ETV Bharat / state

Mahim Dargah Action : 'राज ठाकरे यांनी दुसरे हाजी अली बांधावे, त्यांचे स्वागत आहे'

author img

By

Published : Mar 23, 2023, 6:46 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाटत होते की हे इथे दुसरे हाजी अली निर्माण होत आहे तर त्यांनी ते बांधायला हवे होते, आम्ही त्यांचे स्वागत केले असते, अशा भावना मुस्लीम नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. माहीम येथील बाबा मगदूम येथील दर्गा तोडल्याने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी खास बातचीत केली आहे.

Muslims Advised To Raj Thackeray
मुस्लिमांच्या प्रतिक्रिया
माहीम दर्गा तोडकामाविषयी मुस्लीम बांधवांशी संवाद साधताना ईटीव्ही प्रतिनिधी

मुंबई: माहीम येथील बाबा मगदूम यांच्या दर्ग्याच्या पाठीमागे १०० मीटरच्या आत भर समुद्रात एका धार्मिक स्थळाचे निर्माण अनेक वर्षांपासून केले जात आहे. हे धार्मिक स्थळ म्हणजे मजार असून ती अनेक वर्षांपासून तिथे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याविषयी बोलताना स्थानिक म्हणतात की, आम्ही मागील ६० वर्षांपासून ही मजार बघत आलो आहोत. येथे कुठल्याही पद्धतीचे अनधिकृत बांधकाम नाही. या बांधकामाची नोंदसुद्धा सरकारी दरबारी झाली आहे, असे असताना केवळ राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावरून हे बांधकाम तोडले जात आहे, याचे आम्हाला फार दुःख आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिमांनी दिली.

इथे कुठलाही भेदभाव नाही: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये माहीम येथील मगदूम बाबा दर्गाच्या पाठीमागे समुद्रात होत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा मुद्दा उपस्थित करत ते हटवण्यासाठी राज्य शासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. परंतु, शासनाने यावर तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत हे अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. यावर मुस्लीम बांधव म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडेसुद्धा अनेक मुस्लीम बांधव आहेत. तेसुद्धा त्यांच्यासोबत राहतात. आम्ही लहानपणापासून ही मजार बघत आलो आहोत. इथे अनेक भाविक येतात आणि प्रसाद अर्पण करतात. इथे कुठलाही भेदभाव नाही; परंतु अचानक कोणालातरी जाग येते आणि याविषयी सांगितले जाते, हे फार हे खेदजनक असल्याचेही यांनी सांगितले आहे.

आम्हाला अश्रू अनावर झाले आहेत: हे बांधकाम अधिकृत आहे हे आम्हाला माहीत आहे; पण तरीही आम्ही ही तोडक कारवाई करत असताना कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करत नाही आहोत. आम्ही पोलीस प्रशासन, महानगरपालिका अधिकारी यांना संपूर्ण सहकार्य केले आहे. आमचे म्हणणे फक्त एवढेच आहे की, इतक्या वर्षांपासून असलेले हे धार्मिक स्थळ जमीनदोस्त करण्याअगोदर थोडा विचार करायला हवा होता. स्थानिक लोक, ट्रस्टी यांच्याबरोबर चर्चा करायला हवी होती. त्याने कोणाला काय अडचण होणार होती? याबाबत आता कुणाला काय अडचण होत आहे? परंतु अशा पद्धतीने हे नजरेसमोर बघत असताना आम्हाला आमचे अश्रू अनावर झाले आहेत, असेही एका स्थानिकांने सांगितले आहे.

हेही वाचा: Nitesh Rane: लँड जिहादच्या माध्यमातून हिंदू समाज कमी करण्याचा घाट - नितेश राणे

माहीम दर्गा तोडकामाविषयी मुस्लीम बांधवांशी संवाद साधताना ईटीव्ही प्रतिनिधी

मुंबई: माहीम येथील बाबा मगदूम यांच्या दर्ग्याच्या पाठीमागे १०० मीटरच्या आत भर समुद्रात एका धार्मिक स्थळाचे निर्माण अनेक वर्षांपासून केले जात आहे. हे धार्मिक स्थळ म्हणजे मजार असून ती अनेक वर्षांपासून तिथे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याविषयी बोलताना स्थानिक म्हणतात की, आम्ही मागील ६० वर्षांपासून ही मजार बघत आलो आहोत. येथे कुठल्याही पद्धतीचे अनधिकृत बांधकाम नाही. या बांधकामाची नोंदसुद्धा सरकारी दरबारी झाली आहे, असे असताना केवळ राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावरून हे बांधकाम तोडले जात आहे, याचे आम्हाला फार दुःख आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिमांनी दिली.

इथे कुठलाही भेदभाव नाही: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये माहीम येथील मगदूम बाबा दर्गाच्या पाठीमागे समुद्रात होत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा मुद्दा उपस्थित करत ते हटवण्यासाठी राज्य शासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. परंतु, शासनाने यावर तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत हे अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. यावर मुस्लीम बांधव म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडेसुद्धा अनेक मुस्लीम बांधव आहेत. तेसुद्धा त्यांच्यासोबत राहतात. आम्ही लहानपणापासून ही मजार बघत आलो आहोत. इथे अनेक भाविक येतात आणि प्रसाद अर्पण करतात. इथे कुठलाही भेदभाव नाही; परंतु अचानक कोणालातरी जाग येते आणि याविषयी सांगितले जाते, हे फार हे खेदजनक असल्याचेही यांनी सांगितले आहे.

आम्हाला अश्रू अनावर झाले आहेत: हे बांधकाम अधिकृत आहे हे आम्हाला माहीत आहे; पण तरीही आम्ही ही तोडक कारवाई करत असताना कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करत नाही आहोत. आम्ही पोलीस प्रशासन, महानगरपालिका अधिकारी यांना संपूर्ण सहकार्य केले आहे. आमचे म्हणणे फक्त एवढेच आहे की, इतक्या वर्षांपासून असलेले हे धार्मिक स्थळ जमीनदोस्त करण्याअगोदर थोडा विचार करायला हवा होता. स्थानिक लोक, ट्रस्टी यांच्याबरोबर चर्चा करायला हवी होती. त्याने कोणाला काय अडचण होणार होती? याबाबत आता कुणाला काय अडचण होत आहे? परंतु अशा पद्धतीने हे नजरेसमोर बघत असताना आम्हाला आमचे अश्रू अनावर झाले आहेत, असेही एका स्थानिकांने सांगितले आहे.

हेही वाचा: Nitesh Rane: लँड जिहादच्या माध्यमातून हिंदू समाज कमी करण्याचा घाट - नितेश राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.