ETV Bharat / state

शरद पवारांमुळे टिकेल महाशिवआघाडीचे सरकार - रामदास आठवले

author img

By

Published : Nov 21, 2019, 5:09 PM IST

बाळासाहेबांच्या तत्वाविरोधात ही आघाडी आहे. मी भाजप सोबतच राहणार असून महाशिवआघाडी सोबत जाणार नाही. बाकीच्या मित्र पक्षांचे माहीत नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

माहिती देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मुंबई- महायुतीचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही राहिली. भाजप ऐकत नाही तर सत्तेच्या बाहेर होण्याचे शिवसेने ठरवले. महाशिवआघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे. महाशिवआघाडीचे सरकार शरद पवारांमुळे टिकेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न कधीचेच पूर्ण झाले आहे. मात्र, आता बाळासाहेबांचे नाव पुढे करून राजकारण करत असल्याची टीका रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरेंवर केली. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही, असे वाटले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा, जनतेची कामे त्यांनी करावी. मंत्री पदावरून या महाशिवआघाडीत वाद होतील, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

त्याचबरोबर, मी मांडलेल्या फॉर्म्युलाला भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. माझे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. संजय राऊत काल भेटले. त्यांना ३-२ चा फॉर्म्युला सांगितला आहे. सुरूवातीपासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे हे समोर आले असते तर भाजपने पाठींबा दिला असता. बाळासाहेबांच्या तत्वाविरोधात ही आघाडी आहे. मी भाजप सोबतच राहणार असून महाशिवआघाडी सोबत जाणार नाही. बाकीच्या मित्र पक्षांचे माहीत नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- नाशिक महापौरपदाबाबत मनसे जाहीर करणार व्हिप

मुंबई- महायुतीचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही राहिली. भाजप ऐकत नाही तर सत्तेच्या बाहेर होण्याचे शिवसेने ठरवले. महाशिवआघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे. महाशिवआघाडीचे सरकार शरद पवारांमुळे टिकेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न कधीचेच पूर्ण झाले आहे. मात्र, आता बाळासाहेबांचे नाव पुढे करून राजकारण करत असल्याची टीका रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरेंवर केली. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही, असे वाटले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा, जनतेची कामे त्यांनी करावी. मंत्री पदावरून या महाशिवआघाडीत वाद होतील, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

त्याचबरोबर, मी मांडलेल्या फॉर्म्युलाला भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. माझे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. संजय राऊत काल भेटले. त्यांना ३-२ चा फॉर्म्युला सांगितला आहे. सुरूवातीपासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे हे समोर आले असते तर भाजपने पाठींबा दिला असता. बाळासाहेबांच्या तत्वाविरोधात ही आघाडी आहे. मी भाजप सोबतच राहणार असून महाशिवआघाडी सोबत जाणार नाही. बाकीच्या मित्र पक्षांचे माहीत नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- नाशिक महापौरपदाबाबत मनसे जाहीर करणार व्हिप

Intro:मुंबई - महायुतीच सरकार याव यासाठी मी प्रयत्न केले.
मात्र शिवसेना आग्रही राहिली ,भाजप ऐकत नाही तर सत्तेच्या बाहेर ठेवायच हे शिवसेने ठरवलं. महाशिव आघाडी ही अनैसर्गिक आघाडी आहे. महाशिव आघाडीचे सरकार शरद पवारमुळे टिकेल असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाशिवआघाडी बाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Body:बाळासाहेबांच शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्नन कधीच पूर्ण झालं आहे. बाळासाहेबांच नाव पुढे करून राजकारण करत असल्याची टीका
रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरेंवर केली.
काँग्रेस कडून शिवसेनाला पाठींबा मिळणार नाही अस वाटलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा, जनतेची काम त्यांनी करावी. मंत्रीपदावरून या महाशिवआघाडीत वाद होतील. मी मांडलेल्या फॉर्म्युलाला भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही.माझे प्रयत्न अद्याप ही सुरू आहेत .संजय राऊत काल भेटले, त्यांना 3-2 चा फॉर्म्युला सांगितला आहे. सुरूवातीपासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, हे समोर आले असते तर भाजपने पाठींबा दिला असता असे आठवले म्हणाले. बाळासाहेबांनाच्या तत्वाविरोधात ही आघाडी आहे. मी भाजप सोबतच राहणार असून महाशिवआघाडी सोबत जाणार नाही. बाकीच्या मित्र पक्षांचे माहीत नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.