ETV Bharat / state

महाराष्ट्रात सध्या महाभारत घडतय, संजय राऊत यांचा भाजपला टोला

author img

By

Published : Jul 1, 2021, 3:33 PM IST

Updated : Jul 1, 2021, 3:39 PM IST

महाभारतात ज्या प्रमाणे सत्तेसाठी कौरवांनी ज्याप्रकारे पांडवांना त्रास दिला, त्याप्रकारे भाजपकडून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तपास यंत्रमांचा महाविकास आघाडी सरकारवर काहीही परिमाम होणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई - कौरव सत्तेसाठी लढत होते. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात महाभारत घडत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो, असे केंद्राला वाटत आहे. मात्र, ते कदापी शक्य होणार नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असे खडे बोल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. मुंबईत गुरुवारी (दि. 1 जुलै) माध्यमांशी बोलत होते.

खोटे आरोप करू नका

राज्यातील विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे तपास करण्याची मागणी भाजपकडून केली जाते. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो, असे केंद्राला वाटत असेल. तर ते कदापी शक्य नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घातले पाहिजे. पण, खोट्या तलवारीचे घाव घालू नका. विरोधक असले तरी ते महाराष्ट्राचे आहेत. आपण एकमेकांना ओळखतो, त्यामुळे खोटे आरोप करणे योग्य नसल्याचेही राऊत म्हणाले.

आमचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी

महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्राच्या मधोमध लढत होता. अर्जुनाने सर्व बाण परतवून लावले. हे महाभारताचे कथानक आहे. कधीही पांडवांना घेरले जाते. कौरव अधर्माच्या बाजूने होते आणि कौरव हे असत्याचे प्रतिक आहेत. सध्याच्या कौरवांकडून सरकारलाही अशाच पध्दतीने घेरले जात आहे. पण, श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे आमचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आहे. आम्हीही हे बाण परतवून लावू, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.

हेही वाचा - Mumbai Corona Vaccination : लसीचा तुटवडा, आज मुंबईत लसीकरण बंद

मुंबई - कौरव सत्तेसाठी लढत होते. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात महाभारत घडत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो, असे केंद्राला वाटत आहे. मात्र, ते कदापी शक्य होणार नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असे खडे बोल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. मुंबईत गुरुवारी (दि. 1 जुलै) माध्यमांशी बोलत होते.

खोटे आरोप करू नका

राज्यातील विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे तपास करण्याची मागणी भाजपकडून केली जाते. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो, असे केंद्राला वाटत असेल. तर ते कदापी शक्य नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घातले पाहिजे. पण, खोट्या तलवारीचे घाव घालू नका. विरोधक असले तरी ते महाराष्ट्राचे आहेत. आपण एकमेकांना ओळखतो, त्यामुळे खोटे आरोप करणे योग्य नसल्याचेही राऊत म्हणाले.

आमचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी

महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्राच्या मधोमध लढत होता. अर्जुनाने सर्व बाण परतवून लावले. हे महाभारताचे कथानक आहे. कधीही पांडवांना घेरले जाते. कौरव अधर्माच्या बाजूने होते आणि कौरव हे असत्याचे प्रतिक आहेत. सध्याच्या कौरवांकडून सरकारलाही अशाच पध्दतीने घेरले जात आहे. पण, श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे आमचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आहे. आम्हीही हे बाण परतवून लावू, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.

हेही वाचा - Mumbai Corona Vaccination : लसीचा तुटवडा, आज मुंबईत लसीकरण बंद

Last Updated : Jul 1, 2021, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.