ETV Bharat / state

Narendra Modi : आम्ही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक, २०३६ ऑलिम्पिकसाठी दावा ठोकणार - पंतप्रधान मोदी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 10:27 PM IST

Updated : Oct 14, 2023, 10:37 PM IST

Narendra Modi : 'भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक आहे. २०३६ मध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित व्हावी यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राला संबोधित करत होते.

Narendra Modi
Narendra Modi

पहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी

मुंबई Narendra Modi : शनिवारी (१४ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राला संबोधित केलं. यावेळी बोलताना, ऑलिम्पिकचं आयोजन करणं हे १४० कोटी भारतीयांचं स्वप्न असल्याचं ते म्हणाले.

ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्सुक : 'भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक आहे. २०३६ मध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित केली जावी यासाठी प्रयत्न करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही', असं मोदी म्हणाले. 'भारतानं अलीकडच्या काळात आपल्यात जागतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध केलंय. आयओसीचं सत्र ४० वर्षांनंतर भारतात होत आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आम्ही २०३६ ऑलिम्पिकपूर्वी २०२९ च्या युवा ऑलिम्पिकचंही आयोजन करण्यासाठी इच्छुक आहे. मला विश्वास आहे की भारताला IOC कडून सतत पाठिंबा मिळेल', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयओसीनं घेतलेल्या पुढाकाराचंही त्यांनी स्वागत केलं.

भारत एक प्रेरणादायी ठिकाण आहे : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आपल्या भाषणात म्हणाले की, 'भारतात येऊन आम्हाला खूप आनंद झाला. हा देश ऑलिम्पिकसह अनेक खेळांमध्ये आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन आयोजित करण्यासाठी भारत एक प्रेरणादायी ठिकाण आहे. गौरवशाली इतिहासासह गतिमान वर्तमान याचा मेळ घालणारा हा देश आहे', असं ते म्हणाले.

पीटी उषांनी समर्थन केलंय : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या अध्यक्षा पीटी उषा यांनी नुकतेच २०३६ ऑलिम्पिकचं आयोजन करण्याच्या सरकारच्या योजनेचं समर्थन केलं होतं. आपण २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी दावा केला पाहिजे. मला खात्री आहे की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत टोकियोपेक्षा जास्त पदकं जिंकेल. मग आपण ऑलिम्पिकचं आयोजन करू शकतो', असं त्या म्हणाल्या होत्या.

अहमदाबादकडे यजमानपद? : गेल्या वर्षी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुंबईतील आयओसी अधिवेशनादरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या सदस्यांसमोर भारत एक रोडमॅप सादर करेल, असं सांगितलं होतं. ठाकूर म्हणाले होते की, सरकार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्पर्धा आयोजित करण्याच्या दाव्याला पाठिंबा देईल. तसेच गुजरातचं अहमदाबाद शहर हे यजमान असेल, असंही ते म्हणाले होते. भारतानं यापूर्वी १९८२ आशियाई खेळ आणि २०१० राष्ट्रकुल खेळांचं आयोजन केलंय, असंही त्यांनी नमूद केलं होतं.

हेही वाचा :

  1. India Sri Lanka Ferry Service : भारत-श्रीलंका प्रवास आता फक्त ३ तासांचा, मोदींनी केलं ४० वर्षांपासून बंद असलेल्या सागरी सेवेचं उद्घाटन

पहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी

मुंबई Narendra Modi : शनिवारी (१४ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राला संबोधित केलं. यावेळी बोलताना, ऑलिम्पिकचं आयोजन करणं हे १४० कोटी भारतीयांचं स्वप्न असल्याचं ते म्हणाले.

ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्सुक : 'भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक आहे. २०३६ मध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित केली जावी यासाठी प्रयत्न करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही', असं मोदी म्हणाले. 'भारतानं अलीकडच्या काळात आपल्यात जागतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध केलंय. आयओसीचं सत्र ४० वर्षांनंतर भारतात होत आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आम्ही २०३६ ऑलिम्पिकपूर्वी २०२९ च्या युवा ऑलिम्पिकचंही आयोजन करण्यासाठी इच्छुक आहे. मला विश्वास आहे की भारताला IOC कडून सतत पाठिंबा मिळेल', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयओसीनं घेतलेल्या पुढाकाराचंही त्यांनी स्वागत केलं.

भारत एक प्रेरणादायी ठिकाण आहे : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आपल्या भाषणात म्हणाले की, 'भारतात येऊन आम्हाला खूप आनंद झाला. हा देश ऑलिम्पिकसह अनेक खेळांमध्ये आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन आयोजित करण्यासाठी भारत एक प्रेरणादायी ठिकाण आहे. गौरवशाली इतिहासासह गतिमान वर्तमान याचा मेळ घालणारा हा देश आहे', असं ते म्हणाले.

पीटी उषांनी समर्थन केलंय : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या अध्यक्षा पीटी उषा यांनी नुकतेच २०३६ ऑलिम्पिकचं आयोजन करण्याच्या सरकारच्या योजनेचं समर्थन केलं होतं. आपण २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी दावा केला पाहिजे. मला खात्री आहे की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत टोकियोपेक्षा जास्त पदकं जिंकेल. मग आपण ऑलिम्पिकचं आयोजन करू शकतो', असं त्या म्हणाल्या होत्या.

अहमदाबादकडे यजमानपद? : गेल्या वर्षी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुंबईतील आयओसी अधिवेशनादरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या सदस्यांसमोर भारत एक रोडमॅप सादर करेल, असं सांगितलं होतं. ठाकूर म्हणाले होते की, सरकार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्पर्धा आयोजित करण्याच्या दाव्याला पाठिंबा देईल. तसेच गुजरातचं अहमदाबाद शहर हे यजमान असेल, असंही ते म्हणाले होते. भारतानं यापूर्वी १९८२ आशियाई खेळ आणि २०१० राष्ट्रकुल खेळांचं आयोजन केलंय, असंही त्यांनी नमूद केलं होतं.

हेही वाचा :

  1. India Sri Lanka Ferry Service : भारत-श्रीलंका प्रवास आता फक्त ३ तासांचा, मोदींनी केलं ४० वर्षांपासून बंद असलेल्या सागरी सेवेचं उद्घाटन
Last Updated : Oct 14, 2023, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.