ETV Bharat / state

Dada Bhuse Criticized Aaditya Thackeray: आम्हाला आदित्य ठाकरेंविषयी द्वेषभावनेने बोलायचे नाही - मंत्री दादा भुसे

author img

By

Published : Feb 7, 2023, 6:57 PM IST

बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदर विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आव्हानाबद्दल भुसे यांना विचारले असता, आम्हाला त्यांच्या विषयी द्वेषभावनेने बोलायचे नाही; गेली तीस वर्षे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे, असे वक्तव्य दादा भुसे यांनी केले आहे.

Dada Bhuse Criticized Aaditya Thackeray
मंत्री दादा भुसे

मंत्री दादा भुसे यांनी मीडियाला दिलेली मुलाखत

मुंबई: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून बेलापूर जेट्टी ते दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज याचे उद्घाटन झाले. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. या सेवेमुळे बेलापूरहून दक्षिण मुंबईत पोहोचायला किमान दोन तास वेळ लागतो. आता या सेवेमुळे अवघ्या 50 मिनिटांत या जलमार्गाने दक्षिण मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडची ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईला-नवी मुंबईशी जोडणार आहे. बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळही वाचेल आणि पैशांची बचत होणार आहे.


अशी असेल टॅक्सी सेवा : नवी मुंबईतून चालणाऱ्या वॉटर टॅक्सी शहराला मुंबई, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, एलिफंटा लेणी आणि रेवस यांना जोडतील. या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जातील. वॉटर टॅक्सी, 'नयन एक्स एल' मध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी आणि वरच्या किंवा बिझनेस क्लासच्या डेकवर अतिरिक्त 60 प्रवासी बसू शकतील. ही टॅक्सी बेलापूरहून सकाळी 8.30 वाजता निघेल आणि 9.30 वाजता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचेल. त्यानंतर वॉटर टॅक्सी संध्याकाळी 6.30 वाजता नवी मुंबईसाठी निघेल आणि संध्याकाळी 7.30 वाजता ती बेलापूर जेट्टीवर पोहोचेल अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

प्रवाश्यांसाठी विशेष सुविधा : गेटवे ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. तिकीट दर 300 रुपये असणार आहे. बोटीमध्ये एकूण 200 प्रवाशी घेऊन जाण्याची क्षमता असेल. टॅक्सीमध्ये वर आणि खाली अशा दोन्ही ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच नोकरदार वर्गांना पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


आम्हाला व्देषभावनेने बोलायचे नाही: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याविषयी दादा भुसे यांना विचारले असता लोकांना या गोष्टींमध्ये स्वारस्य नाही. गेली पंचवीस तीस वर्षे आम्ही एकत्र काम केलेला आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो तोपर्यंत आम्ही सगळे चांगले होतो आणि एका घटनेमुळे एका दिवसामध्ये आम्ही सगळे नालायक झालो. समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यावर संघटितपणे काम करण्याची गरज आहे; मात्र ते आपण बाजूला ठेवतो आणि तू इकडे ये, मी तिकडे येतो असे करत आहेत. ज्याला करायचे ते बोलत नाही. आम्ही कामावर विश्वास ठेवतो. आम्हाला त्यांच्याविषयी देखील द्वेष भावनेने बोलायचे नाही. कारण पंचवीस तीस वर्षे आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल आहे, असेही या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांनी म्हटले.

हेही वाचा : Rahul Gandhi Bharat Jodo Loksabha: राष्ट्रपतींच्या भाषणात बेरोजगारी, महागाई नाही.. पण लोकं याचीच चर्चा करतात: राहुल गांधी

मंत्री दादा भुसे यांनी मीडियाला दिलेली मुलाखत

मुंबई: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून बेलापूर जेट्टी ते दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज याचे उद्घाटन झाले. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. या सेवेमुळे बेलापूरहून दक्षिण मुंबईत पोहोचायला किमान दोन तास वेळ लागतो. आता या सेवेमुळे अवघ्या 50 मिनिटांत या जलमार्गाने दक्षिण मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडची ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईला-नवी मुंबईशी जोडणार आहे. बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळही वाचेल आणि पैशांची बचत होणार आहे.


अशी असेल टॅक्सी सेवा : नवी मुंबईतून चालणाऱ्या वॉटर टॅक्सी शहराला मुंबई, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, एलिफंटा लेणी आणि रेवस यांना जोडतील. या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जातील. वॉटर टॅक्सी, 'नयन एक्स एल' मध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी आणि वरच्या किंवा बिझनेस क्लासच्या डेकवर अतिरिक्त 60 प्रवासी बसू शकतील. ही टॅक्सी बेलापूरहून सकाळी 8.30 वाजता निघेल आणि 9.30 वाजता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचेल. त्यानंतर वॉटर टॅक्सी संध्याकाळी 6.30 वाजता नवी मुंबईसाठी निघेल आणि संध्याकाळी 7.30 वाजता ती बेलापूर जेट्टीवर पोहोचेल अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

प्रवाश्यांसाठी विशेष सुविधा : गेटवे ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. तिकीट दर 300 रुपये असणार आहे. बोटीमध्ये एकूण 200 प्रवाशी घेऊन जाण्याची क्षमता असेल. टॅक्सीमध्ये वर आणि खाली अशा दोन्ही ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच नोकरदार वर्गांना पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


आम्हाला व्देषभावनेने बोलायचे नाही: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याविषयी दादा भुसे यांना विचारले असता लोकांना या गोष्टींमध्ये स्वारस्य नाही. गेली पंचवीस तीस वर्षे आम्ही एकत्र काम केलेला आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो तोपर्यंत आम्ही सगळे चांगले होतो आणि एका घटनेमुळे एका दिवसामध्ये आम्ही सगळे नालायक झालो. समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यावर संघटितपणे काम करण्याची गरज आहे; मात्र ते आपण बाजूला ठेवतो आणि तू इकडे ये, मी तिकडे येतो असे करत आहेत. ज्याला करायचे ते बोलत नाही. आम्ही कामावर विश्वास ठेवतो. आम्हाला त्यांच्याविषयी देखील द्वेष भावनेने बोलायचे नाही. कारण पंचवीस तीस वर्षे आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल आहे, असेही या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांनी म्हटले.

हेही वाचा : Rahul Gandhi Bharat Jodo Loksabha: राष्ट्रपतींच्या भाषणात बेरोजगारी, महागाई नाही.. पण लोकं याचीच चर्चा करतात: राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.