ETV Bharat / state

गड-किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांची खैर नाही, गृह खात्याचा नवा निर्णय

author img

By

Published : Feb 2, 2020, 2:37 PM IST

गड-किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना आता चाप बसणार असून त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याने शासन निर्णय जाहीर केला आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

मुंबई - राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. त्यामुळे गड, किल्ले आणि परिसरात मद्याचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांवर चाप बसणार आहे. एखादा व्यक्ती दारू पिऊन गैरवर्तन करताना आढळल्यास त्यावर यापुढे सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आणि दहा हजारापर्यंत दंडाची कारवाई होणार आहे.

राज्याच्या गृह विभागाने यासाठीचा शासन निर्णय काढला असल्याने गड-किल्ले परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मदत होणार आहे. गृह खात्याच्या या निर्णयानुसार किल्ले आणि गड परिसरात दारू पिणे, दारूच्या नशेत गैरवर्तन करणे, असे प्रकार आढळल्यास संबंधित समाजकंटकांना तत्काळ पोलीस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या अधिनिय 25 मधील कलम 85 अन्वये गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवायी केली जाणार आहे. त्यासोबत गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना आणि त्यासाठीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - '...तर यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरशांमध्ये किंवा बार आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवा'

ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे ठिकाण वगळून इतर ठिकाणी दारूच्या नशेत गैर शिस्तीने वागल्यास त्यासाठी राज्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलमांतर्गत कारवाई केली जाते. त्याचाच आधार घेत गृहविभागाने गड किल्ले परिसरात दारू पिऊन नशेत गैरवर्तन करणाऱ्यांना आळा बसविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील गड-किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि त्यातील कलम याची माहिती देणारे फलक पुरातत्व विभागामार्फत लावले जावेत, असे आदेशही या शासन निर्यणामध्ये देण्यात आले आहेत.

हेही वाचा - 'मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ, अशी 'फेकमफाक' करणाऱ्यांनी 24 तास बार उघडे केले'

मुंबई - राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. त्यामुळे गड, किल्ले आणि परिसरात मद्याचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांवर चाप बसणार आहे. एखादा व्यक्ती दारू पिऊन गैरवर्तन करताना आढळल्यास त्यावर यापुढे सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आणि दहा हजारापर्यंत दंडाची कारवाई होणार आहे.

राज्याच्या गृह विभागाने यासाठीचा शासन निर्णय काढला असल्याने गड-किल्ले परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मदत होणार आहे. गृह खात्याच्या या निर्णयानुसार किल्ले आणि गड परिसरात दारू पिणे, दारूच्या नशेत गैरवर्तन करणे, असे प्रकार आढळल्यास संबंधित समाजकंटकांना तत्काळ पोलीस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या अधिनिय 25 मधील कलम 85 अन्वये गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवायी केली जाणार आहे. त्यासोबत गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना आणि त्यासाठीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - '...तर यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरशांमध्ये किंवा बार आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवा'

ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे ठिकाण वगळून इतर ठिकाणी दारूच्या नशेत गैर शिस्तीने वागल्यास त्यासाठी राज्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलमांतर्गत कारवाई केली जाते. त्याचाच आधार घेत गृहविभागाने गड किल्ले परिसरात दारू पिऊन नशेत गैरवर्तन करणाऱ्यांना आळा बसविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील गड-किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि त्यातील कलम याची माहिती देणारे फलक पुरातत्व विभागामार्फत लावले जावेत, असे आदेशही या शासन निर्यणामध्ये देण्यात आले आहेत.

हेही वाचा - 'मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ, अशी 'फेकमफाक' करणाऱ्यांनी 24 तास बार उघडे केले'

Intro:गड-किल्ल्यावर दारूच्या नशेत गैरवर्तन करणाऱ्यांना बसणार चाप, गृह विभागाचे काढला नवा जीआर

mh-mum-01-fort-maha-gov-order-7201153
यासाठी फाईल फुटेज वापरावेत

मुंबई, ता. 2 :
राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. गड, किल्ले आणि परिसरात या मद्याचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांना चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा व्यक्ती दारू पिऊन घरी वर्तन करताना आढळल्यास त्यावर यापुढे सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आणि दहा हजारापर्यंत दंडाची कारवाई होणार आहे.
राज्याच्या गृह विभागाने यासाठीचा जीआर काढला असल्याने गड किल्ला परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मदत होणार आहे. ग्रहणाच्या या जीआर नुसार किल्ले आणि गड परिसरात दारू पिणे, दारूच्या नशेत गैरवर्तन करणे असे प्रकार आढळल्यास संबंधित समाजकंटकांना तात्काळ पोलीस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 (सन 1949 चा कलम 25 )मधील कलम 85 अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार असून कायदेशीर कार्यवाही तात्काळ केली जाणार आहे. यासाठीचे असे आदेश ही देण्यात आले आहेत. त्यासोबत गड-किल्ले यांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना आणि त्यासाठीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे असे ठिकाण वगळून इतर ठिकाणी दारूच्या नशेत गैर शिस्तीने वागल्यास त्यासाठी राज्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलमांतर्गत कारवाई केली जाते. त्याचाच आधार घेत गृहविभागाने गड किल्ले परिसरात दारू पिऊन नशेत गैरवर्तन करणाऱ्यांना आळा बसविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील गड-किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि त्यातील कलम याची माहिती देणारे फलक पुरातत्व विभागामार्फत लावले जावेत, असे आदेशही या जीआरमध्ये देण्यात आले आहेत.




Body:गड-किल्ल्यावर दारूच्या नशेत गैरवर्तन करणाऱ्यांना बसणार चाप, गृह विभागाचे काढला नवा जीआर


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.