ETV Bharat / state

राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी, अंशत: टाळेबंदी; प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला

author img

By

Published : Mar 12, 2021, 7:25 PM IST

प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याच आवाहन करण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात आणणे अवघड होत असल्याने काही शहरांमध्ये संचारबंदी किंवा अंशत टाळेबंदी लागू केली जात आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती, यावेळीही उन्हाळ्याला सुरुवात होत असताना कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात आणणे अवघड होत असल्याने काही शहरांमध्ये संचारबंदी किंवा अंशत टाळेबंदी लागू केली जात आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती, यावेळीही उन्हाळ्याला सुरुवात होत असताना कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. वर्षभरानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईत आता अंशत: टाळेबंदी लागण्याचे संकेत पालिका प्रशासन आणि मुंबईच्या महापौरांनी दिले आहेत. यामुळे मुंबईत येत्या काही दिवसात अंशतः टाळेबंदी लावताना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कडक अंमलबजावणी केली जाणार असून त्याची तयारी पालिकेने केली आहे. मुंबईत विशेष करून दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात ९० टक्क्याहून अधिक रुग्ण इमारतींमधील आहेत. यामुळे मुंबईमधील इमारती पालिका प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.

नागपुरात 'विकेंड कर्फ्यु'चे नियोजन

उद्यापासून म्हणजे शनिवार आणि रविवारी उपराजधानी नागपुरात 'विकेंड कर्फ्यु'चे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारपासून म्हणजेच 15 मार्च ते 31 मार्च दरम्यान शहरात कडक संचारबंदी लागू केली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. संचारबंदी संदर्भात नागपुरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना काय वाटते? याबाबत 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी परत टाळेबंदी नको, अशीच प्रतिक्रिया दिली आहे. टाळेबंदीऐवजी नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट-तिप्पट दंड वसूल करावा, अशी सूचना केली.

नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांचा आकडा 5 हजारावर

नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी दुकानांच्या वेळेवर निर्बंध घातले आहेत. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली असून प्रशासनाने शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय चुकीचा असल्याचे छोट्या दुकानदारांनी म्हटले असून आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील आठ दिवसात सक्रिय रुग्णांचा आकडा 5 हजारावर गेला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजल्यानंतर अंशतः टाळेबंदी जारी केली असून ह्यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

जळगावात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका कार्यक्षेत्रात 3 दिवसांचा 'जनता कर्फ्यू' घोषित केला आहे. काल (गुरुवारी) रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. त्यानंतर आज (शुक्रवारी) पहिल्या दिवशी जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा - लॉकडाऊनवरुन राजकारण तापले, लोकप्रतिनिधींना विचारात न घेता टाळेबंदीच्या निर्णयाचा भाजपकडून निषेध

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल

हेही वाचा - पुण्यात असे आहेत नवे नियम, रात्रीची संचारबंदी लागू

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात आणणे अवघड होत असल्याने काही शहरांमध्ये संचारबंदी किंवा अंशत टाळेबंदी लागू केली जात आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती, यावेळीही उन्हाळ्याला सुरुवात होत असताना कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. वर्षभरानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईत आता अंशत: टाळेबंदी लागण्याचे संकेत पालिका प्रशासन आणि मुंबईच्या महापौरांनी दिले आहेत. यामुळे मुंबईत येत्या काही दिवसात अंशतः टाळेबंदी लावताना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कडक अंमलबजावणी केली जाणार असून त्याची तयारी पालिकेने केली आहे. मुंबईत विशेष करून दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात ९० टक्क्याहून अधिक रुग्ण इमारतींमधील आहेत. यामुळे मुंबईमधील इमारती पालिका प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.

नागपुरात 'विकेंड कर्फ्यु'चे नियोजन

उद्यापासून म्हणजे शनिवार आणि रविवारी उपराजधानी नागपुरात 'विकेंड कर्फ्यु'चे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारपासून म्हणजेच 15 मार्च ते 31 मार्च दरम्यान शहरात कडक संचारबंदी लागू केली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. संचारबंदी संदर्भात नागपुरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना काय वाटते? याबाबत 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी परत टाळेबंदी नको, अशीच प्रतिक्रिया दिली आहे. टाळेबंदीऐवजी नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट-तिप्पट दंड वसूल करावा, अशी सूचना केली.

नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांचा आकडा 5 हजारावर

नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी दुकानांच्या वेळेवर निर्बंध घातले आहेत. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली असून प्रशासनाने शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय चुकीचा असल्याचे छोट्या दुकानदारांनी म्हटले असून आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील आठ दिवसात सक्रिय रुग्णांचा आकडा 5 हजारावर गेला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजल्यानंतर अंशतः टाळेबंदी जारी केली असून ह्यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

जळगावात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका कार्यक्षेत्रात 3 दिवसांचा 'जनता कर्फ्यू' घोषित केला आहे. काल (गुरुवारी) रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. त्यानंतर आज (शुक्रवारी) पहिल्या दिवशी जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा - लॉकडाऊनवरुन राजकारण तापले, लोकप्रतिनिधींना विचारात न घेता टाळेबंदीच्या निर्णयाचा भाजपकडून निषेध

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल

हेही वाचा - पुण्यात असे आहेत नवे नियम, रात्रीची संचारबंदी लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.