले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी शरद पवारच सरकारचे पालक झाले.

हळूहळू चित्र बदलत गेले. उद्धव ठाकरे यांची आपली अशी प्रतिमा तयार होत गेली. ते स्वतःच सरकार चालवत राहिले. महाविकास आघाडी सरकार पुढे अपेक्षेप्रमाणे कोसळले. पवारांनी सरकार बनवले, पण ठाक-यांना वाचवता आले नाही, अशी प्रतिमा व्हायला हवी होती. झाले उलटेच. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीची प्रचंड लाट तयार झाली. उद्धव ठाकरे यांना असा सर्वस्तरीय जनाधार मिळू लागला, जो बाळासाहेबांनाही कधी मिळाला नव्हता. वज्रमूठ सभांचाही चेहरा उद्धव हाच झाला. बाकी सगळे नेते मागे पडले आणि उद्धव ठाकरे नायक झाले. एकटे उद्धवच नाही, आदित्यसुद्धा. त्या तुलनेचा कोणीही नेता आज राज्यात विरोधकांकडे नाही. महाविकास आघाडी सरकार पडले खरे, पण नवे सरकार लोकांनी ना स्वीकारले, ना ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती ओसरली!

तिकडे, 'पप्पू' ठरवले गेलेले राहुल गांधी चालत राहिले आणि 'चालू लागले'! खासदारकी गेल्यावर तर राहुल आणखी मोठे झाले. त्याचा परिणाम राज्यात झाला आणि देशातही. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. त्यांचा पक्ष गेला, चिन्ह गेले. राहुल यांनी खासदारकी सोडली. त्यांचा बंगला गेला. महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांचे तेज वाढले.

उलट शरद पवारांविषयी संशयाचे धुके तयार झाले. 'एनडीटीव्ही'ला दिलेली मुलाखत, तिकडे नागालॅंडात भाजपला पाठिंबा, गौतम अदानींसोबत भेटीगाठी, विरोधकांच्या बैठकीला गैरहजेरी, अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी वावडी. त्याहीपूर्वी क्रिकेटच्या राजकारणासाठी विरोधकांसोबत फुगडी. उद्धव आणि राहुल सगळ्यांना अंगावर घेत असताना, पवार मात्र फक्त 'राजकारण' करताहेत, अशी चर्चा मोठ्या आवाजात होऊ लागली.

याला प्रतिवाद करणे भाग होते. आपल्या प्रतिमेचे वलय वाढवायचे कसे, हे शरद पवारांना समजते. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. राहुल यांनी खासदारकी सोडली. शरद पवारांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. शरद पवारांनी स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. पवारांविषयीच्या प्रेमाची लाट पुन्हा उसळली. या पक्षावर हुकुमत माझीच आहे, यासाठीही खुंटी हलवून बघता आली. उद्या भलता-सलता निर्णय घेण्याची अपरिहार्यता आलीच (ती येऊ शकते!) तर त्या पापातून मुक्तीची वाट मिळाली. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना सुप्रियांचे मौन जेवढे बोलके होते, तेवढाच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा पुढाकार सूचक होता. त्यामुळे, हे वाटते तेवढे सहज नाही.

नक्की कारणं काय आहेत, ते पुढे येईलच. पण, हे 'शरद पवार' आहेत. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा कधी सुरू झाल्या, ते आठवा! शरद पवारांनी संजय राऊतांच्या मार्फत तो प्लान 'लीक' केला. चर्चाच एवढी झाली की पुढे करणार तरी काय? एकदम शांतता पसरली. कित्येक डाव उधळले गेले. (काही अद्यापही बाकी आहेत!) महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाही पवारांनी अनेकांना कात्रजचे घाट दाखवले. जे जे शक्य ते पवार प्राणपणाने करत राहिले.

पवार मूल्यांशी तडजोड करतात, असे वाटत असले आणि त्यांच्या राजकारणाचा बाज 'करीअर'चा असला, तरीही निर्णायक क्षणी शरद पवार विरोधकांच्या नाकात पाणी घालतात. म्हणून शरद पवार हे 'शरद पवार' आहेत. थेटपणे ते बाह्या सरसावून हुतात्मा होत नाहीत. अनेकदा काठावर असतात. अधिक सावध असतात. पण, 'रिलिव्हंट' राहून शांतपणे अखेर तेच करतात, जे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

म्हणूनच, ८२ वर्षांचा हा नेता पक्षाचे अध्यक्षपद सोडतो म्हटल्यावर महाराष्ट्रभर असा हलकल्लोळ होतो. पक्ष आता 'राष्ट्रीय' नसला, तरी देशभर बातमी होते. भारतीय राजकारणाच्या पटलावरचा हा 'लास्ट मुघल' आहे! आणि, कोणी कितीही प्रयत्न करू द्या, हा मुघल अद्यापही 'अभ्यासक्रमा'त आहे. तो अभ्यासक्रमात आहे, तोवर पेपर एवढा सोपा नाही, याचे भान हुकुमशहांनाही आहे! पवारांकडून अद्यापही खूप अपेक्षा आहेत."


तर पत्रकार आनंद गायकवाड सांगतात की, "वंचित घटकांतील सामान्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांची जबाबदारी देण्याची किमया हाच मला वाटतं मागील २० वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला महत्त्वाचा बदल आहे. सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांना पक्षसंघटनेत महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात आल्या. याशिवाय अमोल मिटकरी यांना विधानपरिषद तर संजय बनसोडे यांना विधानसभेवर निवडून आणून थेट राज्यमंत्री करणं असो किंवा नरहरी झिरवळ यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवडणं असो की प्रादेशिक प्रतिनिधीत्व असो की जात-धर्म असा समतोल राखणं असो राष्ट्रवादीनं स्थापनेपासूनच समतोल राखलाय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस देशपातळीवर छाप पाडू शकेल असं शरद पवारांव्यतिरिक्त नेतृत्व तयार करू शकलेलं नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल."



हेही वाचा - Sharad Pawar Sports Leadership : क्रीडा विश्वातही शरद पवारांचा दबदबा; विविध संघटनांची पदे भूषवली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.