मुंबई - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या घसरत्या अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाल्याचे थोरात म्हणाले. तसेच बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली असल्याचे थोरात म्हणाले.
-
मोदी सरकारच्या चुकीच्या धेरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभाजनवादी #CAA #NRC जनतेवर लादण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरु आहे. उद्योगधंदे बंद होत आहेत. बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उचांकी पातळीवर पोहोचली आहे.#Budget2020 https://t.co/uDc3tBOj85
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मोदी सरकारच्या चुकीच्या धेरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभाजनवादी #CAA #NRC जनतेवर लादण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरु आहे. उद्योगधंदे बंद होत आहेत. बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उचांकी पातळीवर पोहोचली आहे.#Budget2020 https://t.co/uDc3tBOj85
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 31, 2020मोदी सरकारच्या चुकीच्या धेरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभाजनवादी #CAA #NRC जनतेवर लादण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरु आहे. उद्योगधंदे बंद होत आहेत. बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उचांकी पातळीवर पोहोचली आहे.#Budget2020 https://t.co/uDc3tBOj85
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 31, 2020
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभाजनवादी सीएए आणि एनआरसी हे कायदे जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. देशात बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तरूणांना गोली मारो असे सांगून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणा-या अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी या आकडेवारीकडे पहावे, असेही थोरात म्हणाले.