ETV Bharat / state

राज्यात दिवसभरात २ हजार ५३५ नवे कोरोना पॉझिटिव्ह, ६० रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Nov 16, 2020, 8:33 PM IST

राज्यात २ हजार ५३५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून ६० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ८४ हजार ३८६ इतके सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - आज (दि. 16 नोव्हेंबर) राज्यात गेल्या काही महिन्यांपेक्षा कमी म्हणजेच २ हजार ५३५ नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. यामुळे एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ४९ हजार ७७७ वर पोहोचला आहे. राज्यात आज ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

८४ हजार ३८६ सक्रिय रुग्ण -

राज्यात आज (सोमवार) ३ हजार १ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख १८ हजार ३८० कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४ मृत्यू हे आठवड्यातील तर २९ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या एकूण ८४ हजारर ३८६ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४ इतके तर १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५ रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई - आज (दि. 16 नोव्हेंबर) राज्यात गेल्या काही महिन्यांपेक्षा कमी म्हणजेच २ हजार ५३५ नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. यामुळे एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ४९ हजार ७७७ वर पोहोचला आहे. राज्यात आज ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

८४ हजार ३८६ सक्रिय रुग्ण -

राज्यात आज (सोमवार) ३ हजार १ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख १८ हजार ३८० कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४ मृत्यू हे आठवड्यातील तर २९ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या एकूण ८४ हजारर ३८६ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४ इतके तर १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५ रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.