मुंबई : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी ( Gram Panchayat Election Result 2022 ) आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली.
रविवारी राज्यातील 7 हजार 682 निवडणूकींसाठी मतदान प्रक्रिया ( Voting process completed ) पार पडली. या मतदान प्रक्रियेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पहायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल येत्या 20 डिसेंबर रोजी लागणार असून उमेदवारांमध्ये उत्सुकता लागली आहे. राज्यात सर्वाधिक मतदान रायगड जिल्ह्यात 70.82 टक्के झाले आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये झाली निवडणूक -महाराष्ट्रातील 7,135 ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत 74 टक्के मतदान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 दरम्यान मतदान झाले, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ठाणे (35), पालघर (62), रायगड (191), रत्नागिरी (163), सिंधुदुर्ग (291), नाशिक (188), धुळे (118), जळगाव (122), अहमदनगर (195), नंदुरबार(117), पुणे (176), सोलापूर (169) आणि सातारा (259) या ग्रामपंचायतींमध्ये आज निवडणूक झाली आहे.सांगली (416), कोल्हापूर (429), औरंगाबाद (208), बीड (671), नांदेड (160), उस्मानाबाद (165), परभणी (119), जालना (254), लातूर (338), हिंगोली (61), अमरावती (252), अकोला (265), यवतमाळ (93), बुलढाणा (261), वाशीम (280), नागपूर (234), वर्धा (111), चंद्रपूर (58) भंडारा (304), गोंदिया (345), गडचिरोली (345) (25).
ग्रामपंचायत निवडणूकच्या मतदानाची टक्केवारी : राज्यात ग्रामपंचायत ( Election percentage in gram panchayat ) निवडणूकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत सर्वाधिक रायगड जिल्ह्यात सुमारे 70.82 टक्के मतदान झाले आहे. तर धुळे जिल्हा 65.90 टक्के, अकोला जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतींसाठी 60.60 टक्के मतदान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 59.08 टक्के, भंडारा जिल्ह्यात 303 ग्रामपंचायतीसाठी 64.62 टक्के, वर्धा जिल्ह्यात 113 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी 66.17