ETV Bharat / state

राज्यात विक्रमी २६ हजारांहून अधिक जणांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ८३ टक्क्यांवर

author img

By

Published : Oct 10, 2020, 9:57 PM IST

शनिवारी राज्यात २६ हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. याबरोबरच राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात शनिवारी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली आहे. शनिवारी तब्बल २६ हजार ४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्के इतके झाले आहे. तर यासोबतच राज्यात शनिवारी ११ हजार ४१६ नविन कोरोनाबाधितांचे निदान झाले. तर ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या १५ लाख १७ हजार ४३४ इतकी झाली आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ म्हणजेच २०.५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

आजचे जिल्हानिहाय रुग्ण आणि मृत्यू (कंसात) -

मुंबई मनपा-२२०३ (४८), ठाणे- २०८ (२), ठाणे मनपा-३७५ (६), नवी मुंबई मनपा-३०९ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३१५ (२), उल्हासनगर मनपा-३१, भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१२), मीरा भाईंदर मनपा-१६६ (१), पालघर-६८, वसई-विरार मनपा-१७१ (४), रायगड-१६२ (१), पनवेल मनपा-१६३ (६), नाशिक-२२७ (८), नाशिक मनपा-४९८ (८), मालेगाव मनपा-१६, अहमदनगर-५१५ (१८), अहमदनगर मनपा-२९८ (६), धुळे-४१, धुळे मनपा-२३ (१), जळगाव-१२२ (५), जळगाव मनपा-६० (१), नंदूरबार-३१, पुणे- ६३४ (२२), पुणे मनपा-७२४ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-४१४ (८), सोलापूर-१९२ (२२), सोलापूर मनपा-५१, सातारा-४५२ (२६), कोल्हापूर-११३ (१), कोल्हापूर मनपा-३४, सांगली-२५२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-४८ (३), सिंधुदूर्ग-४४ (२), रत्नागिरी-५६ (४), औरंगाबाद-९७ (२),औरंगाबाद मनपा-१७५ (२), जालना-८७ (१), हिंगोली-२०, परभणी-३४, परभणी मनपा-२९, लातूर-५४ (२), लातूर मनपा-४७ (३), उस्मानाबाद-८९ (७), बीड-१२५ (८), नांदेड-८१, नांदेड मनपा-८८ (२), अकोला-१३, अकोला मनपा-२४, अमरावती-५५ (४), अमरावती मनपा-४९ (२), यवतमाळ-६० (२), बुलढाणा-६१, वाशिम-३० (४), नागपूर-२४८ (५), नागपूर मनपा-३४७ (१३), वर्धा-७९ (१), भंडारा-९४ (४), गोंदिया-६४ (३), चंद्रपूर-१०९ (३), चंद्रपूर मनपा-४८ (४), गडचिरोली-१४२, इतर राज्य-१९.

शनिवारी नोंद झालेल्या एकूण ३०८ मृत्यूंपैकी १६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ८० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८० मृत्यू पुणे - २६, सातारा - ७, अहमदनगर - ७, बीड - ६, नागपूर - ६, नाशिक - ६, सोलापूर - ६, भंडारा - २, चंद्रपूर - २, गोंदिया - २, जळगाव - २, नांदेड - २, यवतमाळ - २, अकोला - १, औरंगाबाद - १, रायगड - १ आणि सांगली - १ असे आहेत.

मुंबई - राज्यात शनिवारी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली आहे. शनिवारी तब्बल २६ हजार ४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्के इतके झाले आहे. तर यासोबतच राज्यात शनिवारी ११ हजार ४१६ नविन कोरोनाबाधितांचे निदान झाले. तर ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या १५ लाख १७ हजार ४३४ इतकी झाली आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ म्हणजेच २०.५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

आजचे जिल्हानिहाय रुग्ण आणि मृत्यू (कंसात) -

मुंबई मनपा-२२०३ (४८), ठाणे- २०८ (२), ठाणे मनपा-३७५ (६), नवी मुंबई मनपा-३०९ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३१५ (२), उल्हासनगर मनपा-३१, भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१२), मीरा भाईंदर मनपा-१६६ (१), पालघर-६८, वसई-विरार मनपा-१७१ (४), रायगड-१६२ (१), पनवेल मनपा-१६३ (६), नाशिक-२२७ (८), नाशिक मनपा-४९८ (८), मालेगाव मनपा-१६, अहमदनगर-५१५ (१८), अहमदनगर मनपा-२९८ (६), धुळे-४१, धुळे मनपा-२३ (१), जळगाव-१२२ (५), जळगाव मनपा-६० (१), नंदूरबार-३१, पुणे- ६३४ (२२), पुणे मनपा-७२४ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-४१४ (८), सोलापूर-१९२ (२२), सोलापूर मनपा-५१, सातारा-४५२ (२६), कोल्हापूर-११३ (१), कोल्हापूर मनपा-३४, सांगली-२५२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-४८ (३), सिंधुदूर्ग-४४ (२), रत्नागिरी-५६ (४), औरंगाबाद-९७ (२),औरंगाबाद मनपा-१७५ (२), जालना-८७ (१), हिंगोली-२०, परभणी-३४, परभणी मनपा-२९, लातूर-५४ (२), लातूर मनपा-४७ (३), उस्मानाबाद-८९ (७), बीड-१२५ (८), नांदेड-८१, नांदेड मनपा-८८ (२), अकोला-१३, अकोला मनपा-२४, अमरावती-५५ (४), अमरावती मनपा-४९ (२), यवतमाळ-६० (२), बुलढाणा-६१, वाशिम-३० (४), नागपूर-२४८ (५), नागपूर मनपा-३४७ (१३), वर्धा-७९ (१), भंडारा-९४ (४), गोंदिया-६४ (३), चंद्रपूर-१०९ (३), चंद्रपूर मनपा-४८ (४), गडचिरोली-१४२, इतर राज्य-१९.

शनिवारी नोंद झालेल्या एकूण ३०८ मृत्यूंपैकी १६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ८० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८० मृत्यू पुणे - २६, सातारा - ७, अहमदनगर - ७, बीड - ६, नागपूर - ६, नाशिक - ६, सोलापूर - ६, भंडारा - २, चंद्रपूर - २, गोंदिया - २, जळगाव - २, नांदेड - २, यवतमाळ - २, अकोला - १, औरंगाबाद - १, रायगड - १ आणि सांगली - १ असे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.